९ जून रोजी मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर दिवा स्थानकाजवळ कसारा ते सीएसएमटी या लोकलमधून पडून आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुसऱ्या मार्गावरून जाणाऱ्या एक्सप्रेसचा लोकल बाहेर लटकणाऱ्या लोकांना धक्का लागला आणि त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. या दुर्घटनेमध्ये १२ ते १३ लोकं खाली पडले आणि त्यातल्या ८ लोकांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. मुंबईची वाहिनी अशी संपूर्ण जगभरात ओळख असलेल्या मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र अजूनही या प्रवाशांना त्यांच्या जीवाची हमी मिळत नाही. (Mumbai Local)
या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे की, मुंबई उपनगरासाठी तयार होणाऱ्या सर्व लोकलमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सुविधा असेल. भविष्यासाठी ही जरी तरतूद असली तरी इतिहासात मात्र अशा घटनांमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. रेल्वेच्या मागील २० रेकॉर्ड बघता, या २० वर्षांमध्ये अर्थात २००५ ते जुलै २०२४ पर्यंत तब्बल ५१,८०२ लोकांनी लोकल प्रवासादरम्यान आपले प्राण गमावले आहेत. मुंबई लोकलमध्ये दरवाजावर लटकून स्वतःच्या जीवाशी खेळ करून लोकं प्रवास करतात. मागील अनेक वर्षांपासून हे चित्र आहे. मात्र यात आजही काहीच सुधारणा नाही. जी परिस्थिती काळ होती तीच किंबहुना त्याहून अधिक बिकट परिस्थिती आज आहे. या मोठ्या दुर्घटनेने अनेकांच्या जुन्या जखमांवरची खपली निघाली असेल. आजवर मुंबई लोकलचे अनेक मोठमोठे अपघात झाले असून यात अनेकांनी आपला जीव गमावला किंवा काहींना कायमस्वरूपाचे अपंगत्व आले आहे. (Marathi Top News)
गाड्यांमधून पडणे, रुळ ओलांडणे या मुख्य कारणांमुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दररोज सात प्रवासी आपला लोकल प्रवासादरम्यान जीव गमावत आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे, ट्रान्सहार्बर या सर्व रूटवर अनेक अपघात आजवर घडले आहेत. २०२३ मध्ये, ठाण्यात रेल्वे लाईन क्रॉसिंगमुळे सर्वाधिक १७९ मृत्यू झाले. त्यानंतर पश्चिम मार्गावर बोरिवली स्थानकाजवळ १५४ मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर २०२४ सालामध्ये ठाण्यात १५१ तर बोरिवलीमध्ये १३७ लोकांचे मृत्यू रेल्वे क्रॉसिंगच्या वेळी झाले होते. (Top Marathi Headline)
आजच्या घडीला पश्चिम रेल्वेवर एकूण १,३९४ उपनगरीय गाड्या धावत असून, यातून दररोज तब्बल ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. तर मध्य रेल्वेवर १,८१० उपनगरीय गाड्या आहेत यातून दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करतात. २०२४ पासून आजवर २,४६८ लोकांचा लोकल प्रवासादरम्यान मृत्यू झाला आहे. ट्रेनमधून पडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये २०२३ सालात मध्य रेल्वेच्या कल्याणमध्ये सर्वाधिक ११४ मृत्यू झाले, त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या वसईमध्ये ४५ लोकांनी लोकलमधून पडून आपले प्राण गमावले. तर २०२४ मध्ये पुन्हा कल्याणमध्ये सर्वाधिक ११६ मृत्यू झाले, तर वसईमध्ये २०२३ च्या तुलनेत ४५ मृत्यू झाले. (Marathi Latest Marathi )
==========
हे देखील वाचा : Mumbai Local : ८ प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे बोर्डाला जाग; घेतले मोठे निर्णय
==========
२००९ ते जून २०२४ दरम्यान मध्य रेल्वेवर २९,३२१ जणांना आपला जीव गमवावा लागला. बहुतेक अपघात हे रुळ ओलांडताना, काही अपघात गर्दीच्या गाड्यांतुन पडल्याने तर काही अपघात रेल्वे रुळाला लागून असलेल्या खांबांमुळे आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या फूटबोर्डमधील अंतरामुळे झाले आहे. मागील १५ वर्षांत, प्रवासी वाहून नेण्याची लोकलची क्षमता वाढताना, लोकल अपघातातील मृत्यूची संख्या कमी झाली असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे. २००९ मध्ये १७८२ मृत्यू आणि १६१४ लोक जखमी झाले होते. २०२३ मध्ये १२२१ मृत्यू आणि ९३८ जखमी झाले होते. (Top Marathi News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics