हिमाचल प्रदेशमध्ये अनेक पौराणिक मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरांबाबत रहस्यमयी कथा सांगण्यात येतात. त्यातील एक मंदिर म्हणजे, प्रत्यक्ष मृत्यूदेवता म्हणून उल्लेख होत असलेल्या यमराजाचे मंदिर. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे 84 मंदिरांचा एक समूह आहे. याच मंदिरांमध्ये यमराजाचे मंदिरही आहे. या यमराजाच्या मंदिरात प्रत्यक्ष यमराज आणि चित्रगुप्त यांचा निवास असल्याचे सांगितले जाते. कारण या मंदिरात दोन स्वतंत्र खोल्या आहेत. यमराज आणि चित्रगुप्त यांच्या या खोल्या आहेत. या मंदिरामध्ये जिवंतपणी जायलाही भीती वाटते. पण मृत्यूनतंर प्रत्येक मनुष्याचा आत्मा या मंदिरामध्ये येतोच. येथे चित्रगुप्त या मनुष्याच्या कर्माचा हिशोब करतात आणि मग हा आत्मा स्वर्गात जाणार की नरकात, याचा निकाल दिला जातो. यामुळेच या मंदिराभोवती गुढ असे वातावरण आहे. स्थानिक या मंदिराला यमराजाची कचेरी असं म्हणतात. भाऊबीजेच्या दिवशी मात्र येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. अशा या रहस्यमयी यमराज मंदिराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. (Himachal Pradesh)
हिमाचल प्रदेशमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्याचील भरमौर येथील यमराजाचे मंदिरही पौराणिक असून त्याच्याबाबत अनेक रहस्यमयी कथा सांगण्यात येतात. दगडाच्या सहाय्यानं उभारण्यात आलेल्या या मंदिराला हजारो वर्ष झाली आहेत. साध्या वाटणा-या या मंदिराच्या गाभा-याच दोन खोल्या आहेत. या खोल्या म्हणजे, यमराज आणि चित्रगुप्त यांची निवासस्थाने असल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात यमराज आणि चित्रगुप्त हे प्रत्येक मनुष्याच्या कर्माचा हिशोब ठेवतात. मृत्यूनंतर प्रत्येक आत्मा या मंदिरात येतो. तिथे त्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. स्वर्ग किंवा नरक यांची प्राप्ती होते. याशिवाय या मंदिरात चार अदृष्य दरवाजे असल्याचेही सांगितले जाते. सोने, चांदी, तांबे आणि लोखंडापासून बनलेल्या या दरवाजातून प्रत्येक आत्म्याला जावे लागते. ज्याचे जसे कर्म तसा त्याला तो दरवाजा मिळतो, असेही सांगितले जाते. याबाबत गरुड पुराणातही उल्लेख आहे. (International News)
या अशा रहस्यमयी कथांमुळेच या मंदिराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. भरमौर येथे हे यमराज मंदिर 84 मंदिराच्या समूहाचा एक भाग आहे. हिमाचल प्रदेशमधील या सर्व भागात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. मात्र हे भाविक या यमराज मंदिरात जाणे टाळतात. यातील रहस्यमयी कथा आणि यमराजाचे निवासस्थान म्हणून या मंदिराची असलेली ओळख यामुळे भाविक यापासून दूर रहाणेच पसंत करतात. असे असले तरी वर्षातील फक्त एकाच दिवशी या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात. दीपोत्सवातील भाऊबीजेच्या दिवशी याच यमराज मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक जमा होतात. त्यामागेही एक कथा सांगितली जाते. यमराज हे या दिवशी आपली बहिण यमुनाला भेटण्यासाठी येतात. या दिवशी यमराजांची कृपादृष्टी असते. (Himachal Pradesh)
त्यामळे ते सर्वांना भरभराटीचा आशीर्वाद देतात, अशी भावना आहे. यामुळेच भाऊबीजेच्या दिवशी या मंदिरात मोठी पूजा केली जाते. शिवाय धनतेरसच्या संध्याकाळी या मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात दिव्यांची आरासही केली जाते. या दिवशी दिवा लावल्याने व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतो, अशीही स्थानिकांची धारणा आहे. हे मंदिर जिथे आहे, त्या चौरासी संकुलात भगवान शंकराच्या मंदिरातून थेट कैलास पर्वतावर जाण्यासाठी गुप्त मार्ग असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मणिमहेश यात्रेत सहभागी होणारे भाविक येथे आवर्जून भेट देतात. कारण त्यांना यमराज, मृत्यूपासून अभय देतात असे सांगितले जाते. (International News)
==============
हे देखील वाचा ; Nashik : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
Tamil Nadu : मानसिक तणाव आहे, मग या मंदिरात नक्की जा !
==============
यमराजाचे एकमेव मंदिर म्हणूनही भरमौल येथील मंदिराचा उल्लेख होतो. यमराजाचा दरबार भऱतो, म्हणून ओळखेले जाणारे हे मंदिर बाहेरुन अगदी एखाद्या घरासारखे दिसते. हजारो वर्षापूर्वी हे मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. हिमाचल प्रदेशमध्ये मंदिर बांधणीसाठी दगडांमध्ये खाचे करण्यात येतात. त्यात दगड अडकवून मंदिरे बांधण्यात येतात. हजारो वर्षापासून अशा पद्धतीनं उभारण्यात आलेली ही मंदिरे येथील वादळी पावसातही शाबूत राहिली आहे. हे यमराज मंदिरही अशाच प्रकारे आहे. हे मंदिर कधी आणि कोणी बांधले याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र सहाव्या शतकात चंबाच्या राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख एका शिळेवर आहे. 1950 नंतर महाराज कृष्ण गिरी यांनीही या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची माहिती आहे. चौरासी संकुलात बांधलेल्या या मंदिरासमोर आसन असून ते चित्रगुप्ताचे आसन म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय मंदिरासमोर पायऱ्या आणि एक गुप्त वाद्य बसवलेले आहे. असे म्हटले जाते की, या गुप्त उपकरणाने यमराज प्रत्येकाच्या जीवनाचा हिशोब घेतात. तसेच, मंदिराच्या शेजारी पायऱ्या आहेत. या पाय-यांना स्वर्गात जाण्याचा मार्ग म्हणून पुजण्यात येते. (Himachal Pradesh)
सई बने