‘’इथून दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,” हे स्टेटमेंट आहे काँग्रेस नेते शशी थरूर यांचं. थोडक्यात गांधींचा देश म्हणून भारताचं जे मार्केटिंग आहे त्यापासून आयता भारत पुढे आला आहे. अशा आशयाचा अर्थ या विधानाने घेतला जात आहे. (Shashi Tharoor)
पहलगाम अटॅक आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरची भारताची बाजू मांडण्यास शशी थरूर हे परदेशी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या प्रत्येक स्टँडची वाक्याची देशातच नाही तर जगभरात चर्चा होत आहे. बरं शशी थरूर यांचं हे पहिलंच स्टेटमेंट नाहीये याआधीच “भारतीय भूभागाला लक्ष्य करून पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत; पण आता दहशतवाद्यांना त्यांच्या भ्याड हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल. उरी येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता.” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या सर्जिकल स्ट्राईकचंही समर्थन केलं होतं.
थोडक्यात मोदी सरकारच्या पाकिस्तानविरुद्धच्या आक्रमक स्टॅन्डचं शशी थरुर तोंड भरून कौतुक करत आहेत. मात्र यामुळे आता थरूर यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. केंद्र सरकारचं वारंवार कौतुक करून थरूर हे लक्ष्मण रेषा मोडत असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिली होती. काँग्रेसकडून अजूनही इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा पाकिस्तनाला घुसुन मारलं असा रेफरन्स दिला जात आहे. (Shashi Tharoor)
त्यामुळे शशी थरुर यांची भूमिका आता आधी महात्मा गांधी आणि मग इंदिरा गांधी या काँग्रेसच्या दोन आयडॉलच्याच विचारांच्या विरोधातच जाणारी आहे काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे . महत्वाचं म्हणजे जर काँग्रेसच्या अगदी बेसिक ढाच्याच विरोधातच जर शशी थरूर जाणार असतील तर त्यांनी आता काँग्रेसला टाटा गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे का? अशाही चर्चा आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपनेही अगदी हायकमांड लेव्हलला शशी थरूर यांना दरवाजे उघडे केल्याचं बोललं जात आहे? त्यामुळे शशी थरुर हे भाजपात जातील का ? २०२९ ला शशी थरूर भाजपच्या तिकिटावर लढतील का? जाणून घेऊ. (Political News)
तर शशी थरूर (Shashi Tharoor) सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या अस्सलखीत इंग्लिशमध्ये आणि तितक्याच अनुभवाने भारताची बाजू मांडत आहेत. अनुभवाने यासाठी की वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये phd करणाऱ्या शशी थरूर यांनी UN सारख्या संघटनेत काम केलं आहे. युनाइटेड नेशन्स या संघटनेत अनेक वर्षे काम केल्यानंतर या संघटनेच्या सर्वोच्च पदासाठी म्हणजे UN जनरल सेक्रेटरीसाठीही शशी थरूर यांनी जोरदार फाइट दिली होती. त्यामुळेच पक्षाच्या पलीकडे जाऊन शशी थरूर यांचे चाहते भारतात आढळतात.(Shashi Tharoor)
त्यामुळेच मग अशा मोक्याच्या क्षणी जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू मांडण्याची वेळ आली आहे तेव्हा विरोधी पक्षात असतानाही शशी थरूर यांनी सरकाराच्या निर्णयाचं समर्थन केलं. मात्र हे समर्थन करताना शशी थरूर यांनी लक्ष्मण रेखा पार केल्याचं काही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र हे म्हणणं का आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला शशी थरूर यांची गेल्या काही वर्षातील महत्वाकांक्षा पाहावी लागेल. काँग्रेस आणि गांधी घराणं असं जवळपास इक्वेशन झालं असताना शशी थरूर यांनी एक साहसी प्रयोग केला होता. त्यांनी गांधी घराण्याचा पाठिंबा असलेलं उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. हायकमांडचा शब्द शेवटचा अशी प्रथा असलेल्या काँग्रेसमध्ये शशी थरूर यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं. मात्र हे पक्षांतर्गत बंड होतं. खरंतर संसदीय लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाने हे पक्षांतर्गत लोकशाही ही मानायला हवी होती. मात्र काँग्रेसमध्ये तसं झालं नाही आणि पक्षांतर्गत एक गट कायम शशी थरूर यांना बाजूला करण्याची संधी शोधू लागला.(Political News)
त्यातच शशी थरूर यांनी २०२४ मध्ये पुन्हा एकदा थिरुअनंतरपूरम सीट जिंकत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्यामुळे विरोध मग अजूनच वाढला.त्यात भर पडली थरूर यांच्या मोदी सरकार बरोबर जाण्याच्या भूमिकेची. ऐन बिहार निवडणुकीच्या आधी मोदी सरकारकडे दोन महत्वपूर्ण अजेंडे आहेत. एक म्हणजे ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तनाला दिलेलं खणखणीत उत्तर आणि दुसर म्हणजे जातीय जनगणना करण्याचा घेतलेले निर्णय त्यामुळे भाजपचा नॅशनलीजम ला विरोध करताना आता काँग्रेसला सामाजिक न्यायचं तत्त्वही पुढे आणता येणार नाही. अशावेळी पुन्हा एकदा मोदी विरोधात कसं उतरायचं या प्रश्नाने काँग्रेस ग्रस्त आहे. अशावेळी मग एक काँग्रेसी नेते जेव्हा मोदींच्या सोबत दिसतो, त्यांच्या मंचावर उपस्थित राहतो तेव्हा काँग्रेसजनांची तळपायाची आग मस्तकाला जाते. (Politics Top Headlines)
तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शशी थरूर यांची गेल्या काही काळातील वक्तव्ये हि काँग्रेसच्या अगदी बेसिक राजकारणाच्या चौकटीला ठेच पोहचवणारी आहेत असा काही काँग्रेस नेत्यांच ग्रह आहे. उदाहरणार्थ जरी स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेस आणि आताची काँग्रेस यात फरक असला तरी काँग्रेसने नेहमी तोच वारसा संगीतला आहे. सोबतच गांधी नेहरूंचा वारसाही काँग्रेस सांगत असते. महत्वाचं म्हणजे महात्मा गांधी आणि गांधी घराणे यांचा थेट काहीही संबंध नाहीये मात्र काँग्रेसने हा वारसा एवढा अग्रिसिव्हली मांडला आहे की देशात एका मोठ्या लोकसंख्येला काँग्रेसचं गांधी घराणं आणि महात्मा गांधी यांचा काही संबंध आहे असं वाटतं. सोबतच पंतप्रधान मोदींच्या स्ट्रॉंग इमेजला काउंटर करण्यासाठीही काँग्रेसकडून इंदिरा गांधी आणि त्यांच्या १९७१च्या बांगलादेश निर्मितीच्या योगदानाचं उदाहरण दिलं जातं. मात्र शशी थरूर यांनी गेल्या महिनाभरात जी वक्तव्ये केली आहेत ती काँग्रेसच्या या फौंडेशनलच हलवणारी आहेत. त्यामुळे आता थरूर यांचे काँग्रेसमध्ये काही शेवटचेच दिवस राहील्याच्या चर्चा आहेत. ‘मग प्रश्न येतो तो म्हणजे थरूर भाजपात जाणार का?(Shashi Tharoor)
भाजपाला शशी थरूर यांच्या रूपाने एक सोफिस्टिकेटेड इंटिलिजंट नेता मिळेल. ज्याचा फायदा ते आंतराराष्ट्रीय पातळीवरही घेऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचा जो दक्षिण भारतात विस्तार करण्याचा प्लॅन आहे त्यालाही यामुळे हातभार लागेल. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपाला एक नवीन चेहरा घेऊन जात येईल. विशेषतः केरळमध्ये भाजपने आपली पूर्ण ताकद लावूनही भाजपाला यश काय मिळत नाहीये. अशावेळी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप असा एक प्रयत्न करू शकते.(Political News)
================
हे देखील वाचा : Success Story : वडील सैन्यात अधिकारी, मुलगी IAF च्या मागी स्क्वाड्रनची प्रमुख वर्लिन पनवार, आता बॉलिवूडच्या कलाकारांना देतेय ट्रेनिंग
================
मात्र शशी थरूर यांना बदल्यात काय मिळणार हा मोठा प्रश्न आहे. शशी थरूर हे काँग्रेसकडून खासदार आहेत. जर ते भाजपसोबत गेल्यास त्यांना लोकसभेच्या जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतरही शशी थरूर यांना मंत्रिमंडळात लगेच स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण थेट पक्षात घेऊन मंत्रिमंडळात घेतलं असं उदाहरण मोदी मंत्रिमंडळात कमी आहे. सोबतच शशी थरूर यांचा अनुभव पाहता त्यांना कॅबिनेट आणि त्यातही परराष्ट्र मंत्रालय किंवा त्या तोडीचं मंत्रालय द्यावं लागेल. पुन्हा एकदा भाजपने असं केलेलं नाहीये आणि थरूर यांना थेट एवढं मोठं पद दिल्यास मोठा विरोधही होऊ शकतो. त्यामुळे भाजपमध्ये थरूर यांना मोठा काय मिळेल याची शक्यता धूसर असल्याचं जाणकार सांगतात.(Shashi Tharoor)
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थरूर यांनी भाजपाला याआधी कडवा विरोधही केला आहे. विशेतः भाजपाच्या हिंदुत्वावर त्यांनी कडव्या शब्दात टीका केली आहे. मोदींवर टीका करताना तर त्यांनी अख्ख the paradoxical prime minister हे पुस्तकंच लिहलं आहे. अशावेळी करियरच्या अखेरच्या टप्यात पक्ष बदलला तर ज्या बौद्धिकतेवर शशी थरूर यांना मोठेपण दिलं गेलं आहे त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे भाजपात जाण्याचा मार्गही थरूर यांच्यासाठी सोप्पा नसणार आहे. त्यामुळे भाजपाची बाजू तर घेतली पण भाजपात शशी थरूर जाणार का? हे पाहण्यासारखं असणार आहे.