Home » संभाजीनगरात दोन गटात झालेल्या वादावरुन हिंसा, संजय राउतांनी दिली अशी प्रतिक्रिया

संभाजीनगरात दोन गटात झालेल्या वादावरुन हिंसा, संजय राउतांनी दिली अशी प्रतिक्रिया

by Team Gajawaja
0 comment
Sambhajinagar Violence
Share

महाराष्ट्रातील संभाजीगरातील राम मंदिराजवळ दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले. या प्रकरणामुळे राजकरण सुरु झाले आहे. अशातच शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार, पोलीस, गृह मंत्री यांचे अस्तित्वच नाही. येथे दंगली या सरकारकडून घडवून आणल्या जात आहे. संजय राउत यांनी असे म्हटले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एक रॅली होणार आहे. हेच कारण आहे की, मुद्दाम अशा प्रकारचे हिंसाचार घडवून आणले जात आहे. संजय राउत यांनी सरकारला योग्य वेळी हा हिंसाचार थांबवण्याच्या दिशेने काहीही केलेले नाही यावरुनच हल्लाबोल केला आहे.(Sambhajinagar Violence)

संजय राउत यांनी असे म्हटले की, महाराष्ट्रात कायदे व्यवस्थेची समस्या आहे. कारण येथील सरकार, पोलीस, गृहमंत्री यांचे अस्तित्वच नाही. त्याचसोबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत कुठे असा सवाल ही राउत यांनी उपस्थितीत केला आहे. संभाजीनगरात विनाकारणास्तव हिंसाचार अशा कारणासाठी झाला की, २ एप्रिलला तेथे महाविकास आघाडीची एक रॅली आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात हिंसाचार होणे फार मोठी गोष्ट आहे. तरीही भाजप सरकार असे म्हणते की, हिंसाचार होत नाही. अशा स्थितीत परिस्थिती बदलल्याने संजय राउतांनी एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी इशारा देत स्पष्ट केले आहे की, सरकारचे लक्ष संभाजीनगरच्या महाविकास आघाडीच्या रॅलीच्या विरोधात रणनिती तयार करण्यावर आहे.

दरम्यान, औरंगाबाद मधील खिरादपुर परिसरातील राम मंदिराजवळ दोन लोकांमध्ये सर्वसाधारण गोष्टीवरुन वाद ढाला. त्यानंतर येथे दोन गट एकमेकांना भिडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी जेव्हा येथे धाव घेतली तेव्हा ५०० लोकांच्या गर्दीने त्यांच्यावर दगडफेक केली आणि पेट्रोलने भरलेल्या बॉटल्स फेकल्या, या घटनेत १० पोलीस कर्मचाऱ्यांसह कमीत कमी १२ लोक जखमी झाले आहे. ही घटना ३० मार्चच्या मध्यरात्री घडली. या घटनेत १३ गाड्या जळून खाक झाल्या आहेत.(Sambhajinagar Violence)

हे देखील वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणे १ एप्रिल पासून महागणार, १८ टक्क्यांनी वाढणार टोल

पोलिसांनी जमावावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. याच दरम्यान, शहरात स्थिती पूर्ववत झाली असून सीआरपीएफच्या ५ टीम तेथे तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात विविध संवेदनशील ठिकाणी सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. प्रशासनाने शांतीपूर्ण वातावरण रहावे म्हणून सीआरपीएफच्या पाच तुकड्या आणि सहाशे पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.