Home » IPL 2025 चे Chokers यंदा तरी जिंकणार का?

IPL 2025 चे Chokers यंदा तरी जिंकणार का?

by Team Gajawaja
0 comment
IPL 2025
Share

2016, बेंगलुरुचं एम. चिन्नास्वामी स्टेडियम. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची टीम फायनलमध्ये आहे, सनरायझर्सच्या हैदराबादने RCB ला 208 Runsचं टार्गेट दिलंय. RCB ची २०१६ ची team म्हणजे विराट कोहली ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स के एल राहुलसारखे धडाडीचे बॅट्समन त्यांच्याकडे होते. पण काय झालं? गेलच्या ७६ आणि विराटच्या ५४ रन्सच्या धुवादार बॅटिंगनंतर सुद्धा RCB आठ रन्सने हारली. स्टेडियममध्ये शांतता, चाहत्यांचे हिरमुसलेले चेहरे… RCB ची तिसरी फायनल, आणि पुन्हा एकदा ट्रॉफी हातातून निसटली. पण जसं बॉलीवूड मूवीजमध्ये बोललं जातं… वेळेची खरी गंमतच ही आहे की ती बदलते. यंदा पुन्हा RCB ची टीम फायनलमध्ये आहे. त्यामुळे IPL मधला RCB चा इतिहास कसा राहिलाय आणि यावर्षी तरी RCB फायनल जिंकेल का? हे जाणून घेऊ. (IPL 2025)

RCB IPL इतिहासातली एकमेव टीम असेल ज्यांनी एकही cup जिंकला नसला, तरी सर्वात लॉयल आणि तगडा फॅनबेस त्यांचा आहे. त्याचं एकमेव कारण किंग कोहली असला तरी, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, फॅफ डू प्लेसी, जॅक कॅलिस, मॅक्सवेल, राहुल द्रविड, युवराज सिंग, दिनेश कार्तिक, अनिल कुंबळे असे बरेच दिग्गज या आधी या फ्रँचायझीमधून खेळून गेलेत. 2008 मध्ये राहुल द्रविड यांच्या कॅप्टनसीखाली त्यांचं पहिलं सीजन निराशाजनक होतं, RCB ने 14 पैकी फक्त 4 मॅचेस जिंकल्या आणि ते पॉईंट्स टॅबेलमध्ये सातव्या रॅंकवर होते आणि पुढे IPL च्या दुसऱ्याच seasonच्या फायनलमध्ये RCB पोहचली होती. तर २००९मध्ये IPL दक्षिण आफ्रिकेत खेळलं गेलं होतं. RCB ची टीम अनिल कुंबळे यांच्या कॅप्टनसीखाली होती. म्हणजे सीजनच्या सुरवातीला कॅप्टन केविन पीटरसन होता. सीजनच्या सुरुवातीला RCB पहिल्या ६ पैकी ४ मॅचसे हारली आणि नंतर पीटरसनला वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मॅच खेळण्यासाठी जावं लागलं म्हणून मग कॅप्टनसीची धुरा कुंबळेयांच्या हाती आली. आणि त्यांनी RCB ला फायनलपर्यंत नेलं. फायनलमध्ये समोर होती डेक्कन चार्जर्स, ज्यांच्याकडे ॲन्ड्र्यू सायमंड्स, रोहित शर्मा, हर्शल गिब्स आणि गिलख्रिस्टसारखे प्लेयर्स होते. RCB ला 143 धावांचं सोपं टार्गेट मिळालं होतं, पण त्यांचा बॅटिंग ऑर्डर चांगलाच कोलमडला. रोलोफ व्हॅन डर मर्वेने रोलोफ व्हॅन डर मर्वे आणि रॉस टेलरने मॅच थोडी सावरली खेळवली, म्हणून फक्त 6 runs ने RCB मॅच हारली. (IPL 2025)

IPL 2025

पुढे 2011 मध्ये, Rcb तगड्या फॉर्म मध्ये होती, किंग कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि बॉलर्ससाठी कर्दनकाळ असलेला chris गेल त्या सिझनमध्ये तो ऑरेंज कॅप विजेता होता, RCB ने लीग स्टेजमध्ये टॉप केलं, पण फायनलमध्ये त्यांचा सामना झाला चेन्नई सुपर किंग्सशी. CSK च्या मायकेल हसी आणि मुरलीधरनने RCB च्या बॅटिंगची झुक झुक गाडी करून टाकली. 205 धावांचं टार्गेट चेस करताना RCB 58 धावांनी हारली. आणि याच सिझनमध्ये RCB चॅम्पियन्स लीग T20 च्या फायनलमध्येही पोहोचली होती, पण तिथेही मुंबई इंडियन्सकडून ती हारली.

आता 2016 ची गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे. विराट कोहलीच्या बॅटिंगने सगळ्यांना थक्क केलं होतं. या सीजनमध्ये विराटने ४ सेंचुरी आणि ७ हाल्फ सेंचुरी मारल्या होत्या. विराटचं टीमचा कॅप्टन होता. पण फायनलमध्ये गेलने 76 आणि कोहलीने 54 धावा ठोकल्या, पण मधली फळी पुरती कोलमडली. सनरायझर्सच्या बॉलर्सनी RCB च्या बॅट्समनना लवकर बाद केलं, आणि मॅच हातातून गेली. खरंच,
RCB चे फॅन नसाल तरी २०१६ला RCB ने ipl cup जिंकावा असं प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वाटलं असेल कारण तेवढा शानदार performance विराटचा होता.(Sports News)

प्रत्येक फायनलमध्ये RCB वेगवेगळ्या कारणांमुळे हारली आहे कधी बॅटिंग कोलमडली, कधी बॉलिंग कमकुवत ठरली, तर कधी समोरच्या टीमची रणनीती जास्त चांगली होती. पण एक गोष्ट नक्की, RCB ने कधीच हार मानली नाही. ई साला कप नमदे” चा नारा दरवर्षी कायम राहील आणि पुन्हा इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर RCB ने यंदा फायनल गाठली आहे.

या सिझनमध्ये RCB ने जबरदस्त कामगिरी केलीये. त्यांनी पंजाब किंग्सला 8 विकेट्सने हरवून फायनलमध्ये प्रवेश केलाय, तब्बल 9 वर्षांनंतर! राजत पटीदारच्या कॅप्टनसीखाली आणि अँडी फ्लॉवरच्या कोचिंगखाली RCB ने CSK विरुद्ध पहिल्यांदाच सलग दोन मॅचेस जिंकल्या, आणि त्यातही चेपॉकवर जिंकण्याचा 17 वर्षांचा दुष्काळ संपवला. विराट कोहली अजूनही फॉर्ममध्ये आहे, त्याच्यासोबत फील साल्ट, मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, टिम डेव्हिड, रजत पाटीदार यासारख्या बॅट्समन आणि बॉलिंगमध्ये यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा यांनी शानदार कामगिरी केली. (IPL 2025)

===============

हे देखील वाचा :  Panchkula Tragedy News : एकाच गाडीत ७ मृतदेह..

===============

त्यामुळेच RCB सर्वांच्याआधी फायनलमध्ये पोहचली. आणि यंदा त्यांच्याकडे ट्रॉफी जिंकण्याची खरी संधी आहे. RCB ची रणनीती आणि चाहत्यांचा पाठिंबा पाहता, यंदा RCB ची टीम खूपच मजबूत दिसतेय. पण फायनलमध्ये त्यांना कडवी टक्कर मिळेल कारण फायनलमध्ये येण्याच्या शक्यता असणाऱ्या तिन्ही टीम्स फॉर्ममध्ये आहे, rcbने पंजाबला यंदा ३ पैकी २ मॅचेस मध्ये हरवलं आहे, मुंबईला एकदा आणि गुजरातला २ पैकी १ मॅचमध्ये हरवलं आहे. त्यामुळे RCB च्या चाहत्यांचा उत्साह आणि त्यांच्या खेळाडूंची जिद्द पाहता, यंदा ट्रॉफी बेंगलुरुला येऊ शकते! म्हणजे RCB चाहते सुद्धा फक्त त्या क्षणाची वाट पाहता आहेत. जेव्हा ते बोलतील. (Sports News)

आता फक्त काही दिवस आणि आपल्याला कळेलं, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर २०२५ IPL कप उचलतात की ते रॉयल चॉकर्स बेंगलोर ठरतात? तुम्हाला काय वाटतं?


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.