Home » Operation Sindoor : पाकिस्तान बेजार आतापर्यंत काय घडलं?

Operation Sindoor : पाकिस्तान बेजार आतापर्यंत काय घडलं?

by Team Gajawaja
0 comment
Operation Sindoor
Share

6-7 मे 2025 च्या मध्यरात्री भारतीय हवाई दल आणि लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि Pok मधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई २५ मिनिटांत पूर्ण झाली. भारताने कोणत्याही नागरी भागाला किंवा पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांना हात लावला नाही. पण या ऑपरेशननंतर भारत-पाकिस्तानात तणाव वाढला. पाकिस्तान चिडलाय, आणि दोन्ही देशांमध्ये गोळीबार, ड्रोन हल्ले, आणि कूटनीतिक हालचाली सुरू झाल्या. आता ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या हल्ल्यानंतर काय काय घडलं ते जाणून घेऊ.(Operation Sindoor)

७ मे ला ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्याने पाकिस्तान चक्रावला आणि त्यांनी तत्काळ आपलं हवाई क्षेत्र बंद केलं. कराची, लाहोर, आणि सियालकोट विमानतळांवरील उड्डाणं 12 मेपर्यंत थांबवली आणि भारतावर पलटवार करत पाकिस्तानने कुपवाडा, बारामुला, पुंछ, आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि हेवी आर्टिलरीने गोळीबार सुरू केला. यात 10-12 भारतीय नागरिक मारले गेले, 30-40 जखमी झाले. असं बोललं गेलं. भारतानेही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

नंतर ७ मे च्या दुपारी पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, श्रीनगर, आणि भुज येथे ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा प्रयत्न केला. भारताच्या S-400 सिस्टीमने हे सगळे हल्ले हवेतच उडवले. तसंच बोललं गेलं की जम्मू विमानतळाजवळ दोन स्फोट झाले, पण कोणतीही हानी झाली नाही. दुपारी ३ च्या आसपास परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलच्या 13 सदस्य देशांना ऑपरेशनची माहिती दिली. ७ मेच्या रात्री सुद्धा पाकिस्तानने पुंछ आणि राजौरीत गोळीबार सुरूच ठेवला. यात लान्स नायक दिनेश कुमार शहीद झाले. (Operation Sindoor)

८ मे च्या सकाळी पाकिस्तानने जम्मू, पंजाब, राजस्थान, आणि गुजरातमधील १५ सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा प्रयत्न केला. ज्यामध्ये अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई, आणि भुज या शहरांचा समावेश होता. पण पुन्हा भारताच्या S-400 ने हे सगळे हल्ले नाकाम केले. ८ मे ला सकाळी ११ च्या सुमारास दिल्लीत सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यात विरोधी पक्षांनी ऑपरेशनचं समर्थन केलं. (Operation Sindoor)

केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी यावेळी सांगितलं की, ऑपरेशन अजून संपलेलं नाही. ८ मे च्या दुपारी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो pib ने सांगितलं की, 7-8 मे च्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या 15 सैन्य ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला,पण S-400 ने हे सगळे हल्ले उलथवून लावले आणि दुपारी ३ च्या आसपास भारताने लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. भारताने लाहोरमधील पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर सुद्धा ड्रोन हल्ले केले. 8 मे च्या रात्री जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. भारतीय लष्कराने नौशेरा सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी ड्रोन पाडल्याचे सांगितले जातंय आणि असं सुद्धा म्हटलं गेलं की भारतीय वायुदलाने पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानचं F-16 आणि JF – 17 ही विमान पाडली. पण अशी official बातमी अजूनपर्यंत आलेली नाही.(Operation Sindoor)

================

हे देखील वाचा : India vs Pakistan : ‘हे’ देश भारताच्या पाठीशी ! पाकची काही खैर नाही…

================

याच दरम्यान धर्मशालामध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील IPL मॅच दरम्यान फ्लडलाइट्स बंद करण्यात आल्या आणि प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले.  भारताने पाकिस्तानाचा प्रत्येक वार उलथवून लावूनही पाकिस्तान शांत बसला नाही, पाकिस्तानने जम्मू, पंजाब, आणि राजस्थानमधील सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने पुन्हा S-400 एअर डिफेन्स प्रणालीच्या मदतीने या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने कोणत्याही गोष्टीसाठी आपली तयारी किती पक्की आहे हे यातून दाखवून दिलं. या आतापर्यंतच्या अपडेट होत्या. पाकिस्तानने जर आताही हल्ले थांबवले नाहीत तर भारत पाकिस्तान विरोधात ठोस पावलं उचलणार एवढं नक्की आहे.. आता येत्या काळात काय घटना घडतात त्यावर लक्षण ठेवणं महत्त्वाच आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.