यंदा मे महिन्यात जवळपास संपूर्ण राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. संपूर्ण मे महिन्यात सगळीचकडे फक्त ढगाळ वातावरण होते. या अशा बेमोसमी पाऊसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा मात्र नक्कीच कमी झाला होता. जून महिना लागला तशी सगळ्यांनाच पाऊसाची आस होती. शेतकऱ्यांपासून ते सामान्यलोकांपर्यंत सर्वांनाच जोरदार पाऊस येणे अपेक्षित होते. मात्र जूनचे पहिले पंधरा दिवस तर कोरडेच गेले. मधेमधे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. पण आता उर्वरित पंधरा दिवस राज्यासाठी समाधानकारक असणार आहे. (Monsoon News)
याची सुरुवात देखील नुकतीच झाली. पुन्हा एकदा मान्सून आता राज्यात सक्रिय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. सध्या मुंबई, पुण्यासह कोकणात देखील पावसाचा जोर पाहायला मिळत असून या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खासकरून पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. पर्यटकांनी याकाळात सावधानी बाळगणं आवश्यक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. अजून पुढील तीन ते पाच दिवस असाच पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. पाऊस चांगला पडत असल्याने आता शेतकऱ्यांनी देखील पेरणी करून घेण्यास हरकत नाही अशी माहिती पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी दिली आहे. (Marathi News)
दरम्यान काळ १६ जून रोजी मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता येणारी काही दिवसांमध्ये देखील असाच जोरदार पाऊस होणार असलयाचे सांगितले आहे. हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, पुढील २४ तासांंमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Marathi Trending News)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज १७ जून २०२५ रोजी कोकणात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. सोबतच मुंबई आणि ठाणे परिसरात देखील आज १७ जून रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यातील शहरांबद्दल सांगायचे झाले तर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा आणि त्याचा घाटमाथा असलेल्या भागासोबतच अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. (Top Marathi Headline )
तर पश्चिम महाराष्ट्राबद्दल सांगायचे झाले तर पुणे शहरात आज मध्यम पावसाची शक्यता असून, पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूर या भागांतील डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये संज्ञा जास्त पाऊस नसल्या तरी काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. (Marathi Latest NEws)
========
हे देखील वाचा : Canada : प्रोजेक्ट पेलिकनमुळे खलिस्तानवाद्यांना हादरा !
========
विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. बहुतेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, नागपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत काही भागांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. (Top Stories)
दरम्यान काळ १६ जून रोजी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पाऊसामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी साचले होते. आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले होते. शिवाय कल्याण आणि डोंबिवलीमध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळाली. त्यामुळे इथे देखील सखल भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. (Social News)