Wooden Utensils Cleaning : स्वयंपाकघरात लाकडी भांड्यांचा वापर हा एक पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पर्याय मानला जातो. लाकडी चमचे, फडशा, पोळपाट, लाटणे किंवा फोडणीचे डाव अशा अनेक वस्तू आजही अनेक घरांमध्ये वापरल्या जातात. या भांड्यांचा वापर करताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते ती म्हणजे योग्य साफसफाई आणि देखभाल. चुकीच्या पद्धतीने स्वच्छता केल्यास लाकडी भांड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात, त्यांचा वास खराब होऊ शकतो, आणि शेवटी आरोग्याला हानी पोहोचू शकते. म्हणूनच, लाकडी भांडी साफ करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
साध्या पाण्याने धुणे टाळा
लाकडी भांडी धुण्यासाठी गरम किंवा थंड पाणी थेट वापरणे टाळावे. खूप वेळ पाण्यात भिजवून ठेवण्यामुळे लाकडामध्ये ओलावा शिरतो, ज्यामुळे भांडे खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लाकडी भांडी शक्यतो ओल्या फडक्याने किंवा थोडंसं ओलं करूनच धुवावं. याशिवाय भांडी ओलसर असल्यास ती व्यवस्थितीत वाळवून घ्यावीत. जेणेकरुन त्याला दुर्गंधी येणार नाही.(Marathi News)
साबणाचा मर्यादित वापर
लाकडी भांड्यांसाठी सौम्य आणि नैसर्गिक साबण वापरणे फायदेशीर ठरते. रासायनिक किंवा अत्यंत शक्तिशाली डिटर्जंट वापरल्यास लाकडाचे गुणधर्म बिघडू शकतात. साबण वापरल्यानंतर भांडे स्वच्छ पाण्याने चांगले धुऊन घ्यावे आणि लगेच कोरड्या कापडाने पुसून वाळवावे. अन्यथा भांड्यांना चिकटपणा राहू शकतो आणि भांडी खराब होऊ शकतात.

Wooden Utensils Cleaning
नियमित निर्जंतुकीकरण गरजेचे
लाकडी भांड्यांमध्ये जीवाणू लपून राहू शकतात, त्यामुळे अधूनमधून त्यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून लाकडी भांड्यावर चोळावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे दुर्गंधीही दूर होते आणि भांडे स्वच्छ राहते. असे केल्याने अन्नपदार्थांसह आरोग्यही सुरक्षित राहण्यास मदत होते.
====================
हे ही वाचा :
हेअर ट्रांसप्लांट करण्यापूर्वी लक्षात ठेवा या 5 गोष्टी
Train : रेल्वे आपत्कालीन चेन खेचल्यानंतर ट्रेन कशी थांबते?
====================
सूर्यप्रकाशात वाळवू नका
लाकडी भांडी धुवून झाल्यानंतर ती थेट उन्हात वाळवणे टाळावे. अधिक उष्णतेमुळे लाकूड सुकते, त्याचे थर फुटतात आणि भांडे लवकर खराब होते. त्याऐवजी छायेत व हवादार ठिकाणी वाळवावे. जेणेकरुन दीर्घकाळ भांडी टिकून राहण्यास मदत होईल. (Wooden Utensils Cleaning)
तेल लावा
लाकडी भांड्यांवर अधूनमधून नारळ तेल किंवा अन्नासाठी योग्य असलेले मिनरल ऑईल लावल्यास त्यांचे पोषण होते, भांडे कोरडे होत नाही आणि चमकही टिकून राहते. हे एक प्रकारचे नैसर्गिक संरक्षणही असते.(Marathi News)