Entertainment : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही सिनेमे तयार करण्यात आले आहेत ज्याचा आपल्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला आहे. खासकरून 80-90 च्या दशकातील असे सिनेमे होते, ते पाहून नागरिकांचे आयुष्य बदलले गेले आहे. अशाच प्रकारचा एक सिनेमा वर्ष 1983 मध्ये आला होता. या सिनेमात अभिनेते राजेश खन्ना आणि शबाना आजम यांचा सिनेमा पाहून एका वृद्ध दांपत्याने आपले मृत्यूपत्र बदलले होते. याशिवाय मुलांकडून मालकी हक्कही काढून घेतले होते.
सिनेमा पाहून बदलले होते मृत्युपत्र
वर्ष 1983 मध्ये राजेश खन्ना आणि शबाना आजमी यांचा ‘अवतार’ सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन मोहन कुमार यांनी केले होते. या सिनेमाची कथा अशी होती की, कशा प्रकारे वृद्ध झाल्यानंतर मुल आई-वडिलांसोबत वागणूक करतात. त्यांना कशाप्रकारे मुलांच्या आयुष्यातून दूर करतात. खरंतर सिनेमात किशन उर्फ राजेश खन्ना आणि राधा किशन उर्फ शबाना आजमी यांना त्यांचा मुलगा कशा पद्धतीने आयुष्यात सोडून देतो हे दाखवले आहे. एकूणच पारिवारिक सिनेमा आहे. त्यामधील स्थिती बहुतांशजणांच्या घरी दिसून येते. (Entertainment)
सिनेमाचा प्रेक्षकांच्या मनावर पडला होता प्रभाव
अवतार सिनेमा पाहून बहुतांश वृद्ध दांपत्यांनी आपले मृत्युपत्र बदलले होते. त्यांना भीती वाटत होती की, सिनेमातील कथेप्रमाणे त्यांच्या आयुष्यातही काही गोष्टी घडतील. या सिनेमात राजेश खन्ना आणि शबाना आजमी यांनी आई-वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या मुलांनी त्या दोघांसोबत जे काही केलेय ते पाहून अनेकांनी आपल्या मुलांना दिलेले मालकी हक्क हिरावून घेतले होते. या सिनेमात हंगल रशीद, सचिन पिळगावकर, सुजीत कुमार, राजन ग्रेवाल, प्रीति सप्रु सारख्या काही कलाकारांनी काम केले होते.