Home » India’s Worst Plane Crash : २५ वर्षांपूर्वी घडला होता सर्वात मोठा प्लेन क्रॅश !

India’s Worst Plane Crash : २५ वर्षांपूर्वी घडला होता सर्वात मोठा प्लेन क्रॅश !

by Team Gajawaja
0 comment
India's Worst Plane Crash
Share

१२ नोव्हेंबर १९९६, संध्याकाळचा साडे सहा वाजले होते. दिल्ली एअरपोर्टवरून सौदी एअरलाईन्सच्या बोईंग ७४७ या विमानाने टेक-ऑफ केलं. यामध्ये २३ जणांच्या क्रूसोबत २८९ पॅसेंजर्स होते. त्यात २३१ भारतीय… त्या दिवशी वातावरण पण चांगलं होत. आकाश पण निरभ्र होतं. हवेचा वेग पण नॉर्मल होता. जवळपास ५०० किलोमीटर पर आवरच्या स्पीडने उडत हे विमान काही मिनिटांमध्येच १४ हजार फुटांवर जाऊन पोहोचलं. यानंतर या विमानाच्या पायलट्सनी दिल्ली एअर ट्राफिक कंट्रोलकडून आणखी वर जाण्याची परवानगी मागितली. पण एटीसीने त्यांना हाय त्या ठिकाणीच रहायला सांगितलं. (India’s Worst Plane Crash)

त्यावेळी कसं होतं…दिल्लीचा रनवे हा वनवे होता. म्हणजे लँड करणाऱ्या विमानांचाही सेन route आणि टेक ऑफ करणाऱ्यांचाही…त्याच वेळेला कजाखस्तानचा एक विमान आयएल – ७६ विरुद्ध दिशेने सेम १५ हजार फुट उंचावरून दिल्ली एअरपोर्टवर होता. यामध्ये ३७ लोकं होती. दिल्ली एटीसीने त्यालाही जास्त उंच न जाता त्याच ठिकाणी राहण्याचे आदेश दिले. यानंतर एटीसीने त्यांना सांगितलं की १० मैल अंतरावरून विरुद्ध दिशेने सौदी एअरलाईन्सचं विमान येतय.

पुढे एटीसीने कझाक विमानाच्या क्रूला म्हटलं की ‘रिपोर्ट, इफ इन साईट! म्हणजे जर दुरून तुम्हाला सौदीचं विमान दिसलं तर आम्हाला ताबडतोब रिपोर्ट करा. कारण १५ हजार फुटांवर कझाकची फ्लाईट होती आणि त्याच्या खाली १४ हजार फुटांवर सौदीची फ्लाईट… पण अचानक एटीसीच्या रडारवर दोन्ही विमानांचं लोकेशन येणं बंद झाल. कझाकच्या पायलटचा शेवटचा मेसेज होता, ‘अस्तग़्फ़िरुल्लाह, अशहद, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन.’ एटीसीला कळून चुकलं की काहीतरी भयंकर घडलं आहे. (Top Stories)

दिल्लीपासून जवळपास १०० किमी अंतरावर असलेल्या चरखी दादरी या गावाजवळच्या लोकांनी आकाशात एक भला मोठा स्फोट पाहिला, आगीचा मोठा गोळा… काळ्या धुराचे लोट आणि आकाशातून काहितरी वेगाने जमिनीवर येतय म्हणून गावात पळापळ सुरू झाली. आणि अशा प्रकारे भारतात घडलेला सर्वात मोठा प्लेन क्रॅश घडला होता. म्हणजे भारताच्या इतिहासात आजपर्यंत दोन विमान एकमेकांना धडकले होते… तीच ही एकमेव घटना ! पण नेमकं काय गंडल ? यांत्रिक बिघाड, चुकीचं कम्युनिकेशन की अजून काही… चला तर जाणून घेऊ. (India’s Worst Plane Crash)

नुकताच अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. पण असाच एक भयानक अपघात २५ वर्षांपूर्वी घडला होता, ज्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर झालं असं की सौदीच्या फ्लाईटमध्ये जास्त करून भारतीय कामगार होते, सौदीला जे काम शोधायला जातात ना तेच छोटे मोठे वर्कर्स आणि कझाच्या फ्लाईटमधून काही व्यापारी भारतात गूळ खरेदी करायला आले होते. आता १९९६ दरम्यान दिल्लीसारख्या गजबजलेल्या एअरपोर्टवर रनवे हा वनवे होता, त्यामुळे लँडिंग आणि टेक ऑफ होणाऱ्या विमानांचं मॉनिटरिंग करण म्हणजे डोकेदुखीचं काम ! पण तरीही एटीसी हे चांगल्या पद्धतीने हे हँडल करत होतं. त्यातच १९९० साली एअर ट्राफिक कंट्रोलर्सचं काम हे जगातलं सर्वात जास्त स्ट्रेसफूल जॉब म्हणून ओळखलं जायचं. पण ही नेमकी चुक कोणाची होती, याबाबत नंतर अनेक थियरीज मांडल्या गेल्या. काही लोकांच म्हणण होतं सौदीच्या पायलट्सनी इंस्ट्रक्शन्स फॉलो केले नाही आणि १४ हजार फुटांवर गेले. काहींचं म्हणणं कझाकच्या पायलट्सनी घाई गडबड केली. काहीचं म्हणणं आहे की विमानात बिघाड होता तर काहींनी थेट दिल्ली एटीसीवर आरोप केले. त्याला आउट डेटेड म्हटलं.

पण जेव्हा दोन्ही विमानांमधल्या ब्लॅक बॉक्सची चौकशी करण्यात आली, तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. त्यातून एक गोष्ट समोर आली की सौदीचं विमान हे १४ हजार फुटांवरच होतं आणि दोन्ही विमानांची टक्कर झाली होती तीसुद्धा १४ हजार फुटांवरच झाली होती. याचा अर्थ कझाकचा विमान हा १५ वरून १४ हजार फुटांवर आला होता. पण प्रश्न असा निर्माण होतो की, त्यांना याचे कोणी ऑर्डर्स दिले होते का ? तर त्यावेळचे एअर ट्रॅफिक कंट्रोलर व्ही के दत्ता यांनी सांगितलं की, कझाकच्या पायलट्सना खाली न येण्याचे आदेश दिले गेले होते आणि ब्लॅक बॉक्स मधूनही तेच समोर आलं. आधी ब्लॅक बॉक्स म्हणजे काय ते सांगतो. एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, म्हणजे त्याची स्पीड आणि उंची या सगळ्यांचा डेटा असतो.(India’s Worst Plane Crash)

या विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी लाहोटी आयोग नेमण्यात आलं होतं. सौदी फ्लाईट आणि कझाक फ्लाईट दोघांच्याही ब्लॅक बॉक्सचं डिकोडिंग भारताच्या बाहेर करण्यात आलं. कझाकचं मॉस्कोच्या एका लॅबमध्ये तर सौदीचं ब्रिटनच्या एका लॅबमध्ये ! दोन्ही ब्लॅक बॉक्सचे रेकॉर्डस जेव्हा लाहोटी आयोगाकडे आले तेव्हा त्यांनी या दोन्ही विमानांची टक्कर होण्याचा निष्कर्ष काढला. त्यान त्यांनी म्हटलं की, ही दुर्घटना घडण्याचं मूळ कारण कझाकच्या पायलट्सनी इंस्ट्रक्शन्स ऐकले नव्हते, ते को ऑपरेट सुद्धा करत नव्हते त्यात त्यांना १५ हजार फुटांवर राहण्याचे आदेश देऊनही ते १४ हजार फुटांवर आले. पण हे का घडलं कारण कझाकच्या पायलट्सना इंग्लिश भाषा येतच नव्हती. तर ते रशियनमधून संवाद साधत होते. लाहोटी आयोगाने म्हटलं की कझाकच्या पायलट्स आणि क्रूला इंग्लिश भाषेचं ज्ञान नसल्यामुळे त्यांनी एटीसीकडून आलेले इंस्ट्रक्शन्स चुकीच्या पद्धतीने घेतले. यामध्ये दिल्ली एटीसीची काहीच चूक नव्हती. दोन्हीही विमान चांगल्या स्थितीत होते. दोघांमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता.(Top Stories)

फक्त इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे ३४९ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. सौदीच्या फ्लाईटमध्ये २३१ भारतीय, सौदीचेच १८ प्रवासी, नेपाळचे ९, पाकिस्तानचे ३, अमेरिकेचे २ आणि ब्रिटनचे एक असे २८९ प्रवासी होते तर कझाकच्या फ्लाईटमध्ये सगळेच कझाकी होते. या दोन्ही विमानांची टक्कर झाल्यानंतर त्यांचे अवशेष हरियाणाच्या चरखी दादरी गावात पडले होते. सौदीच्या विमानाचं इंजिन जिथे पडलं होतं तिथे तब्बल २० फुटांचा खड्डा झाला होता.(India’s Worst Plane Crash)

=================

हे देखील वाचा : Ahmedabad : अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना लंडनला जाणारे विमान कोसळले

=================

त्यावेळी अनेक डेड बॉडीजवरच्या महत्त्वाच्या वस्तू जसे घड्याळ, कपडे, सोन्याच्या चैनी, इतर वस्तू चोरी करण्यात आल्या होत्या. पण काही लोकांनी डेड बॉडीजना कोणितरी जिवंत असेल या आशेने हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होतं. आता तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल की सर्व विमानांना ठराविक अंतरावरच उडण्याचे आदेश का दिले जातात.. म्हणजे १४ किंवा १५ हजार फूट… तर ज्याप्रमाणे रस्त्यांवर गाड्यांसाठी ट्राफिक लेन्स असतात तसेच आकाशातही विमानांसाठी ठरलेले रूट्स असतात, ज्यांना एअरवेज म्हणतात. एअर ट्राफिक कंट्रोलरकडून तुम्हाला ज्या रूट वरून जाण्याचे आदेश मिळतात, त्याच रूटवरून जावं लागतं. त्यात दोन विमान जर एकाच फ्लाइट लेव्हलवरून जात असतील तर त्यांच्यामध्ये जवळपास १ हजार फुटांचं अंतर असायला हव. त्यामुळे ही विमान दुर्घटना घडली यामध्ये एटीसीची कोणतीही चूक नव्हती, तर कझाकच्या पायलट्सकडूनच चूक झाली आणि हा भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा प्लेन क्रॅश घडला. सध्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे. पण जेव्हा जेव्हा अशा विमान दुर्घटनांचा विषय निघेल, तेव्हा दिल्लीच्या या भयानक विमान दुर्घटनेचीच चर्चा आधी होईल.

 

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.