आसाम मधल्या जतिंगा गावातली ही रहस्यमयी आणि खरी गोष्ट आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर असा दोन महिन्यांचा काळ आणि संध्याकाळची ६ ते ९ ची वेळ. जतिंगा गाव जे चारही बाजूंनी हिरव्यागार जंगलांनी वेढलेलं आहे. हवेत हळू हळू धुकं पसरायला लागलंय आणि हलका पाऊस पडतोय. असं निसर्गरम्य वातावरण तयार होत असताना अचानक आकाशातून हजारोच्या संख्येने पक्षी खाली येतात. झाडांवर, जमिनीवर आणि गावातील घरांवर जोरात आदळतात आणि दुसऱ्या क्षणाला रस्त्यावर मेलेल्या हजारो पक्ष्यांचा सडा पडलेला दिसतो. किंगफिशर, टायगर बिटर्न, लिटल इग्रेटसारखे सुंदर पक्षी रस्त्यावर मारून पडलेले आहेत, असं भयानक दृश्य दिसतं. असं वाटतं की, सगळ्या पक्ष्यांंनी मिळून एकत्र आत्महत्या केलीये. ऐकायला खूप भयानक आणि काल्पनिक वाटेल,पण ही सत्य घटना आहे आणि ही घटना जतिंगा गावात दरवर्षी घडते. तर ही गोष्ट आहे, Jatinga Birds Suicide Mysteryची. आता ही रहस्यमय घटना का घडते? यामागचं नेमकं कारण काय ? जाणून घेऊ. (Jatinga Village)
जतिंगा हे आसाममधलं दिमा हसाओ जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे. १९०५ ला या गावात एक विचित्र घटना घडली. तेव्हा गावात एका जंगली सिंहाची दहशत होती. एकदा गावकऱ्यांपैकी एकाची म्हैस अचानक गायब झाली. गावकऱ्यांना वाटायला लागलं की, कदाचित त्या सिंहाने तर तिला नेलं नसेल? म्हणून मग सगळे गावकरी तिला शोधायला जंगलात गेले आणि जंगलात तिथे त्यांना जे दिसलं ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली! रात्रीच्या अंधारात, एक नाही, दोन नाही, तर जवळपास हजारो पक्षी रस्त्यावर मरून पडलेले होते. गावकऱ्यांना काहीच कळलं नाही, हे पक्षी इथं कसे मरतायत? आणि त्याच रात्रीपासून हा सिलसिला सुरू झाला. गावकरी हैराण तर झाले, पण त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण मग काही दिवसांनी हे भयानक दृश्य पुन्हा दिसलं. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात, रात्री ६ ते ९ च्या दरम्यान, धुकं आणि हलक्या पावसात, पक्षी आकाशातून खाली येऊन मरायचे.(Top Stories)
तिथल्या दिमासा आणि झेमे नागा आदिवासींना वाटायला लागलं की, जंगलात अशी काहीतरी दिव्य शक्ती आहे, जी पक्ष्यांना मारतेय. तसं या काळात या मागचं नेमकं कारण काय? हे सांगायला सायन्स इतकं प्रगत नव्हतं. मग या घटनेवर लोककथा तयार झाल्या. अजूनही तिथली लोकं मानतात की, जंगलात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पुरणातल्या काही आत्मा भटकत असतात किंवा आपल्याला देवाने शाप दिलाय. ज्या पक्ष्यांना आपल्या जादूत अडकवतात आणि ते मरतात. (Jatinga Village)
१९५० मध्ये जतिंगाच्या या गूढ घटनेने पक्षीतज्ज्ञांचं लक्ष वेधलं. भारताचे प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ ‘सलीम अली’ ज्यांना भारताचे ‘Bird Man’ म्हणून ओळखलं जातं, त्यांनी जतिंगाबद्दल ऐकलं आणि त्यावर अभ्यास केला. त्यांनी सांगितलं की, ही घटना फक्त सितंबर-ऑक्टोबरमध्ये, धुकं आणि हलक्या पावसात, रात्री ६ ते ९ च्या दरम्यानच घडते. त्यांना वाटलं की कदाचित गावातले आर्टिफिश्यल लाइट्स पक्ष्यांना attract करत असतील, ज्यामुळे ते जमिनीवर आपटतात आणि मरतात. पण त्यांना याचं ठोस कारण सापडलं नाही. सलीम अली यांच्या “The Book of Indian Birds” या पुस्तकात जतिंगाचा उल्लेख आहे. त्यांनी पक्ष्यांना मृत्यू नैसर्गिक कारणाने होत असावं असं सांगितलं, मात्र ठोस निष्कर्ष सांगितला नाही. १९६० मध्ये काही भारतीय आणि ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जतिंगाला भेट दिली. त्यांनी पाहिलं की, ही घटना एका प्रजातीच्या पक्ष्यांपुरती मर्यादित नाही तर, किंगफिशर, ब्लॅक ड्रोंगो, टायगर बिटर्न यांच्यासारख्या बऱ्याच प्रजाती एकाच वेळी मरतात. यामुळे जतिंगाचं रहस्य आणखी गूढ बनत गेलं.(Top Stories)
१९९७ साली, भारत सरकारने जतिंगावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला गेला. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने ‘सुधीर सेनगुप्ता’ यांच्या नेतृत्वाखाली १० जणांची टीम जतिंगाला पाठवली. ते बरेच महिने गावात राहिले आणि पक्ष्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? हे शोधण्याचा प्रयत्न केला. या संशोधनात धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सुधीर सेनगुप्ता यांनी सांगितलं की, जतिंगातली ही घटना जगात एकच नाहीये, तर मिझोराम, मलेशिया, आणि फिलिपिन्समध्येही अशा घटना घडल्या आहेत, जिथं लाखो पक्षी असेच मरतात. हे पक्षी जेव्हा मरतात तेव्हा त्यांचं वागणं विचित्र होतं, असं वाटतं की, कोणीतरी त्यांच्यावर जादूटोणा करतंय. मरायच्या आधी ते खूप आक्रमक होतात आणि झाडं किंवा भिंतीवर आपटतात. जेव्हा या मेलेल्या पक्ष्यांची तपासणी केली, तेव्हा सगळ्या पक्ष्यांचं पोट रिकामं होतं. जतिंगासारख्या जंगलात खायला भरपूर वनस्पति आणि फळं असूनसुद्धा, पक्षी काहीच खात नाहीत. ज्यामुळे हे रहस्य अधिकच गूढ बनत गेलं.
==============
हे देखील वाचा : Bhavesh Bhatia : दृष्टिहीन तरीही तेजस्वी यशाचा प्रवास, वाचा भावेश भाटिया यांची प्रेरणादायी कथा
==============
सेनगुप्ता यांनी याला सायंटिफीक रिजन्स दिले. पहिलं असं की, जतिंगात काही विषारी वनस्पती आहेत, ज्यामुळे पक्षी खाणं बंद करतात. शिवाय, धुकं आणि जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांना नीट दिसत नाही आणि ते झाडांवर किंवा भिंतींवर आपटतात. दूसरं म्हणजे जतिंगाच्या भौगोलिक स्थानामुळे magnetic फील्डमध्ये बदल होतात, ज्यामुळे पक्ष्यांची दिशा कळत नाही आणि गावातले दिवे पक्ष्यांना attract करतात आणि धुक्यामुळे दिशाभूल होऊन ते आपटतात. त्यामुळे ते इथल्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. (Top Stories)
आज २०२५ मध्ये सुद्धा जतिंगाचं रहस्य पूर्णपणे उलगडलेलं नाही. आजही सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हजारो पक्षी जतिंगात येतात आणि मरतात. ज्यात भारताच्या इतर भागातले आणि अगदी परदेशी प्रजातींचे पक्षीसुद्धा दिसतात. जतिंगाच्या दिमासा आणि झेमे नागा आदिवासींमध्ये अनेक कथा आहेत. एका कथेनुसार, जंगलात एक प्राचीन देवता वास करते, जी पक्ष्यांवर जादूटोणा करून आपल्या जाळ्यात अडकवते. दुसऱ्या कथेनुसार, हे पक्षी म्हणजे गावातील मृत आत्म्यांचं प्रतीक आहेत, जे दरवर्षी आपलं दुखः व्यक्त करण्यासाठी येतात. तुम्हाला रहस्याबद्दल काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics