भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा किल्ला कोणता, हा प्रश्न विचारला तर चक्रावून जायला होईल. कारण भारतामध्ये 600 हून अधिक किल्ले असल्याची माहिती आहे. यात डोंगरी किल्ले, किनारी किल्ले आणि मैदानी किल्ले यांचा समावेश आहे. आता यातील फार कमी किल्ले हे त्यांचे वैभव सांभाळून आहेत. (Indian Fort)
या किल्ल्यांची वास्तुकला ही त्या-त्या काळातील शासकांच्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडवते. भारतातील सर्वात लहान किल्ला मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर शहरातला मदन महाल आहे. तर भारतातील सर्वात जुना आणि मोठा किल्ला हा हिमाचल प्रदेशमधील कांगडा किल्ला आहे. कांगडा किल्ला हा आणखी एका कारणासाठी ओळखला जातो. या किल्ल्यात अरबो रुपयांचा खजिना लपवलेला असल्याच्या अनेक कथा या भागातील स्थानिक सांगतात. आत्तापर्यंत हा खजिना शोधण्याचा प्रयत्न हजारोंनी केला आहे, मात्र त्यांना यश मिळाले नाही. पण खजिन्यासाठी नाही तर या किल्ल्याची भव्यता आणि त्यातील गुढता अनुभवण्यासाठी या किल्ल्याला एकदा तरी भेट द्या असे आवाहन पर्यटकांना करण्यात येते. (Social News)
हिमाचल प्रदेश या राज्याची ओळख त्यातील मंदिरे आणि निसर्गासाठी आहे. यासोबतच हिमाचलप्रदेशमधील कांगडा किल्लाही प्रेक्षणीय आहे. भारतातील सर्वात भव्य किल्ला म्हणून या कांगडा किल्ल्याची ओळख आहे. मात्र याबाबत फारशी माहिती नसल्यामुळे फार कमी पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. धौलाधर पर्वतरांगांमध्ये असलेला हा किल्ला महाभारतकालीन कथांमध्येही उल्लेख असलेला एकमात्र किल्ला आहे. हिमाचल प्रदेश येथील प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ धर्मशाळा येथून हा किल्ला फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. हजारो वर्षांचा इतिहास जपणारा हा किल्ला बियास नदिच्या खो-याजवळ असल्यामुळे निसर्गाचे वरदान या किल्ल्याला लाभले आहे.
या भव्य किल्ल्याची उभारणी कटोच राजवंशाचे महाराज सुशर्म चंद्र यांनी सुमारे 3500 वर्षापूर्वी केली. हेच सुशर्म चंद्र महाराज महाभारत युद्धातही सहभागी झाले होते. (Indian Fort)
त्यामुळे महाभारत काळापासून असलेला हा किल्ला एक आश्चर्य बनून राहिला आहे. महाभारत युद्धामध्ये महाराजा सुशर्म चंद्र हे पांडवांच्या बाजुने लढत होते. आपल्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी त्यांनी हा किल्ला बांधल्याची माहिती आहे. महाराज सुशर्म चंद्र हे भगवान विष्णुचे उपासक होते. धार्मिक वृत्तीच्या या राजांनी या किल्ल्यावर भव्य असे मंदिर उभारले होते. तेथे भव्य अशा देवतांच्या मुर्ती स्थापित केल्या होत्या. राजा सुशर्म चंद्र या देवतांना अनेकवेळा मौल्यवान दागिने अर्पण करीत असत. असे केल्याने पुण्य प्राप्त होईल असा राज्यकर्त्यांचा विश्वास होता. राजांसह जे अन्य भाविक या मंदिरात येत असत, तेही देवांना त्यांच्यापरीनं सोने आणि चांदी अर्पण करीत असत, त्यामुळे या मंदिरात खूप मोठा खजिना जमा झाला होता. (Social News)
==========
हे देखील वाचा : Temple : नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची वैशिष्ट्ये
Egypt : 5000 वर्षापूर्वीच्या राणीच्या थडग्यात सापडलं असं काही !
==========
त्यासाठी तब्बल 21 विहिरी बांधण्यात आल्या. त्यावरुनच हा किती मोठा खजिना असेल, याची कल्पना करता येते. कटोच शासकांनी केलेल्या लढायांमध्ये विजय मिळाल्यावर जे धन मिळत गेले, त्या धनाची भरही या खजिन्यात झाली. त्यामुळे प्रत्येकवेळी विहिरींची संख्या वाढत गेल्याचे सांगितले जाते. अर्थात या विहिरी या भव्य किल्ल्यात कुठे बांधल्या हे मात्र गुढ राहिले. या सोन्यानं भरलेल्या विहिरींची चर्चा मात्र खूप झाली. हिच चर्चा गझनीच्या महमूदच्याही कानावर गेली.त्यानांही या किल्लावर आक्रमण केले आणि या सोन्यानं भरलेल्या विहिरी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याही हाती अपयश आले. गझनीच्या महमूदनंतर या किल्ल्यातील खजिन्याचा मोह अकबर आणि ब्रिटीशांनाही पडला. त्यांनीही या किल्ल्यावर आक्रमण केले आणि खजिन्याचा शोध घेतला. मात्र त्याचा ठावठिकाणा शोधण्यात अपयश आले. (Indian Fort)
==========
हे देखील वाचा : Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेला निलेश चव्हाण आहे तरी कोण?
Madhya Pradesh : साप चावला आणि ४७ माणसं २७९ वेळा मेली..
==========
या किल्ल्याजवळ लक्ष्मी नारायण, भगवान महावीर, अंबिका देवी यांची मंदिरे आहेत. या मंदिरात आजही पूर्वापार प्रथेप्रमाणे पूजा होता. कांगडा किल्ला किती भव्य आहे, याचा अंदाज त्याच्या दरवाजांच्या संख्येवरुन येतो. या कांगडा किल्ल्याला 11 भव्य दरवाजे आहेत. या प्रत्येक दरवाज्याचा उपयोग तत्कालीन काळी वेगवेगळ्या कारणासाठी होत असे. या किल्ल्याची बांधणी मजबूत आहे. 1905 मध्ये कांगडा शहर भूकंपानं हादरलं होतं. भारतातील सर्वात भीषण भूकंपापैकी हा भूकंप होता. या भूकंपात किल्ल्याचे फार थोडे नुकसान झाले. हा किल्ला ज्या राजांनी बांधला त्या कटोच राजवंशाचे आजही अस्तित्व आहे. त्यांच्यासाठी आणि तमाम भारतीयांसाठी हा किल्ला महाभारतकालीन इतिहासाची महती सांगणारा साक्षीदार आहे. (Social News)
सई बने