Home » राम मंदिराव्यतिरिक्त अयोध्येत फिरण्यासाठी ही आहेत प्रमुख स्थळ

राम मंदिराव्यतिरिक्त अयोध्येत फिरण्यासाठी ही आहेत प्रमुख स्थळ

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. त्यानंतर तुम्हाला रामललांचे दर्शन घेता येणार आहे. अयोध्येत आल्यानंतर तुम्ही राम मंदिराशिवाय अन्य काही प्रमुख स्थळांनाही नक्कीच भेट द्या.

by Team Gajawaja
0 comment
Ayodhya
Share

Ayodhya : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह व्हीव्हीआयपी, साधू-संत उपस्थिती लावणार आहे. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांसाठी दर्शन खुले केले जाणार आहे. अशातच तुम्ही अयोध्येत आल्यानंतर राम मंदिराशिवाय अशा कोणत्या प्रमुख ठिकाणांनाही भेट देऊ शकता याबद्दल जाणून घेऊया अधिक….

त्रेता के ठाकूर
त्रेता के ठाकूर मंदिर अयोध्यतील नया घाटजवळ आहे. या मंदिरात भगवान राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. भाविकांसाठी केवळ एकदाच एकादशीच्या वेळी सुरू केले जाते. या मंदिराबद्दल अशी मान्यता की, त्रेता के ठाकूर मंदिराचे बांधकाम 300 वर्षांपूर्वी राजा कुल्लू यांनी केले होते. याशिवाय 1700च्या दशकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराला नवे रुप दिले होते.

छोटी छावनी
अयोध्येतील छोटी छावनी पांढऱ्या रंगातील संगमरवरापासून तयार करण्यात आली आहे. याला वाल्मिकी भवनही म्हटले जाते. याशिवाय मणिरामदास छावनीच्या रुपातही ओखळली जाते. यामध्ये एकूण 34 ऐतिहासिक गुहा असून त्यापैकी 12 बुद्ध धर्माच्या, 7 हिंदू धर्माच्या आणि 5 जैन धर्मासंदर्भातील आहेत.

तुलसी स्मारक भवन
अयोध्येतील तुलसी स्मारक भवन फिरण्यासाठी एक उत्तम धार्मिक स्थळ आहे. या भवनाबद्दल असे म्हटले जाते की, येथे 16 व्या शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितची रचना केली होती. या भवनाचे बांधकाम वर्ष 1969 मध्ये करण्यात आले होते. तुलसी स्मारक भवनामध्ये अयोध्ये अनुसंधान संस्था नावाचे एक संशोधन केंद्र आहे.

दंत धावन कुंड
दंत धावन कुंडाबद्दल अशी मान्यता आहे की, या कुंडातील पाण्याचा वापर करुन प्रभू राम आपल्या भावांसोबत दात स्वच्छ करायचे. हे कुंड हनुमानगढीच्या जवळ आहे. याला राम दतौन नावानेही ओखळले जाते. अयोध्येत फिरायला आल्यास या ठिकाणाला नक्की भेट द्या. (Ayodhya)

शरयू नदी
अयोध्येतील शरयू नदी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. येथे दूरदूरवरून लोक स्नान करण्यासाठी येतात. या नदीचा उल्लेख हिंदू ग्रंथ, वेद आणि रामायणात करण्यात आलेला आहे. मान्यतेनुसार, या नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होतो असे मानले जाते.


आणखी वाचा :
राम मंदिर आंदोलनातील दीदी मॉं

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.