प्रत्येक व्यक्तीलाच ती करत असलेल्या कामासाठी कौतुकाची अपेक्षा असते. जेव्हा जेव्हा आपण चांगले काम करतो तेव्हा तेव्हा आपल्या वरिष्ठांकडून, आजूबाजूच्या लोकांकडून प्रशंसा ऐकली की, नक्कीच आनंद होतो. सोबतच अधिक जोमाने आणि नवीन आत्मविश्वासाने काम करण्याची प्रेरणा देखील मिळते. आपला देश देखील देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा दिग्गजांचा पुरस्कार देऊन सन्मान करत असते. भारत सरकारकडून ‘पद्म’ पुरस्कार देऊन विविध सन्माननीय लोकांचा गौरव केला जातो. (Padma Award 2026)
देशातील सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांमध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री या सन्मानांचा समावेश होतो. या पुरस्कारांनी सन्मानित होणे म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असते. शिवाय विविध क्षेत्रात काम करताना आपल्याला देखील हा सर्वात मोठा पुरस्कार मिळावा अशीच सर्वांची इच्छा असते. पद्म पुरस्कार हे कला, साहित्य, शिक्षण, खेळ, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, लोककार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात. (Padma Award Nomination)
पद्म पुरस्कार १९५४ मध्ये सुरू करण्यात आले. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. त्यानंतर मार्च किंवा एप्रिलमध्ये या पुरस्कारांचे राष्ट्रपती भवनात वितरण करण्यात येते. हे पुरस्कार बहुतकरून भारतीय नागरिकांनाच दिले जातात. मात्र क्वचित प्रसंगी हे पुरस्कार परदेशी व्यक्तींनाही दिले जातात. (Marathi Top News)
पद्म पुरस्कार तीन वेगवेगळ्या विभागात प्रदान करण्यात येतात. यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे तीन विभाग आहेत. यातले पद्मविभूषण पुरस्कार हे असामान्य आणि विशेष कार्यासाठी प्रदान करण्यात येतात. पद्मभूषण पुरस्कार हे उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी दिले जातात, तर पद्मश्री पुरस्कार हे त्या क्षेत्रातील विशेष कार्यासाठी दिले जातात. (Social News)
=========
हे देखील वाचा : IPL 2025 : प्रत्येक डॉट बॉल ऐवजी झाडाचं चित्र का?
==========
२०२६ च्या पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाइन नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ मार्च २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जुलै २०२५ पर्यंत आपल्याला या पुरस्कारांसाठी आपले नामांकन पाठवता येऊ शकते. हे नामांकन आणि शिफारसी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातात. (Marathi Trending News)
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मते, कोणतीही व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहे. मात्र, सरकारी कर्मचारी पदावर असेपर्यंत या पुरस्कारांसाठी पात्र नसतात. या अटीतून डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना सूट देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला एक पद्म पुरस्कार देण्यात आल्याच्या किमान ५ वर्षांनंतर पुन्हा दुसरा पद्म पुरस्कार दिला जाऊ शकतो. साधारणपणे पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी त्याविषयीची कल्पना त्या विजेत्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येते. (Top Stories)
पद्म पुरस्कारांसाठी निवड कशी केली जाते?
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारं, केंद्र सरकारची मंत्रालयं किंवा विभाग, भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते या पद्म पुरस्कारांसाठी कोणत्याही व्यक्तीच्या नावाची शिफारस करू शकतात. ही प्रक्रिया दरवर्षी नव्याने होते. एवढेच नाही तर एखादी व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी स्वतःच स्वतःचे नामांकन भरू शकते. यासाठी सरकारच्या Awards.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला Nomination/Apply Now या टॅबवर क्लिक करावं लागेल.(Marathi News)
यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागते. सोबतच तुम्ही केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती द्यावी लागते. ही कामाची माहिती देताना ८०० शब्दांपर्यंत तुम्ही तुमचे काम इथे मांडू शकता. नामांकन किंवा शिफारसी करण्यासाठी दरवर्षी सरकार विशिष्ट काळासाठी साईट ओपन करते. याच काळात नामांकन दाखल करता येतं. त्यानंतर दरवर्षी पंतप्रधान पद्म पुरस्कारांच्या नावांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करतात.
या समितीचे अध्यक्ष कॅबिनेट सचिव असतात. नामांकन आणि शिफारसी आलेल्या नावांचा विचार केल्यानंतर या समित्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना शिफारस करतात. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर पद्म पुरस्कारासाठी नावं निश्चित केली जातात. एका वर्षात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची संख्या १२० पेक्षा जास्त नसावी, असा नियम आहे. पण जर यात मरणोत्तर पुरस्कार आणि परदेशी व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा समावेश असेल तर ही संख्या १२० च्या पुढे जाऊ शकते. मात्र शक्यतो पद्म पुरस्कार सहसा मरणोत्तर दिले जात नाहीत. परंतु, काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये सरकार मरणोत्तर पुरस्कार देण्याचा विचार करू शकते.
=========
हे देखील वाचा : Dr. Ambedkar : भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
==========
पद्म पुरस्कार विजेत्यांना काय मिळते?
पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेलं प्रमाणपत्र आणि पदक दिलं जातं. पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या पदकाची एक प्रतिकृतीदेखील दिली जाते. ही प्रतिकृती ते कोणत्याही कार्यक्रमात वापरू शकतात. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा पुरस्कार कोणतीही पदवी नाही. त्यामुळे विजेत्यांच्या नावापुढे किंवा मागे ते वापरले जाऊ शकत नाहीत. असं केल्यास हा पुरस्कार परत देखील घेतला जाऊ शकतो. या पुरस्कारासह, विजेत्यांना कोणतंही रोख बक्षीस, भत्ता किंवा रेल्वे व विमान प्रवासात सवलत यांसारखी कोणतीही सुविधा दिली जात नाही. (Latest Marathi News)