भारतात सर्वत्र श्रीरामनवमी थाटात साजरी होत आहे. काही ठिकाणी रामनवमीच्या निमित्तानं आठवडाभर धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. प्रभू रामांच्या जन्माचा हा उत्सव भारतात साजर होत असतांना श्रीलंकेत मात्र रावणाच्या नामाचा जप करण्यात येत आहे. त्याला कारण ठरला आहे, रावणाची राजधानी म्हणून ज्या सिगिरिया शहराचा उल्लेख करण्यात येतो, तिथे मिळालेले पुरावे. सिगिरिया या महाकाय खडकाच्या शिखरावर रावणाचा भव्य महाल होता. रावण हा स्वतः शस्त्रास्त्रांचा चाहता होता. त्याला वास्तुकलेचेही उत्तम ज्ञान होते. त्यामुळे हा किल्ला त्यानं बनवून घेतला असे काही सांगतात, तर काहींच्या मते हा किल्ला रावणाचा भाऊ असलेल्या कुबेराचा होता. रावणानं कुबेराकडून तो बळकावला. कसेही असले तरी या सर्व भागाची पाहणी करण्यात येत आहे. या भागावर संशोधन करणा-या संशोधकांना सिगिरिया हिच रावणाची राजधानी असल्याचे ठाम पुरावे हाती लागले आहेत. या किल्ल्याच्या आता अनेक गुहा असून त्यामध्ये विविध चित्रेही पहायला मिळाली आहे. हे सर्व पुरावे अदभूत असून यामुळे रावणाच्या आय़ुष्यावर नव्यानं प्रकाश टाकता येईल, असा येथील संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळेच श्रीलंकेत पुन्हा रावणाच्या नावाचा जप करण्यात येत आहे. ( Ravana Fort)
श्रीलंकेच्या दॅविनाले येथील मात्सेल्या जिल्ह्यामधील प्राचीन खडक आणि त्याच्या आसपासचा प्रदेश सिगिरिया म्हणून ओळखला जातो. हा संपूर्ण परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला असून त्याच्या मध्यभागी सुमारे १८० मीटर उंच पर्वत शिखर आहे. हेच शिखर म्हणजे रावणाची राजधानी होती, असा कयास आत्तापर्यंत करण्यात येत होता. त्यासंदर्भात श्रीलंकेतील पुरातत्व विभागातर्फे गेली अनेक वर्ष शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता या मोहीमेला रावणाच्या राजधानी संदर्भात मोठे पुरावे हाती लागले आहेत. प्राचीन श्रीलंकेच्या इतिहासानुसार, येथे अतीघनदाट जंगल होते. ( Ravana Fort)
काही काळानंतर येथे मोठी टेकडी तयार झाली. त्यात टेकडीवर श्रीलंकेतील राजांनी आपले राजधानी बनवली. कारण या ठिकाणाहून अवघ्या श्रीलंकेवर नजर ठेवणे सहस शक्य होत असे. येथे ४७७ ते ४९५ एडी मध्ये राजा कश्यप यांनी आपली राजधानी म्हणून राजवाडा बांधायला सुरुवात केल्याचा पुरावा मिळाला होता. त्यानुसार हा शोध पुढे करण्यात आला. हा राजवाडा ज्याच्यावर बांधण्यात आला, तो खडक अत्यंत मजबूत असून त्याच्या खाली अनेक गुहा आहेत. याच गुहांचा आधार घेत आता शोध घेण्यात येत आहे. यातील काही गुहा या मानव निर्मित असल्याची माहिती पुढे आली.
तसेच या गुहांमध्ये अनेक चित्र असून आता त्या चित्रांची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. श्रीलंकेच्या इतिहासात या सिगिरिया शहराला खूप महत्त्व आहे. हजारो वर्षापूर्वी वसवलेले हे शहर पाहतांना आश्चर्याचा धक्का बसतो, इकती त्याची व्याप्ती आहे. या खडकावर जो राजवाडा होता, तो आधुनिक सोयींनी युक्त असा होता. आत्ताच्या काळातील सोयी सुविधाही हजारो वर्षापूर्वी या राजवाड्यात होत्या असा संशोधकांचा अंदाज आहे. कारण या संशोधकांना येथे लिफ्ट सारख्या मशिन सापडल्या आहेत. त्यातून या खडकाच्या तळापासून थेट राजवाड्यात जाण्याची सोय होती. राजा आणि त्याच्या परिवारासाठी वेगवेगळ्या लिफ्टही सापडल्या आहेत. ( Ravana Fort)
यावरुन हिच राजा रावणाची राजधानी असल्याची खात्री संशोधकांना पटली आहे. श्रीलंकेतील या भव्य अशा खडकाच्या शिखरावर जुन्या शहराचा शोध लागल्याने पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांना धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या मध्यभागी असलेल्या सिगिरिया शहराचे अवशेष बघायला येणा-या पर्यटकांना आश्चर्यचकित करीत आहेत. या शहराच्या बांधकाम तंत्राबाबत आणखी नवे पुरावे मिळाले असून ते पाहून पुरातत्वशास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या भागातील स्थानिक या जागेला सिंहाचा खडक म्हणून ओळखतात. त्यांच्या मते हा भाग पूर्वी राजा कश्यपची राजधानी होती. त्यानंतर त्याचा ताबा कुबेराकडे आला आणि कुबेराकडून या राजधानीवर रावणानं ताबा मिळवला. ( Ravana Fort)
===============
हे देखील वाचा : राजेश खन्ना यांचा हा सिनेमा पाहिल्यानंतर एका वृद्ध दांपत्याने बदलले होते मृत्युपत्र, मुलांकडून हिरावले होते मालकी हक्क
===============
त्यानेच या ठिकाणी असलेल्या महालाला अधिक भव्य रुप दिल्याचे स्थानिक सांगतात. ५ हजार वर्षापूर्वी या महालात जाण्यासाठी १००० पाय-या बांधण्यात आल्या होत्या. याचा वापर सर्वसामान्य आणि सैनिक करीत असत. रावण आणि त्याच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र लिफ्ट होत्या. तसेच वरिष्ठ अधिका-यांसाठीही लिफ्ट होत्या, असा पुरावा आता सापडला आहे. तसेच या पर्वताच्या खाली अनेक गुहा मिळाल्या आहेत. रावणाने माता सीतेचे अपहरण केल्यानंतर त्यांना यापैकी एका गुहेत ठेवल्याचे सांगण्यात येते. या गुहांची आता संशोधकांतर्फे तपासणी चालू आहे. या गुहांमध्ये अनेक चित्र सापडली आहेत. ही चित्रे रावणाच्या पत्नींची असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिगिरिया मधील हा महल गेले कित्येक वर्ष पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळ म्हणून स्थान मिळालेल्या या किल्ल्याचे अवशेष आता नव्यानं शोधण्यात येत आहेत.
सई बने