Home » Mumbai Local : ८ प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे बोर्डाला जाग; घेतले मोठे निर्णय

Mumbai Local : ८ प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे बोर्डाला जाग; घेतले मोठे निर्णय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mumbai Local
Share

९ जून रोजी मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर दिवा मुंब्रा या स्थानकादरम्यान भीषण अपघात घडला. कसारा ते सीएसएमटी या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले आहे. या बातमीने संपूर्ण मुंबईसोबतच देशाला देखील हादरवले. दरवाजामध्ये फुटबोर्डवर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकमेकांचा धक्का लागला आणि हे प्रवासी खाली कोसळले. यात महिलांचा देखील समावेश होता. या अपघातानंतर पुन्हा एकदा प्रवाशांच्या जीवावर बेतणाऱ्या मुंबई लोकल प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Mumbai Local)

दररोज लाखो लोकं मुंबईमध्ये लोकलने प्रवास करतात. अनेक प्रवाशांसाठी हा प्रवास म्हणजे जीवाशी खेळच आहे. नेहमीच मुंबई लोकलमधून पडून प्रवाशांच्या मृत्यूच्या बातम्या समोर येतात. आजचा हा लोकल अपघातात हा खूपच भीषण होता. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले आणि त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या अपघाताने रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडले असून, रेल्वेने महत्वाचे तीन निर्णय घेतले आहे. (Top Stories)

मध्य रेल्वेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्य जनसंपर्क अधिकारी असलेल्या स्वप्नील नीला यांनी हे तीन निर्णय सांगितले आहे. यातला पहिला निर्णय म्हणजे, मुंबई उपनगरासाठी उत्पादन सुरू असलेल्या सर्व रेकमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सुविधा असतील. २३८ एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत. मुंबई उपनगरातील या रेकमध्ये सेवेत असलेल्या सर्व रेकची पुनर्रचना केली जाईल आणि दरवाजे बंद करण्याची सुविधा दिली जाणार आहे. (Marathi News)

Mumbai Local

दुसरा निर्णय म्हणजे, आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावणार आहोत. असा निर्णय आता घेतला आहे. पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून आपोआप दरवाजा बंद होणाऱ्या ट्रेन रेल्वेच्या सेवेत असणार आहे. (Todays Top Headline)

कल्याण-कसारा आणि कल्याण कर्जत अशी तिसरी चौथी लाईन प्लॅन केली आहे. सीएएमटी – कुर्ल्यापर्यंत काम पूर्ण झाले असून, त्यापुढील काम सध्या सुरू आहे. या रूटवर १५ आणखी लोकल वाढवण्याबाबत काम सुरू आहे. सोबतच मुंबईत १२ ऐवजी १५ लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याबद्दल देखील विचार होत आहे. कल्याण ते कसारा तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचे नियोजन केले जात असून, सीएसएमटीपर्यंत ६ वी लाईन टाकली जाणार आहे. तसेच कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या चौथ्या लाईनचाही प्लान केला आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. (Top Marathi Headline)

दादरपासून दिव्यापर्यंत किंवा सीएसएमटी पर्यंत पाचव्या सहाव्या लाईनची प्लानिंग केली आहे. ही प्लॅनिंग कुर्ल्यापर्यंत पूर्ण झाली आहे. त्यापुढे जमीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आपण सिग्नल सिस्टिम अपडेट केली आहे. पायाभूत सुविधाही आपण अपग्रेड करत आहोत. पायाभूत सुविधा अपडेट केल्यावर लोकलच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहे. (Social News)

==========

हे देखील वाचा : Mumbai Local : दुर्दैवी : दिवा- मुंब्रा लोकल अपघातात सहा जणांचा मृत्यू

==========

अपघात कसा झाला?
मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी सांगितले की, मुंब्राहून दिव्याला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गार्डने या अपघाताची माहिती बोर्डाला दिली. ही घटना मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान डाउन/फास्ट लाईनवर घडली. कसाराहून येणाऱ्या लोकल ट्रेनच्या फूटबोर्डवर आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणारे लोक एकमेकांवर आदळले आणि खाली पडले. (Marathi Latest News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.