एक मुस्लिम मुलगी, वय फक्त ७ वर्ष. अचानक एक दिवशी तिच्या घरातील कोणीतरी व्यक्ती किंवा खुद्द तिची आईच तिला एका ठिकाणी घेऊन जाते. कोणालाच काही न सांगता. त्या मुलीलाही माहित नसत आपल्याला कुठे नेलं जातंय तरी ती विश्वासाने त्या व्यक्तीसोबत जाते. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर असं काही तिच्यासोबत घडतं की यापुढे भविष्यतत ती कोणावरच विश्वास ठेऊ शकत नाही. कारण तिथे तिच्यासोबत विश्वासघात केला जातो. तिची खतना केली जाते! पुढे काही वर्षांनी तिला तिच्यासोबत तेव्हा नेमकं काय घडलं याचा अंदाज येतो. पण तुम्हाला माहितेय का खतना म्हणजे नेमकं काय ? आजवर आपण मुलांच्याबाबतीत हे होताना ऐकलंय, पाहिलंय पण हेच मुस्लिम धर्मातील बोहरा समाजात मुलींसोबतही घडत, हे तुम्हाला माहितेय का ? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. (Female Circumcision)
तर मुस्लिम महिलांच्या खतना करण्याच्या प्रथेवर जगभरात बऱ्याच काळापासून वादविवाद सुरू आहे. इस्लाममध्ये, पुरुषांची सामान्यतः खतना केली जाते, परंतु काही देशांमध्ये महिलांचीसुद्धा खतना करण्याची परंपरा आहे. पण आता ही प्रथा मुस्लिम महिलांसाठी धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे मुस्लिम महिला यातून होण्याऱ्या त्रासाबद्दल बोलतायत, त्याचा विरोधही करत आहेत. पण खतना म्हणजे नेमकं काय ? तर गुप्तांगाचा काही भाग कापण्याची प्रक्रिया म्हणजेच खतना ! यालाच सुंता असंही म्हटलं जातं. महिलांमध्ये होणाऱ्या खतनामध्ये काही प्रकार आहेत. यामध्ये काहीवेळा vulva , तर काहीवेळा त्यांचा क्लिटॉरिस कापून काढला जातो. पारंपरिक पद्धतीत यासाठी ब्लेड किंवा चाकूचा वापर केला जातो आणि यानंतर हळद, गरम पाणी आणि एखादं-दुसरं मलम लावून त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. (Top Stories)
इंग्रजीत याला ‘फिमेल जेनिटल म्युटिलेशन’ म्हणजेच FGM असं म्हणतात.मुस्लिम धर्मामध्ये खतना केल्यानंतर महिलांना ‘शुद्ध’ किंवा ‘लग्नासाठी तयार’ असं मानल जात. बरेच लोक असा दावा करतात की या पद्धतीचे आरोग्य फायदे आहेत, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार तथ्य आहे. उलट डॉक्टरांच म्हणण आहे की खतना केल्याने लैंगिक सुखाचा आनंद कमी होऊ शकतो, त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतात. संसर्ग होऊ शकतो, reproductive सिस्टिम मध्ये गुंतागुंत होऊ शकते, वंध्यत्व येऊ शकत. कारण मानवी शरीरातील इतर कोणत्याही अवयवापेक्षा क्लिटॉरिसमध्ये सर्वात जास्त मज्जातंतू असतात आणि तो स्त्रीच्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहे. जेव्हा तो partच काढून टाकला जातो तेव्हा मज्जातंतू कापले जातात. यामुळे संवेदनशीलता नष्ट होते. (Top Stories)
सामान्यतः मुलींची खतना लहानपणापासून ते १५ वर्षांच्या दरम्यान केली जाते. साधारणपणे, कुटुंबातील महिला हे काम करतात. खतनेमुळे महिलांना शारीरिक त्रासच सहन करावा लागतो असं नाही तर याशिवाय विविध प्रकारच्या मानसिक त्रासालाही तोंड द्यावं लागतं. त्यांच्या सेक्स लाइफवरही याचा परिणाम होतो आणि त्या सेक्स एंजॉय करू शकत नाहीत. शिवाय लहानपणी खतना झाल्यानंतर मुलींना कुणावरही विश्वास ठेवणं अवघडं होतं. कारण घरातलीच मंडळी त्यांना आमिषं दाखवून खतना करण्यासाठी घेऊन जातात. लहानपणी निर्माण झालेला हा अविश्वास पुढे बराच काळ तसाच राहू शकतो. त्याचबरोबर कोणत्या न कोणत्या कारणांमुळे महिलांच्या जीवनावर त्याचा परिणाम होताना दिसतो. काही प्रकरणांमध्ये,त्रास इतका होतो कि त्यांचा जीव जातो. पण जगात असे अनेक देश आहेत जिथे आजही धर्म आणि परंपरेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केले जात आहेत. (Female Circumcision)
महिलांची खतनासुद्धा त्यापैकीच एक आहे. डाउन टू अर्थ वेबसाइटच्या अहवालानुसार, ही वाईट प्रथा ९२ हून अधिक देशांमध्ये सुरू आहे आणि भारतही यांच्यापैकीच एक देश आहे. एका अहवालानुसार भारतातील दाऊदी बोहरा मुस्लिमांमध्ये महिलांची खतना सामान्य आहे. इथं बोहरी मुस्लीम समाजात (दाऊदी बोहरी आणि सुलेमानी बोहरी) ही प्रथा आहे.भारतात साधारणपणे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये बोहरी मुसलमान लोक आहेत. काही ठिकाणी तर बंदी असूनही परंपरेच्या नावाखाली महिलांची खतना करणे सामान्य आहे. आफ्रिकन खंडात तर असे अनेक देश आहेत जिथे जवळजवळ सर्व महिलांना खतना करावी लागते. यातील मुख्य देश म्हणजे सोमालिया, जिबूती आणि गिनी. याशिवाय, येमेन, इराक, मालदीव आणि इंडोनेशियामध्ये महिलांची खतना सर्वाधिक प्रमाणात होते. २०२० मध्ये, युनिसेफने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील सुमारे २० कोटी मुली या क्रूर प्रक्रियेला सामोऱ्या गेल्या आहेत. (Top Stories)
==================
हे देखील वाचा : Civet Cats : हुंडा असावा तर असा !
==================
दरम्यान भारतातल्या याच बोहरी मुस्लीम समाजाशी संबधित इंसिया दरीवाला यांच्या मते, ‘क्लिटरिस’ला बोहरी समाजात ‘हराम की बोटी’ असं म्हटलं जातं. यामुळे मुलींमध्ये लैंगिक भावना वाढते, असं बोहरी मुस्लीम मानतात. इंसिया यांनी एका मुलाखतीत सांगितलंय कि “आमच्या समाजातील लोक खतनाचं कारण दरवेळेस बदलून सांगत असतात.आधी ते सांगायचे हे स्वच्छतेसाठी केलं जातं. नंतर म्हणाले, मुलींची लैंगिक इच्छा नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येतं आणि आता जेव्हा याला विरोध होऊ लागला तर ते म्हणतात लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी ते केलं जातं.” आता जन्माआधी गर्भजल लिंग निदान चाचणी बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. (Female Circumcision)
त्याचप्रमाणे खतनालाही बेकायदेशीर ठरवलं जावं यासाठी भारतात अनेक स्त्रिया पुढे येतायत. ६ फेब्रुवारी रोजी झीरो टॉलरन्स फॉर fgm हा दिवससुद्धा साजरा करण्यात येतो. पण यावर आळा आणण्यासाठी किंवा यावर शिक्षा ठरवण्यासाठी मुळात तो देशात गुन्हाच मानला जात नसेल तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोमध्ये त्याची आकडेवारी कुठून येईल शिवाय आणखी एक गोष्ट यात लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मुलींची खतना फार लहानवयातच केली जाते. त्यावेळेस त्यांना काही माहितच नसत. मग त्या पोलिसांना काय सांगणार? तसंच, खतना करणारे घरचेच लोक असल्यानं ही बाब बाहेर येतच नाही त्यामुळे हा कायदेशीर गुन्हा ठरवण्यासाठी सरकारलाच काहीतरी पावलं उचलावी लागणार एवढं मात्र नक्की !