Home » War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

by Jyotsna Kulkarni
0 comment
War
Share

आता भारताने थेट त्यांच्याच घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ऑपरेशन सिंदुरननंतर पाकिस्तानने सीमारेषांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबारामध्ये सीमारेषेजवळील अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर जवान दिनेश कुमार शर्मा हे देखील शहीद झाले. पाकिस्तानच्या गोळीबाराला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत असताना, भारताने देखील पाकला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. (War)

भारताने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत मजल मारली आहे. भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले पाकिस्तानवर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इस्लामाबादेत नुसता हाहाकार माजला आहे. फक्त इस्लामाबादच नाही तर लाहोर, पेशावरसह पाकिस्तानातल्या १६ शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. भारताच्या या तुफान हल्ल्यामुळे पाकच्या अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. (MArathi News)

भारताने अचानक आणि भयानक केलेल्या या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये धमक्यांचे आवाज सतत येत आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये सीमेलगतच्या भागात ब्लॅकआउट करण्यात आला. भारताच्या या मोठ्या प्रतिकारामुळे समस्त भारतीयांनी आपल्या सैन्यावर, आपल्या जवानांवर गर्व व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे. यात कलाकार देखील मागे नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवानांसाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचा जोश हिंमत वाढवण्यासाठी सर्वच लोकं विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहे. (Marathi Latest News)

War

अशातच बॉलिवूड आणि मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल अशी ओळख असलेल्या अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर करत आपल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवला आहे. जिनिलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर खास संदेश लिहिला आहे. तर दुसरीकडे रितेश देशमुखने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मेसेज शेअर करत भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. (Marathi Trending News)

जिनिलिया डिसुझाची पोस्ट
जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले, “आपल्या भारतीय सैन्याला त्यांच्या शौर्य, धाडस आणि धैर्यासाठी सलाम. आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो. जय हिंद!”

रितेश देशमुखची पोस्ट
तर रितेशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “खंबीरपणे उभे राहून, आपले रक्षण करणाऱ्या आपल्या राष्ट्राच्या खऱ्या हिरोंना सलाम भारतीय सैन्य जिंदाबाद! भारत माता की जय! जय हिंद!”

War

२२ एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करत त्यांना गोळी मरून ठार केले. याचंच बदला म्हणून भारतीय सैन्यदलांनी ७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव असलेल्या या एअर स्ट्राईकला भारतीय सेनेने यशस्वी करत सर्वच आतंकी हल्ल्याचा बदला घेतला आहे. (Marathi Top News)

=======

हे देखील वाचा : Air Defence : भारताने नष्ट केली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम, जाणून घ्या या प्रणालीबद्दल

War : पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमार शर्मा शहीद

=======

भारताने केलेल्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या बुडाला आग लागली आणि त्यांनी सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन तर केले सोबतच ड्रोन हल्ले आणि गोळीबार देखील केला. पण, भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावले. भारतीय सैन्याच्या या अभूतपूर्व यशाला सगळ्यांनीच सलाम केला आहे.(Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.