पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालण बंद करावं, परिस्थिती आणखी बिघडू देऊ नका आणि आम्ही भारताला शस्त्र खाली ठेवायला सांगू शकत नाही, असा थेट दम आता अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. एक असा टाईम होता, जेव्हा अमेरिकेसारखा देशसुद्धा पाकिस्तानचा खास मित्र होता. पण एका गोष्टीमुळे त्यांनीही पाकिस्तानपासून नाक मुरडलं, ते म्हणजे दहशतवाद ! सध्या पाकिस्तानची जगभरात ओळख एक दहशतवादी देश म्हणूनच आहे. मोठमोठ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात Active आहेत. त्यातच Most Wanted Terrorist नेमके पाकिस्तानातच सापडतात. त्यामुळे पाकिस्तानचा मित्र बनायला अनेक देश पुढे सरसावत नाहीत, मग ते व्यापार असो वा इतर काही… पण सध्या भारत पाकदरम्यान जी युद्धासारखी परिस्थिती उद्भवली आहे, यावेळी भारतासोबत कोण आणि पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशासोबत कोण उभं आहे, हे जाणून घेऊ. (India vs Pakistan)
इंडियन डिफेन्स फोर्सेसने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर एकंदरीत भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धासारखी परिस्थिती झाली आहे. इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पापांचा जीव घेतला. यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने Pok मधले दहशतवाद्यांचे कॅम्प उडवून टाकले. यात भारताचा थेट सामना दहशतवाद्यांशी होता. मात्र तरीही पाकिस्तानी आर्मीने या लोकांना खतपाणी घातलं आणि भारतावर हल्ला चढवला. त्यालाही आर्मीने सडेतोड उत्तर दिलं. या सर्व प्रकरणावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी म्हटलं की, पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालण बंद करावं, परिस्थिती आणखी बिघडू देऊ नका आणि आम्ही यावेळी भारताला शस्त्र खाली ठेवायला सांगू शकत नाही.
देशभरातल्या अनेक देशांनी भारताच्या या कारवाईला आपलं समर्थन दिलं आहे. युरोपिअन युनिअनसह गल्फमधील कित्येक इस्लामिक देशसुद्धा भारताच्या बाजूने उभे आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अनेक देशांचे डिफेन्स मिनिस्टर, सेक्रेटरी आणि राजदूतांसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे एकंदरीत मोठ्या संख्येने देश भारताच्या बाजूनेच आहेत. यामध्ये अमेरिका, इस्राईल, रशिया, सौदी अरेबिया, युएई, फ्रान्स, जपान, इटली, युनायटेड किंग्डम, युक्रेन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, साउथ कोरिया, अफगाणिस्तान, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, फिलीपिन्स या देशांनी पूर्णपणे भारताला आपलं समर्थन दिलं आहे. (India vs Pakistan)
इस्राईलसुद्धा सध्या युद्धजन्य परिस्थितीत उभा आहे. Palestine, गाझा पट्टीचा वाद सध्या थंड असला तरी तो पुन्हा कधी उफाळून वर येईल, हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीतही इस्राईल भारताबरोबर आहे. त्यातच सौदी अरेबिया आणि युएई या प्रमुख इस्लामिक देशांनी भारतालाच आपला पाठींबा दिला आहे. अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स, इटली, जर्मनी, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनीही पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याला Condemn केलं आहे आणि या क्षणी आम्ही दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यात नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, फिलीपिन्स सारखे छोटे देशसुद्धा भारताच्या बाजूने दहशतवादाविरोधात उभे आहेत. भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातल्या टेररिस्ट कॅम्पसवर हल्ला चढवला. यात शेकडो दहशतवादी ठार झाले. पण याच दहशतवाद्यांच्या दफनविधीला पाकिस्तानी आर्मीचे ऑफिसर्स दिसून आले. हा फोटो पूर्ण जगाने पाहिला. त्यामुळे पाकिस्तानी सरकारच दहशतवादाला घट्ट मिठी मारून आहे, हे स्पष्टच आहे. पण तरीही या सिच्युएशनमध्ये पाकिस्तानच्या बाजूनेही अनेक देश उभे आहेत. या सर्वात मोठ नाव म्हणजे चीन… नंतर टर्की, एजरबायजान, इंडोनेशिया आणि मलेशिया,चीनने तर नेहमीच पाकिस्तानला युद्धात मदत केली आहे, तसच Diplomatic Support सुद्धा दिला आहे. पाकिस्तानला आजही आर्टिलरी पुरवण्याचं काम चीनच करतय. (India vs Pakistan)
==============
हे देखील वाचा : Air Defence : भारताने नष्ट केली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम, जाणून घ्या या प्रणालीबद्दल
==============
त्यातच टर्की हा जगातील आणखी एक प्रमुख इस्लामिक देश आहे, पण त्याने आपलं समर्थन पाकिस्तानला दिलं आहे. याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत टर्कीच्या पंतप्रधानांचं धन्यवाद केलं. त्यात इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांनीही पाकिस्तानला खुला सपोर्ट दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या या Conflict दरम्यान काही देशांनी न्युट्रल Stand घेतला आहे, तर काही देशांनी इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही देशांना संयम बाळगण्याची विनंतीसुद्धा केली आहे.
पण प्रश्न दहशतवादाचा आहे, प्रश्न दहशतवादाला पोसण्याचा आहे, प्रश्न भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा आहे. त्यामुळे भारत आपल्या जागी योग्य आहे, हे संपूर्ण जगाला माहित आहे.