Home » Odisha : म्हणून भगवान जगन्नाथांचे डोळे मोठे आहेत !

Odisha : म्हणून भगवान जगन्नाथांचे डोळे मोठे आहेत !

by Team Gajawaja
0 comment
Odisha
Share

ओडिशा पुरी येथील भगवान जगन्नाथांची रथयात्रा आता अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. 27 जूनपासून ही जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रा सुरु होईल. 5 जुलैपर्यंत भगवान जगन्नाथांचे लाखो भक्त हा सोहळा साजरा करणार आहेत. सध्या भगवान जगन्नाथ आराम करत आहेत. पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील हे सगळे सोहळे रहस्यमयी आहेत. या सर्वात भगवान जगन्नाथांच्या अनोख्या रुपाचीही चर्चा होते. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील जगन्नाथजींची मूर्ती ही न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक आहे. भगवान जगन्नाथजींचे डोळे मोठे आणि हात अपूर्ण का आहेत याबद्दलही अनेक पौराणिक कथा आहेत. या रहस्याचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्नही केला आहे. मात्र त्यात अद्याप यश आलेले नाही. पुरी येथील जगन्नाथ रथयात्रा 27 जूनपासून सुरू होणार आहे. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून भगवान जगन्नाथांचे लाखो भक्त पुरीमध्ये दाखल झाले आहेत. (Odisha)

पुरीच्या जगन्नाथ मंदिराशी संबंधित अनेक रहस्ये आहेत. हजारो वर्षानंतरही या रहस्यांची उकल झालेली नाही. जगन्नाथ मंदिरात स्थापित भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांच्या मूर्ती अपूर्ण आहेत. यामागे रहस्य आहे. याबाबतच अनेक कथाही सांगितल्या जातात. भगवान जगन्नाथांचे मोठे डोळे त्यांच्या सर्वज्ञता, ज्ञान, करुणा आणि दया यांचे प्रतीक मानले जातात. यातून भगवान सर्वकाही पाहतात. या मोठ्या डोळ्यांनी, जगन्नाथजी त्यांच्या भक्तांना आणि त्यांच्या भावनांना मनापासून पाहू शकतात आणि त्यांना भरभरुन आशीर्वादही देतात, असे सांगितले जाते. मंदिरातील भगवान जगन्नाथाची मूर्ती इतर हिंदू देवतांच्या मूर्तींपेक्षा वेगळी आहे. मोठे डोळे, नाकाचा रिंग आणि अपूर्ण शरीरयष्टी या जगन्नाथजींच्या अनोख्या रूपामागे एक पौराणिक कथा आहे. त्यानुसार, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने शरीर सोडले तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांचे शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन झाले. परंतु त्यांचे हृदय सुरक्षित होते. (Latest News)

हेच हृदय भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये असल्याचे सांगण्यात येते. जगन्नाथ मंदिरातील मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाने राजा इंद्रद्युम्नला कडुलिंबाच्या लाकडापासून मूर्ती बनवण्याची आज्ञा स्वप्नात येऊन दिली होती. त्यानंतर भगवान विश्वकर्मा एका वृद्धाच्या रूपात राजाकडे येतात. भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती तयार करण्याचे आश्वासन दिले. फक्त यासाठी त्यांनी एक अट घातली. त्यानुसार 21 दिवस त्यांनी एका खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतले. हा दरवाजा 21 दिवस बंद ठेवण्याचे राजाने मान्य केले. या बंद खोलीतून रोज कसलेतरी आवाज येत असत. त्यामुळे आत मुर्ती तयार होत आहेत, याचे राजाला समाधान होते. पण एके दिवशी खोलीतून आवाज येणे बंद झाले. यामुळे अस्वस्थ झालेल्या राजानं खोलीचा दरवाजा उघडला. अशावेळी खोलीत भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र, बहिण सुभद्रा यांच्या अपूर्ण मुर्ती राजाला मिळाल्या. मात्र भगवान विश्वकर्मा तिथून गायब झाले होते. तेव्हापासून दर 12 वर्षांनी जेव्हा अधिक मास किंवा मलमास असतो, तेव्हा पुरी येथील जगन्नाथ मंदिरात नबकालेबारा उत्सव साजरा केला जातो. यावेळी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या जुन्या मूर्ती बदलल्या जातात. या मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासूनच तयार केल्या जातात. (Odisha)

हा सण भगवान जगन्नाथांच्या मृत्युचे आणि नवीन शरीर धारणेचे प्रतीक मानला जातो. भगवान जगन्नाथांचे मोठे डोळे त्यांच्या सर्वव्यापी दृष्टीचे आणि सर्वज्ञतेचे प्रतीक मानले जातात. त्याचे विशाल डोळे हे त्यांच्या भक्तांसाठी आश्वासक आहेत. विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे आपण साक्षीदार असल्याचे देव भाविकांना सांगतात. शिवाय भगवान जगन्नाथांचे मोठे डोळे त्यांच्या ज्ञानाची विशालताही सांगतात. काही मान्यतेनुसार, भगवान जगन्नाथांचे मोठे डोळे त्यांच्या दैवी प्रेमाचे आणि करुणेचे प्रतीक आहेत. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, जेव्हा राजा इंद्रद्युम्नने पहिल्यांदा भगवान जगन्नाथांना पाहिले तेव्हा ते त्यांच्या सौंदर्याने थक्क झाले आणि त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्यांची भक्ती पाहून भगवान जगन्नाथांनी आपले डोळे मोठे केले आणि तेव्हापासून त्यांच्या मूर्तींचे डोळे मोठे झाले आहेत. (Latest News)

=============

हे ही वाचा : 

Banu Mustaliq : आत्महदहन ते बुकर प्राइजपर्यंत; वाचा बानू मुश्ताक यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा

Mangala Bai Maravi : जंगलातून जगभरात पोहोचलेली टॅटू आर्टिस्टची प्रेरणादायी यशोगाथा

==============

आणखी एका आख्यायिकेनुसार एके दिवशी माता रोहिणीने सर्वांना द्वारकेतील श्रीकृष्णाच्या लीलांविषयी सांगण्यासाठी बसवले. त्यावेळी त्यांची बहीण सुभद्रा महालाच्या दारावर उभी राहून आत काय बोलले जात आहे ते लक्षपूर्वक ऐकत होती. तिला पाहून कृष्ण आणि बलराम देखील तिच्या शेजारी येऊन उभे राहिले. श्रीकृष्णाच्या लीला ऐकून त्यांचे डोळे विस्फारले आणि ते तिथेच उभे राहिले. नारदांनी हे दृष्य पाहून भगवान श्रीकृष्णांनी असेच दर्शन त्यांच्या भाविकांनाही द्यावे, ही विनंती केली. या विनंतीनुसार, भगवान श्रीकृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांनी याच रुपात भाविकांना दर्शन दिल्याचेही सांगितले जाते. भगवान जगन्नाथांच्या सुंदर, गोल डोळ्यांमध्ये भाविकांना देवाचा साक्षात्कार होतो. त्यामुळे जगभरातून लाखो भाविक देवाच्या या डोळ्यांची नुसती एक झलक बघण्यासाठी पुरी येथे दाखल होतात. (Odisha)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.