Home » औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नावात बदल

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नावात बदल

by Team Gajawaja
0 comment
Aurangabad-Osmanabad New Name
Share

महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यात आले आहे. आता औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादला धाराशिव नावाने ओळखळे जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासाठी मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच याबद्दल माहिती दिली आहे. नावात बदल करण्याबद्दल १६ जुलै २०२२ रोजी कॅबिनेटने प्रस्ताव पारित केला होता आणि तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. (Aurangabad-Osmanabad New Name)

फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या मागणीला स्विकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे आभार मानले. त्यांनी एका ट्विटमध्ये या गोष्टीवर जोर दिला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने अखेर हे करुन दाखवले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ट्विट करत पीएम आणि गृहमंत्र्यांचे आभार मानले.

दोन्ही शहरांच्या नावात बदल करण्याची मागणी बाळ ठाकरे यांनी केली होती. गेल्या काही काळापासून ही मागणी जोरदार होऊ लागली होती. उद्धव ठाकरे यांननी आपले सरकार कोसळण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या रुपात आपल्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीत यांच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु त्यावेळी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि एनसीपी या निर्णयामुळे कथित रुपात खुश नव्हते. निर्णय राज्य कॅबिनेट द्वारे पारित करण्यात आला होता. परंतु केंद्र सरकारच्या परवानगीमुळे तो दीर्घकाळ रखडला गेला होता.

हायकोर्टाने फेटाळली होती याचिका
बॉम्बे हायकोर्टाने १ फेब्रुवारीला दोन्ही शहरांच्या नावात बदल करण्याबद्दलच्या कॅबिनेटच्या निर्णयावर तत्काळ रुपात स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. परंतु हायकोर्टाने ती फेटाळून लावली. दरम्यान, कोर्टाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला निर्देशन दिले होते की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नावात बदलण्याच्या कॅबिनेटच्या निर्णयावर आपत्ती व्यक्त केली होती.

कार्यवाहक चीफ न्यायाधीश एसवी गंगापुरवाला आणि न्यायाधीश संदीप मार्ने यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला हे सुद्धा सांगण्यात सांगितले होते की, प्रशासन शहराचे नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय नव्या नावाचा वापर करु शकतो का? (Aurangabad-Osmanabad New Name)

हे देखील वाचा- चर्चगेट रेल्वेस्थानकाचे नाव लवकरच बदलले जाणार

राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे की, औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.