Home » Artificial Intelligence : AI सुरू करणार तिसरं महायुद्ध ?

Artificial Intelligence : AI सुरू करणार तिसरं महायुद्ध ?

by Team Gajawaja
0 comment
Artificial Intelligence
Share

AI चा गॉडफादर म्हणजेच ही टेक्नॉलॉजी तयार केली डॉ. जॉफ्री हिंटननं ! पण हे तयार करून तो चांगलाच पस्तावला आहे, हे त्याच्या एकंदरीत वक्तव्यांवरून दिसून आलं आहे. एआयविषयी मी जे काम केलं, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो, असं जॉफ्री म्हणाला होता. यासोबत AI हे मानवतेसाठी “Existential Threat” आहे, असंही त्याने स्पष्ट सांगितलं होतं. याआधी त्याने गुगलसाठीही काम केलं होतं. AI चाच शोध लावण्यासाठी त्याला गेल्याच वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता. पण ज्याच्या नावाचा पुरस्कार त्याला मिळाला आहे, त्या अल्फ्रेड नोबेलचाही इतिहास काहीसा असाच होता. १८९६ दरम्यान डायनामाइटचा शोध लावला, त्याचा स्फोट पण पाहिला. एकदा आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झालं, आणि वृत्तपत्रांना आल्फ्रेडचच निधन झाल्याची चुकीची बातमी छापली. यात एका वृत्तपत्राची हेडलाईन होती ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ ! (Artificial Intelligence)

ही बातमी ऐकून तो निराश झाला आणि आपण मेल्यावर जग आपल्याला वाईट वृत्तीचाच समजतील, ही इमेज पुसून टाकण्यासाठी त्याने नोबेल अवॉर्ड्सची घोषणा केली. इथे अजून एक नोबेल कनेक्शन आहे. याच नोबेल अवॉर्डसाठी ३ वेळा नॉमिनेट झालेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब तयार केला. हा अणुबॉम्ब डायनामाईटपेक्षा कित्येक पटीने भयानक आणि विध्वंसक होता. याचा शोध लावल्यानंतर ओपेनहायमर बराच पस्तावला होता. आता बघा आल्फ्रेड नोबेलने तयार केलेल्या डायनामाइटचा वापर पहिल्या महायुद्धात झाला आणि रॉबर्ट ओपेनहायमरने तयार केलेल्या अणुबॉम्बचा वापर दुसऱ्या महायुद्धात झाला. त्यामुळे AI तिसऱ्या महायुद्धात तिसऱ्या महाभयंकर स्फोटाची नांदी ठरतोय की काय? असं एकंदरीत चित्र आहे. (Latest Updates)

आता पुन्हा जॉफ्री हिंटनवर येऊया. त्याने इतकी वर्ष गुगलमध्ये काम केलं. पण त्याने गुगलमधून राजीनामा देण्याची तीन कारणंसुद्धा सांगितली होती. पहिलं म्हणजे ‘एआय’मुळे भविष्यात जवळपास ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होतील. त्यामुळे जगभरात प्रचंड सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. दुसरं म्हणजे, सध्या ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ म्हणजेच एलएलएम जोशात आहे. यांनीच काय धुमाकूळ घातलाय, तो आपण पाहूच शकतो. तिसरं म्हणजे, या ‘एआय’मुळे तयार होत असलेले आणखी विध्वंसक शस्त्र ! याच AI च्या माध्यामतून एक ‘स्वार्म टेक्नॉलॉजी’ तयार करण्यात आली आहे. यामध्ये छोटे छोटे ड्रोन एकत्र असतात. यांना एखादा फोटो दिल्यास हे सर्व ड्रोन एकत्र येऊन एखाद्या व्यक्तीला मारूसुद्धा शकतात. ही जी तीन प्रमुख कारण आहेत, यामध्ये डॉ. जॉफ्री हिंटन यांचं महत्त्वाचं योगदान आहे. (Artificial Intelligence)

‘चॅट जीपीटी’ आणि ‘डिप फेक’ या गोष्टी आपल्या कानावर पडल्याच असतील. या ‘चॅट जीपीटी’ने सगळ इतकं सोपं करून टाकलं आहे की, तुम्हाला मनुष्यबळाची गरजच भासणार नाही. दुसरीकडे डीपफेकमुळे सोशल मीडियावर बनावटी फोटोज, व्हिडिओ यांचा तर सुळसुळाटच सुरु आहे. तुम्ही अधून मधून एखादी Ad पाहिली असेल की, अशा AI APP च्या माध्यमातून केवळ फोटोतूनच कीस घेतानाचे व्हिडिओ तयार केले जात आहेत. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा APP पुरेसा आहे. यामुळे ज्या गोष्टी डार्क वेबवरच चालतात, त्या सहज ओपनली सुरु होतील. (Latest Updates)

मध्यंतरी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क, आणि मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांनीही AI पुन्हे जगाचा विनाश करू शकतं, असे वक्तव्य केले होते. ‘AI’ची जी उपशाखा आहे ‘न्यूरल नेटवर्क’ ही फारच जुनी आहे. या ‘न्यूरल नेटवर्क’चा इंटेलिजंस आणखी वाढवण्यासाठी तिचं रुपांतर २०१२ साली ‘डीप लर्निंग’मध्ये करण्यात आलं आणि हे कामसुद्धा डॉ. जोफ्री हिंटन यांनीच केलं होतं. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज भयंकर परिस्थिती ओढावली आहे. २०२३ साली ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. त्यातच वॉरन बफे यांनी या ‘AI’ला थेट ‘दुसरा अणुबॉम्ब’च म्हटलं आहे. (Artificial Intelligence)

=============

हे देखील वाचा : Blood Moon : ग्रहांची परेड, चंद्रग्रहण, ब्लड मून आणि बरंच काही !

=============

अमेरिकेत एक रायटर्स गिल्ड म्हणून लेखकांची संघटना आहे. त्यांनी नुकताच ‘चॅट जीपीटी’ विरोधात मोर्चा काढला. त्यांचं म्हणणं होत की, जर हे जीपीटीच कथा, पटकथा आणि इतर गोष्टी लिहून देत असतील, तर आम्हाला पगार कोण देणार आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला काम कोण देणार. प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी यांनी टेड TALK या कार्यक्रमात म्हटलं होत की, भविष्यात जगातल्या ९० % लोकांमध्ये काहीच काम नसेल. त्यामुळे या ‘एआय’वरचं संशोधन सहा महिने थांबवायला हवं, असं अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत आणि जागतिक पातळीवरची मोठी मंडळी सुचवत आहे. (Latest Updates)

माणसाने अशा अनेक गोष्टी तयार करून ठेवल्या आहेत, ज्या माणसासाठी अतिशय धोकादायक आहेत. पण तरीही त्याने अजुनही या गोष्टी थांबवल्या नाहीत. मुळात ही मनुष्याची एक शर्यतच आहे. पण ही शर्यत मनुष्याला प्रगतीकडे घेऊन जाण्याची नाही, तर अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे पहिल्या महायुद्धात डायनामाइट, दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब आणि तिसऱ्या महायुद्धात हे एआय महत्त्वाचं हत्यार बनणार आहे. त्याहीपलीकडे या एआयमुळेच तिसरं महायुद्ध घडू शकतं, यातही तिळमात्र शंका नाही. (Artificial Intelligence)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.