आपल्या स्वयंपाकातील सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. मिठाशिवाय कोणतेही जीवन अपूर्णच असते. बेचव जेवणाला चव आणणारे मीठ म्हणजे प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मात्र अतिरिक्त मीठ खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. मीठ घालून केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरावर हळूहळू वाईट परिणाम होताना दिसतो. प्रमाणात मीठ खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. कारण योग्य प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे त्यात असलेल्या सोडियमचे आपल्याला लाभ होतात, जे स्नायूंचे कार्य, मज्जातंतूंचे सिग्नलिंग आणि द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करतात. मात्र अतिरिक्त मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच ठरते. जास्त मीठ घालून केलेले पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्याने शरीरावर हळूहळू वाईट परिणाम होताना दिसतो. अर्थात हे दुष्परिणाम लगेचच लक्षात येत नाहीत. (Salt)
> शरीरात मिठाचे प्रमाण वाढले तर उच्च रक्तदाबासारखी गंभीर समस्या उदभवू शकते. उच्चरक्तदाबाची समस्या निर्माण झाल्यास हृदयविकाराची शक्यता जास्त असते. एका अभ्यासानुसार मिठाच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या उद्भवतात. (Top Stories)
> शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंड महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मिठाच्या अतिसेवनामुळे वारंवार युरीनला जावे लागते. याशिवाय युरिनचा रंगही गडद होतो. आपल्या किडनीवर ताण येऊन किडनीची कार्यक्षमता कमी होते, मूतखडाही होऊ शकतो. (Marathi News)
> डॉक्टरांच्या मते, जास्त मीठ खाल्ल्याने अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो. यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करता येत नाही. तसंच शरीराचं संतुलन बिघडते. (Latest Marathi News)
> मिठाच्या अतिसेवनामुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होते. त्यामुळे कालांतराने हाडे कमकुवत होण्याची शक्यता जास्त असते. तसंच ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरची सारख्या समस्या वाढू शकतात.
> मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीरातील चरबीही वाढते. परिणामी लठ्ठपणा वाढतो. शरीरीत मिठाचं प्रमाण अधिक झाल्यास हात पाय, चेहऱ्यांवर सूज येऊ शकते. (Todays Marathi Headline)
> मीठ अधिक प्रमाणात खाल्ल्यानं शरीरातचं संतुलन बिघडतं. यामुळे तुम्हाला वारंवार तहान लागते.
> पापड, चटण्या, लोणची अशा मीठाचे जास्त प्रमाण असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे पोटाचा कर्करोग होण्याची शक्यताही वाढते.
=========
हे देखील वाचा : Warts : सौंदर्यात बाधा ठरणारी चामखीळ काढण्यासाठी घरगुती उपाय
=========
लक्षात ठेवा मीठ कमीत करताना आपल्या आहारातून एकदम अचानकपणे मीठ बंद करणं योग्य नाही. मीठ नक्कीच कमी करा मात्र हळूहळू. कारण मीठ खाणे पूर्णपणे बंद केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. माणूस कोमात जाऊ शकतो, कधी कधी तर माणसाचा मृत्यूही येऊ शकतो. त्यामुळे मीठ खाणे करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या नाहीतर हळूहळू मीठ कमी करा. आपल्या शरीराला दररोज ५ ग्रॅम म्हणजे सामान्य व्यक्तीसाठी 1 चमचा मीठ पुरेसे असते. जे लोकं दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खातात, त्यांचा रक्तदाब नियंत्रणात असतो. त्यांना हृदयविकाराचा झटका, रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होण्याची शक्यता तुलनेनं कमी होते. (Social Updates and News)
(टीप – कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)