Home » Narasimha Jayanti : नृसिंह जयंती माहिती आणि कथा

Narasimha Jayanti : नृसिंह जयंती माहिती आणि कथा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Narasimha Jayanti
Share

आज सर्वत्र नृसिंह जयंती साजरी होत आहे. आता सगळ्यांनाच नृसिंह देवतेबद्दल माहिती आहे. भगवान विष्णूचे अवतार असलेल्या नृसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपूचा वध करत त्यांचा प्रिय आणि निस्सीम भक्त असलेल्या प्रल्हादाची सुटका केली होती. नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असून, वैशाख शुद्ध चतुर्दशीला भगवान विष्णू यांनी हा अवतार घेतला होता. (Narasimha Jayanti)

हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी नृसिंह हा अवतार घेतला, अशी मान्यता आहे. भगवान विष्णूचा नृसिंह अवतार प्रकट झाला, म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी, हा दिवस नृसिंह जयंती म्हणून साजरा केला जातो. या अवतारात परमेश्वराचे रूप अर्धे सिंह आणि अर्धे मानव होते. शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून भगवान नृसिंह यांना ओळखले जाते. शिवाय हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो. यावर्षी नृसिंह जयंती रविवार, 11 मे रोजी साजरी होत आहे. नृसिंह जयंती ही खूप शुभ मानली जाते. (Marathi News)

पौराणिक कथेनुसार, भाऊ हिरण्यक्षाच्या हत्येमुळे हिरण्यकशपू देवांवर क्रोधित झाला आणि तो भगवान विष्णूला आपला शत्रू मानू लागला. त्याने ब्रह्मदेवांकडून कठोर तपश्चर्येने वर मागताना म्हटले, “तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.” (Marathi Latest News)

Narasimha Jayanti

त्याला हे वरदान मिळाले आणि या वरदानामुळे तो स्वतःला देव मानून तिन्ही लोकांचा छळ करू लागला. त्याची दहशत इतकी वाढली होती की, देवांनाही त्याची भीती वाटू लागली होती. या संकटातून मुक्त होण्यासाठी सर्व देवतांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी हिरण्यकशिपूच्या जुलमी राजवटीतून सुटका करून घेण्याचे आश्वासन दिले. हिरण्यकशपूचा मुलगा प्रल्हाद लहानपणापासूनच विष्णूचा भक्त होता. तो असुरांच्या मुलांनाही विष्णूच्या भक्तीसाठी प्रेरित करत असे. (Top Marathi News)

हिरण्यकशपूला जेव्हा हे कळले, तेव्हा त्याने प्रल्हादला विष्णूची भक्ती ताबडतोब सोडण्यास सांगितले. मात्र, प्रल्हादने त्यावर नकार दिल्याने हिरण्यकश्यपूला राग आला आणि त्याने आपल्या मुलावर अनेक प्रकारचे अत्याचार केले. हिरण्यकशपू रागाने सिंहासनावरून उठला आणि म्हणाला की जर तुझा भगवान सर्वत्र उपस्थित आहे तर तो या स्तंभामध्ये का नाही? असे म्हणून त्याने त्या खांबाला जोरात लाथ मारली. तेव्हा मोठा आवाज झाला आणि त्या स्तंभातून भगवान नृसिंह प्रकट झाले. (Marathi Trending News)

त्याचे अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे नराचे होते. त्यांनी हिरण्यकशिपूला पकडून घराच्या उंबरठ्यावर नेले, पायावर ठेवले आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडून हत्या केली. त्यावेळी संध्याकाळ झाली होती. हिरण्यकशपूचा वध झाला तेव्हा दिवसही नव्हता, रात्रही नव्हती, सूर्यास्त आणि संध्याकाळ होणार होती. तो ना घरात होता ना बाहेर. त्याला अस्त्र किंवा शस्त्रांनी नव्हे तर नखांनी मारण्यात आले. कोणत्याही नर किंवा प्राण्याने नव्हे तर स्वतः भगवान नृसिंहाने अर्धा नर आणि अर्धा सिंह अवतार घेऊन मारले. त्याचा मृत्यू ना जमिनीवर झाला ना आकाशात, उंबरठ्यावर तो भगवान नरसिंहाच्या पायावर पडलेला होता. अशा प्रकारे हिरण्यकशपूचा वध झाला आणि असत्यावर सत्याचा विजय झाला.(Marathi Top NEws)Narasimha Jayanti

=======

हे देखील वाचा :  Mother’s Day : मदर्स डे चा इतिहास आणि त्याची सुरूवात कशी झाली?

=======

ऋण विमोचन नृसिंह स्तोत्रम्

श्री लक्ष्मी-नृसिंह सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्रम्।

देवकार्यसिद्ध्यर्थं सभास्तंभसमुद्भवम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

लक्ष्म्यालिङ्गित वामाङ्गं भक्तानां वरदायकम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

अन्त्रालसदरं शङ्खं गदाचक्रयुधधरम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

स्मरणात् सर्वपापघ्नं वरदं मनोवाञ्छितम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

सिंहनादेन आहतं दारिद्र्यं बन्धमोचनम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

प्रह्लादवरदं श्रीशं धनकोषपरिपूर्तये।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

क्रूरग्रहपीडानाशं कुरुते मङ्गलं शुभम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

वेदवेदाङ्गयज्ञेशं रुद्रब्रह्मादिवन्दितम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

व्याधिदुःखपरिहारं समूलशत्रुनाशनम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

विद्याविजयदायकं पुत्रपौत्रादिवर्धनम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

भुक्तिमुक्तिप्रदं देवं सर्वसिद्धिकरं नृणाम्।
श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये॥

उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं मृत्युम् नमाम्यहम्॥

यः पठेत् इदं नित्यं संकटमुक्तये नरः।
अरुणे विजयी नित्यं धनं शीघ्रं मवाप्नुयात्॥


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.