२ सप्टेंबर २०१०, रात्रीचे साधारण १-२ वाजले असतील. मौर्य एक्सप्रेस रांचीहूंन गोरखपुरकडे निघाली होती. घनदाट जंगलातून ट्रेन धावत होती. डब्यात शांतता होती. कोणी आपल्या बर्थवर पांघरुण घेऊन झोपलं होतं, कोणी मोबाईलवर गाणी ऐकतं होतं, तर कोणी घरच्यांशी फोनवर बोलून झोपायच्या तयारीत. सगळं अगदी शांत, नॉर्मल. पण अचानक, ट्रेनला एक जोरदार झटका बसला आणि ती जंगलात थांबली. डब्यातली सगळी मंडळी हडबडून उठली. कोणी म्हणालं, “सिग्नल असेल,” कोणी म्हणालं, “इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झालाय.” पण खरं कारण काय होतं? पण खरं कारण काहीतरी वेगळंच होतं. डब्यात अचानक ३०-४० डाकू घुसले. चाकू, तलवारी, कट्टे घेऊन त्यांनी लुटालूट सुरू केली. सगळे प्रवासी घाबरले, पण एक माणूस शांतपणे बसला होता – बिष्णु प्रसाद श्रेष्ठ, एक रिटायर्ड गोर्खा सैनिक. जेव्हा त्या डाकूंनी एका १८ वर्षांच्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा बिष्णु चा राग अनावर झाला. त्यानं आपली खुकरी काढली आणि मग जे झालं, ते एखाद्या मूवीपेक्षा कमी नव्हतं.नक्की काय झालं ते जाणून घेऊ. (Bishnu Shrestha)
जेव्हा रात्रीच्या त्या अंधारात जंगलात अचानक ट्रेन थांबली, तेव्हा सर्वांना ती टेक्निकल इश्यूमुळे किंवा सिग्नलमुळे ट्रेन थांबली असं वाटतं होतं. पण तेवढ्यात अचानक ट्रेनवर दगडफेक सुरू झाली. कोणाला काय होतं हे कळायच्या आतचं दारं तोडून ३०-४० माणसं आत घुसले. त्यांच्या हातात चाकू, तलवारी, आणि काहींच्या हातात देसी कट्टे होते. त्या ट्रेनवर डाका पडला होता. काही डाकू यात्री बनून आधीच ट्रेनमध्ये बसलेले होते, ज्यांनी ट्रेनची चैन खेचली होती. आत येताच त्या डाकुनी जोरजोरात शिवीगाळ करत लुटालूट सुरू केली. एक-एक सीटवर जाऊन त्यांनी लोकांना धमकावलं. पर्स, मोबाईल, सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या, घड्याळं, लॅपटॉप… जे हाताला लागेल ते लुटलं. कोणी विरोध केला, तर त्याला ते भयंकर मारहाण करत होते. एका माणसाने आपला लॅपटॉप वाचवायचा प्रयत्न केला, तर त्याच्या डोक्यावर कट्ट्याचा दणका बसला. एका बाईनं सोन्याची बाली द्यायला उशीर केला, तर डाकूंनी ती इतक्या जोरात हिसकावली की तिच्या कानातून रक्तच निघालं. मुलं रडत होती, बायका किंचाळत होत्या, त्या डब्ब्यात दहशतीचं वातावरण होतं. (Top Stories)
रेल्वे पोलीस फोर्स ट्रेनच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुठेतरी होते. या सगळ्या गोंधळात, एक माणूस शांतपणे आपल्या सीटवर बसला होता. त्याचं नाव बिष्णु प्रसाद श्रेष्ठ, वय ३५. भारतीय सेनेच्या ७/८ गोर्खा रायफल्समध्ये नायक असणारे बिष्णु रिटायर्ड होऊन आपल्या गावी, नेपाळला, परतत होते. त्यांच्या कुटुंबाचं आणि भारतीय सेनेचं जुनं नातं होतं. त्यांचे वडील, गोपाल बाबू श्रेष्ठ, यांनीही याच रेजिमेंटमध्ये देशाची सेवा केली होती. बिष्णु यांनी आपल्या सेवेत अनेक कठीण प्रसंग पाहिले होते, पण आज त्यांना असं काही पाहावं लागेल, याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. (Bishnu Shrestha)
जेव्हा डाकू त्यांच्यापाशी आले, तेव्हा त्यांनी शांतपणे आपलं वॉलेट आणि मोबाईल त्यांना दिला. इतक्या शस्त्रधारी डाकूंशी एकट्यानं भिडणं मूर्खपणा होता. पण मग त्यांचं लक्ष काही सीट पुढे गेलं. तिथे पाच-सहा डाकू एका १८ वर्षांच्या मुलीला घेरून उभे होते. तिचे आई-वडील रडत होते, “सोडा तिला, आमचं सगळं घ्या, पण तिला सोडा!” पण डाकू हसत होते, ते त्या मुलीला जबरदस्तीने खेचायचा प्रयत्न करत होते. मुलगी किंचाळत होती, स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होती.(Top Stories)
हे पाहून बिष्णु यांचा राग अनावर झाला. त्यांच्या आतला गोर्खा जागा झाला. ते आपल्या सीटवरून उठले आणि डाकूंना थांबण्याचा इशारा केला. डाकूंना वाटलं, हा एकटा माणूस काय करणार? पण पुढच्या क्षणी बिष्णु यांनी आपली खुकरी काढली. आणि मग जे झालं, ते डाकूंनी स्वप्नातही विचार केला नसेल. बिष्णु त्या मुलीवर जबरदस्ती करणाऱ्या डाकूंवर तुटून पडले. पहिल्या डाकूनं चाकू उगारला, पण बिष्णु यांच्या एका वारानं तो जखमी होऊन खाली कोसळला. दुसरा पुढे आला, पण बिष्णुंनी त्याला खुकरीनं खाली पाडलं. डब्यातले बाकीचे डाकू आता बिष्णुंकडे धावले. आता खरी लढाई सुरू झाली – एकट्या गोर्खा सैनिकाविरुद्ध ३०-४० शस्त्रधारी डाकू! (Bishnu Shrestha)
तो ट्रेनचा डबा रणभूमी बनला. डाकू चाकू आणि तलवारीनं हल्ला करत होते. पण बिष्णु यांनी आपली खुकरी ढाल आणि शस्त्र दोन्ही म्हणून वापरत होते. त्यांची चपळता पाहण्यासारखी होती. एकाच वेळी ते अनेक हल्ले परतवत होते आणि पलटवार करत होते. एका डाकूनं मागून त्यांना पकडायचा प्रयत्न केला, पण बिष्णु यांनी मागे वळून असा वार केला की तो किंचाळत खाली पडला. दुसऱ्या डाकूनं तलवार उगारली, पण बिष्णु यांनी त्याच्या मनगटावर वार करून तलवार खाली पाडली.
=================
हे देखील वाचा : Sampoorna Singh : शेतकरी लढला आणि अख्खी ट्रेनच नावावर केली!
=================
या सगळ्या लढाईत बिष्णु यांनाही जखमा झाल्या. एक चाकू त्यांच्या डाव्या हाताला लागला, खूप रक्त वाहायला लागलं. पण बिष्णु थांबले नाहीत. त्यांच्या लढण्याच्या जिद्दीपुढे दुखणं पळून गेलं होतं. त्यांनी आणखी एक डाकूला खाली पाडलं. आता तीन डाकू मृत्यूमुखी पडले होते, आणि आठ-दहा गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले होते. तो डबा रक्तानं माखला होता. बाकीच्या डाकूंना आता कळलं, हा कोणता साधा माणूस नाहीये. हा तर एकटाच त्यांना भारी पडतोय. त्याच वेळी रेल्वे पोलिस येण्याची भीतीही वाटायला लागली. डाकूंची हिम्मत खचली. त्यांनी आपल्या मृत साथीदारांना आणि जखमी साथीदारांना तिथेच टाकलं आणि लुटलेलं सामान घेऊन ते ट्रेनमधून फरार झाले. (Top Stories)
डाकू पळाल्यावर डब्यात हळूहळू शांतता पसरली. पण ती शांतता भीती आणि धक्क्यात बुडालेली होती. लोक अजूनही थरथरत होते. बिष्णु यांंना सुद्धा गंभीर दुखापत झाली होती. त्यांनी त्या मुलीकडे पाहिलं – ती सुखरूप होती. तिचे आई-वडील रडत रडत बिष्णु यांच्या पायापडू लागले. थोड्या वेळाने ट्रेन पुन्हा चालू झाली आणि पुढच्या स्टेशनवर पोहोचली. पोलीस, रेल्वे अधिकारी, अॅम्ब्युलन्स सगळं तिथे पोहोचलं. प्रवाशांनी सगळी हकीकत पोलिसांना सांगितली – कसं एकट्या बिष्णु श्रेष्ठ यांनी सगळ्यांचा जीव वाचवला. (Bishnu Shrestha)
बिष्णु आणि इतर जखमी प्रवाशांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या डाव्या हाताला अनेक टाके पडले. जेव्हा त्यांना विचारलं, “तू तुझा जीव का धोक्यात घातला?” तेव्हा त्याचं उत्तर अगदी साधं होतं, “मी सैनिक आहे. मला एका मुलीशी असं होताना पाहता आलं नसतं. मला लढावंच लागलं.” बिष्णु रिटायर्ड होते, पण त्यांच्या या धाडसासाठी त्याला सेना मेडल आणि उत्तम जीवन रक्षा पदकासारखे सन्मान मिळाले. रेल्वेनं आणि इतर संस्थांनीही त्यांचा गौरव केला. त्यानं गोर्खा रेजिमेंटचं नाव आणखी उंचावलं.