सध्या सतत विविध अपघातांच्या बातम्या कानावर येत आहे. दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नावच घेत नाही. एकीकडे लोकं अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतून लोकं अजून बाहेर आले नाही तोवर पुण्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळाने झेप घेतली. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल अचानक कोसळला आणि मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून, एकूण ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये बचाव कार्य वेगाने सुरू असून या दुर्घटनेमध्ये अजूनही २० ते २५ जण वाहून गेल्याची माहिती आहे. (Indrayani River)
रविवारी १५ जून रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही पूल दुर्घटना घडली. या पुलाखाली एक लहान मुलगा अडकला होता. त्याचाही मृत्यू या अपघातात झाला. कुंडमळा येथे रविवारी सुट्टी असल्यामुळे जवळपास ४००० च्या वर पर्यटक फिरण्यास आणि पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यास आले होते. सर्वजण निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत होते. पावसामुळे नदीला पूर देखील आला होता. पुलावर उभे राहून अनेक लोकं निसर्गाचा आनंद घेत होते. हा पूर पाहण्यासाठी लोखंडी पुलावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जवळपास १०० पर्यटक पुलावर उभे होते. शिवाय अनेक टू व्हिलर गाड्या देखील या पुलावरून जा ये करत होत्या. (Marathi News)
हा पूल मुख्यत्वे नागरिकांच्या पायी येण्या-जाण्यासाठीच बनवला होता. या पुलाजवळ प्रशासनाकडून अशा आशयाचा सूचनाफलक देखील लावण्यात आला होता. तरी देखील तिथे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर आठ ते नऊ दुचाकी होत्या. तसेच जवळपास १०० जणांची गर्दी पुलावर होती. त्यामुळे पुअल्वर ओव्हरलोड आला आणि पूल नदीच्या पाण्यात कोसळला. या घटनेमुळे पुलावरील २० ते २५ जण नदीच्या पाण्यात वाहून गेले असून, आतापर्यत ४ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ३ पुरुष आणि एका सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. प्रशासनाने आतापर्यंत ३८ जणांना वाचवल्याची माहिती आहे. (Todays Marathi Headline)
पूल कोसळला तेव्हा काही जण तुटलेल्या पुलाखाली अडकले. काही जण यावेळी बचावले. पण चार जण पुलाच्या अवशेषाखाली दाबले गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. एनडीआरएफच्या पथकाकडून नदीत अजूनही बचावकार्य जारी आहे. तर घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्यात आली आहे. हा पूल ३० वर्षं जुना होता. गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पाण्याचा वेग आणि प्रतिकूल हवामान यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. (Latest Marathi News)
राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ कुंडमळा येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हा पूल १९९५ मध्ये पादचाऱ्यांसाठी उभारला गेला. तो सध्या वाहतुकीसाठी बंद होता. मात्र, त्या पुलावर पर्यटक गेले. त्यातून मोठी दुर्घटना घडली आहे. ग्रामीण भागातील रस्ते आणि त्यावरील पुलांची निर्मिती ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जाते. मात्र, या दोन्ही यंत्रणांनी कोसळलेला पूल आमचा नाही, असा दावा केला आहे. (Top Marathi Headline)
=========
हे देखील वाचा : Israel : इस्रायलचा पॅटर्न आणि मोसादचे प्लॅनिंग !
=========
या घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल.” शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार या घटनेतील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. (Marathi Trending News)