१९५९ साल, झारखंडमधलं धनबाद. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन DVC अंतर्गत बांधण्यात आलेल्या पंचेत धरणाचं उद्घाटन होणार होतं. या उद्घाटनासाठी खुद्द भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू येणार होते. तेव्हा DVC ने नेहरूनचं स्वागत करण्यासाठी एका 15 वर्षांच्या आदिवासी मुलीला निवडलं जी DVC मध्येच काम करत होती. ठरल्याप्रमाणे उद्घाटन सोहळ्याला नेहरू आले. ती 15 वर्षांची आदिवासी मुलगी एकदम उत्साहात होती. जेव्हा नेहरूंच स्वागत करण्याची वेळ आली तिने नेहरूंना हार घातला आणि नेहरूंनी मजेत तिलाही हार घातला. एवढंच नाही, त्यांनी तिला धरणाच्या पॉवर स्टेशनचं बटण दाबायला सांगितलं, ज्याने प्रोजेक्ट सुरू झाला. म्हणजे धरणाचं उद्घाटन तिच्याच हस्ते झालं. तिला सगळं छान वाटत होतं, पण नकळत तिचं लग्न जवाहरलाल नेहरूंशी (Jawaharlal Nehru Tribal Wife) झालं होतं आणि यामुळेचं तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. कसं? आणि कोण होती ती मुलगी जाणून घेऊ.
१९४० च्या दशकात, झारखंडमधील धनबादमधील कबोना नावाच्या छोट्याशा गावात बुद्धिनी मांझियाईनचा जन्म झाला. आजूबाजूला हिरवीगार डोंगरं, कोळशाच्या खाणी आणि आदिवासी संस्कृती असलेलं हे तिचं गाव होतं. तिच्या संथाल जमातीत रिवाजांचं खूप महत्त्व होतं. आणि त्याचं पालन सगळेच करायचे. बुद्धिनी लहानपणापासूनच मेहनती होती. म्हणून लहान वयातच तिने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन DVC मध्ये काम करायला सुरुवात केली होती. ज्याच्याअंतर्गत धरणं आणि वीज प्रकल्प बांधले जात होते. तिचं आयुष्य सुरळीत सुरू होतं. मग आला तो दिवस जेव्हा पंचेत धरणाच्या उद्घाटनासाठी नेहरूंच स्वागत करण्यासाठी तिला आणि तिच्या एका सहकाऱ्याला नेहरूंना हार घालून त्यांचं स्वागत करण्यासाठी निवडलं. तेव्हा तिचं वय 15 वर्ष होतं. नेहरू उद्घाटनाला येणार म्हणून तिथे हजारो लोक जमले होते. ज्यात बुद्धिनीच्या गावातले लोक सुद्धा होते आणि त्या सर्वांसमोर बुद्धिनी स्टेजवर गेली आणि तिने नेहरूंना हार घातला. नेहरूंनीही तिला खेळीमेळीने हार घातला आणि तिला धरणाचं बटण दाबायला सांगितलं. आणि धरणाचं उद्घाटन करण्यासाठी सांगितलं. तो क्षण तिच्यासाठी अभिमानाचा होता. पण घरी परतताच तिचं आयुष्य उध्वस्त झालं. (Jawaharlal Nehru Tribal Wife)
जेव्हा ती गावात पोहचली तेव्हा गावच्या प्रमुखांनी तिला बोलावलं आणि सांगितलं, “तू नेहरूंना हार घातलास, म्हणजे तू त्यांच्याशी लग्न केलंस.” तिला काही कळालं नाही. संथाल जमातीच्या रिवाजात, हारांची देवाणघेवाण म्हणजे लग्न. असं मानलं जायचं. त्यामुळे बुद्धिनीवर जमातीच्या बाहेरच्या माणसाशी म्हणजेच जवाहरलाल नेहरू यांच्याशी लग्न’ केल्याचा आरोप तिच्यावर ठेवला गेला. तिने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचं गावकऱ्यांनी ऐकलं नाही. तिला गावातून हाकलून देण्यात आलं. त्या १५ वर्षांच्या मुलीला आपलं सामान उचलून गाव सोडावं लागलं. तिच्या स्वतःच्या लोकांनी तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, आणि कोणीही तिला मदत केली नाही. शेवटी, त्या १५ वर्षांच्या मुलीने आपलं छोटंसं सामान उचललं आणि गाव सोडलं.(Top Stories)
==================
हे देखील वाचा : Indian Economy : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
===================
गावातून हाकलल्यानंतर बुद्धिनीचं आयुष्य आणखी कठीण झालं. १९६२ मध्ये DVC ने तिला नोकरीवरून काढलं, कोणतंही कारण न देता. ती पश्चिम बंगालमधल्या पुरुलियाच्या सलतोरा गावात गेली आणि मजुरी करून जगू लागली. काही वृत्तपत्रांनी तिला “नेहरूंची आदिवासी पत्नी” असंही म्हटलं. पण बुद्धिनीला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. ती फक्त जगण्यासाठी लढत होती. काही वर्षांनी पश्चिम बंगालमधील कोळशाच्या खाणीत काम करताना ती सुधीर दत्त नावाच्या व्यक्तीला भेटली. ते दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. पण त्यांचं आयुष्य गरिबीतच गेलं. बुद्धिनीने अनेकदा DVC मधली नोकरी परत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण नोकरी पुन्हा मिळालीच नाही. 1985 मध्ये, दोन पत्रकारांनी तिची कहाणी शोधली आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंत पोहोचवली. तब्बल २३ वर्षांनंतर बुद्धिनीला तिची DVC मधली नोकरी परत मिळाली, आणि ती निवृत्तीपर्यंत तिथे काम करत राहिली.(Jawaharlal Nehru Tribal Wife)
पण प्रश्न असा आहे, तिची चूक काय होती? एका १५ वर्षांच्या मुलीला फक्त एका रिवाजामुळे गावातून हाकललं गेलं, नोकरी गमवावी लागली, आणि आयुष्यभर दुख सहन करावं लागलं. बुद्धिनीचं नोव्हेंबर २०२३ मध्ये निधन झालं. तिच्या मृत्यूनंतर झारखंडमधले लोक तिच्यासाठी नेहरूंच्या पुतळ्याजवळ स्मारक उभारण्याची मागणी करतायत. तिची कहाणी जास्त कोणालाच माहिती नाही.