Home » Badrinath : आठवे वैकुंठ असलेल्या बद्रीनाथ धामची रंजक वैशिष्ट्ये

Badrinath : आठवे वैकुंठ असलेल्या बद्रीनाथ धामची रंजक वैशिष्ट्ये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Badrinath
Share

सध्या मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने चारधाम यात्रा सुरु आहे. हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्व असून, ही यात्रा अतिशय पवित्र मानली जाते. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदातरी ही चारधाम यात्रा करावी असे पुराणांमध्ये सांगितले आहे. याच चारधाम यात्रेतील एक महत्वाचे ठिकाण म्हणजे ‘बद्रीनाथ’. बद्रीनाथ हे भगवान विष्णूंचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. बद्रीनाथला आठवे वैकुंठ देखील म्हटले जाते. याच कारणामुळे लोक त्यांच्या जीवनात एकदा तरी बद्रीनाथचे दर्शन घेण्यासाठी जातात. (Badrinath)

बद्रीधाम उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे. भगवान बद्री विशाल हे पंच बद्रीतील पहिले बद्री मानले जातात. या मंदिराच्या ७व्या ते ९व्या शतकात बांधकामाचे पुरावे आहेत. मंदिरात शालिग्रामची बद्रीनारायणाची एक मीटर लांबीची मूर्ती बसवण्यात आली आहे. आठव्या शतकात आदिगुरू शंकराचार्यांनी नारद कुंडातून बाहेर काढल्यानंतर त्याची स्थापना केली, असे मानले जाते. सनातन धर्माच्या अनुयायांची भगवान बद्री विशालवर नितांत श्रद्धा आहे. (Marathi News)

भगवान बद्री विशालचे हे मंदिर देशातील प्रमुख विष्णू मंदिरांपैकी एक आहे. बद्रीनाथ धाम हे भगवान नारायणाचे तपश्चर्यास्थान मानले जाते. त्यामुळेच मंदिराचे दरवाजे उघडताच या धामकडे भाविकांचा ओघ सुरू होतो. भगवान बद्रीनाथाच्या या मंदिराचे दरवाजे उघडणे, बंद करणे आणि पूजा पद्धतीची स्वतःची खास परंपरा आहे ज्यामुळे हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांचा इतिहास खूपच जुना आहे. अनेक मंदिरांची रहस्ये देखील खूपच रंजक आहे. याला बागवान बद्रीनाथचे मंदिर देखील अपवाद नाही. या मंदिराची देखील बरीच रहस्ये प्रचलित आहेत. (Top Stories)

Badrinath

बद्रीनाथ धामची आख्यायिका
एकदा भगवान विष्णू ध्यान मुद्रेत तल्लीन होते. त्याचवेळी बर्फवृष्टी सुरू झाली. ते पूर्णपणे बर्फात झाकले गेले, हे पाहून देवी लक्ष्मी चिंतेत पडल्या. त्यांनी रक्षणासाठी बदरी वृक्षाचे रूप घेतले. यानंतर जेव्हा श्रीहरींचे तप पूर्ण झाले. जेव्हा त्यांनी लक्ष्मी देवीला झाडाने झाकलेले पाहिले. तेव्हा ते म्हणाले, ‘तू माझी रक्षा बद्री वृक्षाच्या रूपात केलीस, म्हणून आजपासून हे स्थान बद्रीनाथ या नावाने ओळखले जाईल.’ तेव्हापासूनच या धमाल बद्रीनाथ धाम म्हणून ओळखले जाऊ लागल्याची मान्यता आहे. (Marathi Latest News)

बद्रीनाथ हे उत्तराखंडमधील चार धामांपैकी मुख्य एक धाम आहे. या मंदिरात अनेक अद्वितीय रहस्ये असल्याचे सांगितले जाते. सनातन लोकांच्या पूजेमध्ये शंखनाद ही पवित्र आणि मुख्य बाब समजली जाते. मात्र बद्रीनाथ पूजेदरम्यान शंख वाजवण्यास मनाई असते. शंख हा भगवान विष्णूंसाठी अतिशय प्रिय आहे. असे असून देखील या मंदिरात शंखनाद होत नाही. बद्रीनाथ धाममध्ये शंख वाजवून पूजा केली जात नाही. यामागचे कारण कोणते चला जाणून घेऊया. सोबतच बद्रीनाथ मंदिराची वैशिष्टये देखील जाणून घेऊया. (Todays Marathi News)

शंखनाद न करण्याची पौराणिक कारणे
बद्रीनाथ धामच्या आजूबाजूचा परिसर हा अलकनंदा नदीच्या काठावर वसलेला आहे. हा परिसर भगवान नारायणाच्या तपश्चर्येचे ठिकाण मानले जाते. याबद्दल अजून एक गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे, बद्रीनाथ धामजवळ सापांचे वास्तव मोठ्याप्रमाणात आहे, अशी मान्यता आहे. अशावेळेस शंखाचा आवाज सापांसाठी वेदनादायक मानला जातो. शंख वाजवल्याने सापांना राग येऊ शकतो ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा त्या परिसरात अडथळे निर्माण होऊ शकतात. (Social Updates News)

शंखनाद न करण्याची वैज्ञानिक कारणे
हिवाळ्यात बद्रीनाथमध्ये बर्फ पडतो. अशा परिस्थितीत जर शंख वाजवला तर त्याचा ध्वनी डोंगरावर आदळतो. यामुळे अनुनाद निर्माण होतो. या अनुनादामुळे बर्फात भेगा पडू शकतात आणि यामुळे हिमवादळांचा धोका वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.

शंखनाद न करण्याचे धार्मिक कारण
एकदा देवी लक्ष्मी बद्रीनाथच्या तुलसी भवनात ध्यान करत होत्या. त्यावेळी भगवान विष्णूने शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला. हिंदू धर्मात विजय झाल्यावर शंख वाजवला जातो परंतु भगवान विष्णूंना लक्ष्मीजींच्या ध्यानात अडथळा आणायचा नव्हता म्हणून त्यांनी शंखनाद केला नाही. (Top Marathi News)

Badrinath

पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, अगस्त्य ऋषी केदारनाथमध्ये राक्षसांचा वध करत होते. त्यावेळी अतापी आणि वातापी हे दोन राक्षस पळून गेले. अतापीने आपला जीव वाचवण्यासाठी मंदाकिनी नदीची मदत घेतली. तर वातापीने शंखाची मदत घेतली आणि तो शंखात जाऊन लपला. असे मानले जाते की जर कोणी शंख वाजवला तर राक्षस बाहेर येऊन पळून जाईल. यामुळेच बद्रीनाथमध्ये शंख वाजवला जात नाही. (Top Marathi Headline)

बद्रीनाथ मंदिराची वैशिष्टये
> भगवान बद्रीनाथाचे मंदिर वर्षातून फक्त सहा महिने भक्तांच्या दर्शनासाठी उघडते आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे संपूर्ण सहा महिने बंद असते.

> बद्रीनाथ मंदिरात भगवान बद्री विशालसमोर एक दिवा लावला जातो जो कधीही विझत नाही. हे मंदिर सहा महिने बंद असतानाही नाही.

> बद्रीनाथ मंदिरात जेथे नर-नारायण देवतेची पूजा केली जाते, त्या पवित्र तीर्थाविषयी अशी श्रद्धा आहे की येथे येणाऱ्या भाविकांना पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागत नाही. याचा अर्थ तो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो.

> दरवर्षी भगवान ब्रदीनाथांच्या मूर्तीला लेप लावण्यासाठी आणि सतत दिवा प्रज्वलित करण्यासाठी वापरले जाणारे तेल तेहरीच्या राजवाड्यातील विवाहित महिला काढतात. विशेष म्हणजे तेल काढण्याची संपूर्ण प्रक्रिया टिहरीच्या राणीच्या नेतृत्वाखाली होते.

=========

हे देखील वाचा : Jadugoda Dark Secret : भारतात इथे आजही मूलं अपंग जन्माला येतात!

Jatinga Village : या रहस्यमयी जागेवर हजारो पक्षी आत्महत्या करतात!

=========

> दक्षिण भारतातील केरळमधील पुजारी बद्रीनाथ धाममध्ये भगवान श्री विष्णूची पूजा करण्यासाठी येतात. मंदिरात पूजा करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे. असे मानले जाते की शंकराचार्यांनी त्यांना मंदिरात भगवान बद्री विशालची पूजा करण्याचा अधिकार दिला होता.

> समुद्रसपाटीपासून ३००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बसलेल्या भगवान बद्रीनाथांबद्दल असे मानले जाते की भविष्यात एक दिवस येईल, जेव्हा नर आणि नारायण पर्वत एकत्र येतील. त्यानंतर बद्रीनाथ धामकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होईल. यानंतर, तिथे नवीन तीर्थक्षेत्राचा उगम होईल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.