लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलते. बहुतेक मुली लग्नाबाबत अनेक प्रकारची स्वप्ने सजवतात. त्यांना सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा असते. त्यांना लग्न झाल्यावर पतीचे प्रेम आणि आदर हवा असतो. तसेच सासरच्या घरात मुलीसारखे प्रेम हवे असते. पण त्यांच्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या काही चुका घरगुती जीवनात अडथळे आणू शकतात..(break up)
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. नवविवाहितांना सासरच्या लोकांशीही ताळमेळ जुळवता येत नाही. काही वेळा समस्या इतक्या वाढतात की, पती-पत्नीला वेगळे व्हावे लागते, त्यांच्यात घटस्फोट होतो. अशा परिस्थितीत प्रत्येक मुलीने लग्न झाल्यानंतर काही चुका करू नये..(break up)
अतिरिक्त पैसे खर्च करणे
एक आदर्श पत्नी ती आहे, जिच्याकडे काटकसरीची गुणवत्ता आहे. नवरा कितीही श्रीमंत असला, तरी पत्नीने खर्च करताना बजेट आणि कुटुंबाच्या गरजांची काळजी घेतली पाहिजे. विचार न करता पैसा वापरणे किंवा अज्ञानाने खर्च करणे, तुमच्या आनंदी जीवनाला ग्रहण लावू शकते. पतीकडून मौल्यवान वस्तूंची सतत मागणी करणे देखील चुकीचे आहे..(break up)
=====
हे देखील वाचा – जर हनिमूनला जात असाल, तर ‘हे’ ड्रेस नक्कीच ठेवा बॅगेत, स्टायलिशसोबत आकर्षकही दिसाल
=====
इतर गोष्टींना प्राधान्य देणे
स्त्रिया सहसा त्यांची नोकरी, मित्रपरिवार किंवा माहेरच्या सदस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करतात. अशा परिस्थितीत त्या पती आणि सासरच्या मंडळींना विसरतात. कधीकधी असे करणे वाईट नसते. परंतु नेहमी आपले पती आणि कुटुंब सोडून इतर गोष्टी आणि लोकांना प्राधान्य देणे, ही आपली सर्वात मोठी चूक असू शकते..(break up)
प्रेम व्यक्त न करणे
प्रत्येक पतीला पत्नीकडून प्रेम हवे असते. हे केवळ पतीलाच नाही, तर सासू- सासरे इत्यादींनाही हे लागू होते. पण जर तुम्हाला प्रेम किंवा आदर कसा व्यक्त करायचा हे माहित नसेल, तर तुमचा पार्टनर देखील नात्यात अंतर निर्माण करू लागतो.
=====
हे देखील वाचा – जर दीर्घ नातेसंबंध हवे असतील, तर गर्लफ्रेंडला कधीही विचारू नका ‘हे’ प्रश्न
=====
नेहमी नकारात्मक बोलणे
नकारात्मक बोलणे, सासरच्यांबद्दल टीका किंवा तक्रार करणे, उदास राहणे ही देखील वैवाहिक जीवनातील मोठी चूक आहे. जर तुम्ही नेहमी पतीसमोर असे वागत असाल, तर तो तुमच्यावर चिडायला लागू शकतो..(break up)