सध्या सगळीकडे आयपीएलची धूम सुरु आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा जरा लांबली. मात्र आता येत्या ३ जूनला इंडियन प्रीमियर लीग सीझन १८ चा अंतिम सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्याआधी, येथे एक भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार असून, या सोहळ्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश साजरे केले जाणार आहे. एवढेच नाही तर आयपीएलच्या सांगता समारंभात सेना दलाचा गौरव देखील होणार आहे. (IPL)
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुष गोळीबार करत त्यांना मारले. याच हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांचा खात्मा केला. यामध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. या ऑपरेशनचा बदला घेत पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. या युद्धामुळे यंदाच्या आयपीएलचे उरलेले सामने पुढे ढकलले. मात्र ही परिस्थिती लवकरच सुधारली आणि भारताने या मोहिमेमध्ये पाकिस्तानला हरवत मोठे यश संपादन केले. या यशस्वी मिशननंतर ही स्थगित आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरु झाली. आता आयपीएल अंतिम टप्प्यात आली असून येत्या ३ जूनला या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. (Marathi News)
भारताचा पाकिस्तानवर झालेला विजय सगळ्यांसाठीच खूप मोठी बाब आहे. ऑपरेशन सिंदूरला मिळालेल्या यशामुळे संपूर्ण भारतामध्ये विजयोत्सव साजरा केला जात आहे. बीसीसीआय देखील आता ऑपरेशन सिंदूरला मिळालेली यश साजरे करणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात होणाऱ्या सोहळ्यामध्ये हा विजयोत्सव रंगणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी बीसीसीआयने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ नेव्ही स्टाफ आणि चीफ ऑफ एअर स्टाफ यांना समारोप समारंभासाठी आमंत्रित केले आहे. (Top Stories)
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी माहिती देताना सांगितले की, “आपल्या वीर जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या वीर साहसी प्रयत्नांमुळे देशाला आज एवढे मोठे यश मिळाले असून, जगात भारताचा नावलौकिक वाढला आहे. बीसीसीआयच्या वतीने आम्ही आमच्या शूर सैनिकांच्या शौर्य, धाडस आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य देशालाही सुरक्षित ठेवते या वीरांमुळेच आपले रक्षण होते आणि आपल्याला देशप्रेमाची प्रेरणा मिळत राहते. या सन्मानार्थ, आम्ही आयपीएल २०२५चा समारोप समारंभ सैन्याला समर्पित करण्याचा आणि आमच्या सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा सर्वप्रथम महत्त्वाची आहे. क्रिकेट हा देशाचा आवडता खेळ आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना यामार्फत सन्मानित करणार आहोत.” (Marathi Latest News)
दरम्यान भारताने दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण जगभरात चर्चा झाली. या मिशनमध्ये जगातील जवळपास सर्वच देश भारताच्या बाजूने भक्कम उभे होते. मुख्य म्हणजे या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य आणि आपली असामान्य ताकद संपूर्ण जगाला दाखवली. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे काय होते याचे मोठे उदाहरण जगाला या ऑपरेशन सिंदूरमुळे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामाजिक नुकसान झाले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या तिन्ही दलाने आपले शौर्य दाखवले. (Top Marathi Headline)
=============
हे देखील वाचा : Indian Economy : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
=============
भारताने या मिशनमध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त केले आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून दाखवले. भारतीय वायुदलानं ७ मे च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. (Todays Marathi Headline)