Home » Vantara : वंतारासाठी लाखो वन्यप्रेमी प्रतीक्षेत !

Vantara : वंतारासाठी लाखो वन्यप्रेमी प्रतीक्षेत !

by Team Gajawaja
0 comment
Vantara
Share

जंगलाचा तारा, अर्थात वंतारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी 2025 रोजी गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समधील वंतारा या वन्यजीव संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन केले. अनंत अंबानी यांच्या कल्पनेतून सुरु झालेल्या या प्रकल्पात जगभरात वन्यजीवांसाठी ज्या सुविधा दिल्या जातात, त्यापैकी सर्वोत्तम सुविधा आहेत. 3000 एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात 47000 हून अधिक प्राणी आहेत. जगातील सर्वात मोठे वन्यजीव पुनर्वसन केंद्र आहे, जिथे हत्ती, वाघ, सिंह, बिबट्या आणि मगरींसह झेब्रा, जिराफ हे प्राणीही आहेत. (Vantara)

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनकडून यासाठी निधी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उद्दघाटन केल्यानंतर पहिला प्रश्न विचारण्यात आला, तो म्हणजे, वंतारा आता सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले आहे का. मात्र, वंतारा हे वन्यजीव प्रकल्प नसून तो वन्यजीव पुनर्वसन केंद्र आणि संशोधन केंद्रही आहे. या केंद्रात असे अनेक प्राणी आहेत, ज्यांना जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते, आणि त्यांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा देऊन तंदरुस्त करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाचे उद्दघाटन केले असले, तरी अद्यापही हा प्रकल्प सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्याबाबत अद्यापही चर्चा सुरु असून सर्वच प्रकल्प एकदम पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार नसल्याची माहिती आहे. वंतारामधील मर्यादित भागात पर्यटकांना येऊ देण्यातबाबत चर्चा सुरु आहे. यासाठी तिकीटही घेण्यात येणार असून आगाऊ नोंदणी आवश्यक रहाणार आहे. यासर्वांबाबत वंतारा प्रकल्पातर्फेच निवेदन जाहीर कऱण्यात येणार आहे. (Latest News)

पंतप्रधान मोदी यांनी जामनगरच्या वंतारा या रिलायन्स फाऊंडेशनच्या वन्यजीव संरक्षण प्रकल्पाचे उद्दघाटन केल्यावर त्याचा एक सोशल व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर कऱण्यात आला. यामध्ये वंतारामधील वाघ, सिंह, गेंडा, जिराफ, झेब्रा, चिंपाझी असे प्राणी बघून वन्यप्रेमीही या प्रकल्पाला भेट देण्यासाठी उत्सुक झाले आहेत. हा प्रकल्प कधी आणि कसा बघता येणार, याची चौकशी सुरु झाली आहे. मात्र अद्यापही वंतारामध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यात येत नाही. कारण जगातील सर्वात मोठे वन्यजीव पुनर्वसन केंद्र असलेल्या या वंताराचा परिसर अवाढव्य आहे. जवळपास 3000 एकरांवर वंतारा पसरलेले आहे. यामध्ये देशातील असे अनेक प्राणी आहेत, ज्यांना जखमी करुन सोडून देण्यात आले होते. वंतारा प्रकल्पानं दिलेल्या माहितीनुसार 43 प्रजातींमधील 2000 हून प्राणी येथे जखमी अवस्थेत आणण्यात आले होते. (Vantara)

वंतारामध्ये या प्राण्यांवर आधुनिक तंत्राचा वापर करत उपचार करण्यात आले, आणि आता या सर्व प्राण्यांची तब्बेत ठणठणीत झालेली आहे. यात हत्ती, वाघ, सिंह, बिबटे आणि अनेक सापांचा समावेश आहे. या सर्वांना वंतारामध्ये आता मोकळ्या वातावरणात ठेवण्यात आले आहे. वंतारामधील या सगळ्या प्राण्यांचा अधिवास हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारखाच आहे. हे सगळे बघण्यासाठी लाखो भारतीयांनी वंताराच्या वेबसाईटवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. मात्र वंतारा हा फक्त प्राण्यांचा अधिवास नसून त्यामध्ये प्राण्यांवर उपचारही कऱण्यात येतात. प्राण्यांचे जगातील सर्वात चांगले हॉस्पिटल वंतारामध्ये आहे. यात हत्तीसांठी 600 एकर क्षेत्राचे उपचार केंद्र आहे. तिथे लेसर थेरपीची सुविधा असून त्याक्षेत्रातील तज्ञ वंतारामधील हत्तींवर उपचार करतात. याशिवाय अन्यही पशुसांठी स्वतंत्र रुग्णालय आहे. त्यात एमआरआय, एक्स-रे, आयसीयू, सीटी स्कॅन सारख्या सुविधा आहेत. आजारी असलेल्या प्राण्यांना देण्यात येणारा आहारही वेगळा आणि पथ्याचा असतो, तर अन्य प्राण्यांना देण्यात येणा-या आहाराचा दर्जाही सर्वोत्कृष्ठ असाच आहे. (Latest News)

===============

हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !

Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !

===============

वंतारामध्ये 1000 हून अधिक मगरी, 250 बिबट्या, 70सिंह, 70 वाघ, 225 आफ्रिकन कासवं, 20 जिराफ, मोर, पांढरे मोर, रंगीबेरंगी पोपट, अनेक प्रकारे साप, त्यातही दुर्मिळ असे पांढरे साप यांना सांभाळण्यात येत आहे. याशिवाय गेंडा आणि हत्तींसाठी येथे उभारण्यात आलेले जंगल बघण्यासारखे आहे. शिवाय या जंगलात अनेक निलगायी, मोर, हरणं मोकळेपणानं फिरत असतात. या सर्व प्राण्यांना जंगलात फिरण्याचा अनुभव येथे मिळत आहे. अशा परिस्थितीत येथे पर्यटक यायला लागले तर या प्राण्यांना काही त्रास होणार नाही ना, यासंदर्भात येथील तज्ञांचे मत घेऊनच हे केंद्र पर्यटकांना खुले कऱण्यात येणार आहे. भारत सरकारने ‘कॉर्पोरेट’ श्रेणीमध्ये वंतारा प्रकल्पाला ‘प्राणी मित्र’ राष्ट्रीय पुरस्कार, प्रदान केला आहे. या केंद्रात 2000 हजारहून अधिक प्रशिक्षीत कर्मचारी असून अहोरात्र ते प्राण्यांची काळजी घेतात. यासर्वांना मार्गदर्शन कऱण्यासाठी भारत आणि जगातील मान्यवर प्राणीशास्त्रज्ञ आणि प्राण्यांचे डॉक्टर या वंतारामध्ये आहेत. वन्यजीव प्राण्यांचे संवर्धन आणि संरक्षण हा मुळ हेतू वंताराचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबद्दल प्राणीमित्रांमध्ये उत्सुकता आहे. (Vantara)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.