राज्यातील लाऊडस्पीकरच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना धमकीचे पत्र आले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी बुधवारी सांगितले की, मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राज ठाकरेंना काही झाले तर ते महाराष्ट्र पेटवू, असा इशाराही त्यांनी दिला.
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, ‘माझ्या कार्यालयात मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. अजानबाबत तुम्ही जे काही करत आहात, ते तात्काळ थांबवा, अन्यथा तुम्हाला ठार मारण्यात येईल, असे पत्रात लिहिले आहे. तुम्ही राज ठाकरेंसोबत फिरताय, तुम्हाला सोडणार नाही आणि राज ठाकरेंनाही मारणार.
‘…तर महाराष्ट्र पेटेल’
बाळा नांदगावकर म्हणाले, ‘लाऊडस्पीकरवरून सुरू असलेल्या आंदोलनासाठी आम्हाला ही धमकी देण्यात आली आहे.’ राज ठाकरेंचे केसही उपटले तर महाराष्ट्र पेटेल, असा इशारा त्यांनी दिला. हे पत्र कोणी लिहिलंय ते आम्हाला माहीत नाही.. हे पत्र पोस्टातून आलेलं आहे.’ त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे यांची भेट घेऊन राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

====
हे देखील वाचा: उत्तर प्रदेश सरकार मुंबई मध्ये नवीन कार्यालय करणार सुरु- योगी आदित्यनाथ
====
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बाळा नांदगावकर यांच्या सुमारे 20 मिनीट चर्चा झाली. यानंतर ते शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. तर बाळा नांदगावकर यांनी काल मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि पोलिस सह आयुक्त (गुन्हे) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे.
दरम्यान मनसेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोलिस नोटीसा पाठवत आहेत. मनसेविरोधातील कारवाईवर राज ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत -जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही’, असा इशारा त्यांनी दिला होता.

====
हे देखील वाचा: नवनीत राणा यांचे MRI फोटो व्हायरल झाल्यानंतर BMCची लीलावती रुग्णालयाला नोटीस
====
मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आधार घेत राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबईसह राज्यातील 28 हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे, तडीपार नोटीस बजावणे यासारख्या कारवाया करीत आहेत.