ज्या दिवसाची संपूर्ण महाराष्ट्र्र किंबहुना संपूर्ण भारत वाट बघत होता अखेर तो ६ जून १६७४ चा दिवस उजाडला. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण होते. मंगल सुरांनी संपूर्ण वातावरणच पवित्र झाले होते. फुलांची सजावट, स्त्री पुरुषांची लगबग, मंत्रोच्चारांचे कानावर पडणारे आवाज, जय भवानी जय शिवाजीचा गजर अशा मंगलमय वातावरणात अनेक शतकांनी ६ जून १६७४ रोजी हिंदूंना त्यांचा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने लाभला. डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि मनुष्य जन्माचे सार्थक करणारा नेत्रदीपक आणि भव्य शिवराज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर संपन्न झाला. (Chatrapati Shivaji Maharaj)
शिवराज्याभिषेकासाठी रायगडाची निवड करण्यात आली. १६५६ मध्ये शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला. राज्यकारभारासाठी १८ कारखाने, महाल, दरबार, बाजारपेठा रायगडावर उभारल्या गेल्यात. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. या किल्ल्याचे महत्व बघता राज्याभिषेकासाठी रायगडाची निवड करण्यात आली होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही सर्वच प्रजेसाठी अतिशय लक्षणीय घटना होती. काशी तर नव्हे संपूर्ण भारतातील विद्वान पंडित अशी ओळख असलेल्या गागाभट्ट यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला. (Marathi News)
राज्याभिषेकाची तयारी एक, दोन वर्ष आधीच सुरु झाली होती. राज्याभिषेकासाठी आवश्यक होते सिंहासन. महाराजांसाठी खास ३२ मण सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले होते. हे सिंहासन या राज्याभिषेकाचे खास आणि मोठे वैशिष्ट्य होते. या अतिशय सुंदर, भव्य सिंहासन तयार करण्याची जबादारी रामाजी दत्तो यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राज्याभिषेकाच्या एक वर्ष आधीपासूनच रामाजी दत्तो यांनी सुवर्ण सिंहासन तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. रत्नशाळेचे प्रमुख असलेल्या रामाजी दत्तो यांच्याकडे शिवाजी महाराजांनी त्यांना सिंहासनाचे काम करण्यासाठी नेमले होते. (Todays Marathi Headline)
या सिंहासनासाठी रत्नशाळेतील सर्व मौल्यवान रत्ने वापरण्यात आली. सिंहासनाला भव्यता आणि वैभव प्रदान करण्यासाठी सोन्याबरोबरच हिरे, माणके, पाचू आणि इतर रत्ने यांचा वापर करण्यात आला. डच वखारीतील ‘अब्राहम ले फेबर’ याने डच गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात या सिंहासनाचे नाव ‘शिवराज’ असे नमूद केले आहे. या पत्रातून सिंहासनाच्या भव्यतेची आणि वैशिष्ट्याची कल्पना येते. या राज्याभिषेक सोहळ्याला हेन्री ऑक्झेंडन नावाचा इंग्रज अधिकारी आणि नारायण शेणवी नावाचा दुभाषा उपस्थित होता हेनरीच्या डायरीत राजसिंहासनाचा उल्लेख आढळतो. (Social Updates and News)
इतिहासात स्वराज्याच्या सिंहासनांबाबत वेगवेगळी माहिती मिळते. निश्चलपुरी गोसावी ‘शिवराज्याभिषेक कल्पतरु’ नावाचा एक ग्रंथ लिहला. त्या ग्रंथातही सिंहासनाचे वर्णन केलेले आहे. त्या सिंहासनावर आठ सिंह कोरले होतं. स्वराज्याच्या राजाचे सिंहासन ३२ मण सोन्यापासून बनले होते अशी माहिती यात आहे. याच सिंहासनाबाबत सभासद बखरीतही अतिशय सविस्तर आणि स्पष्ट उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. (Marathi Latest News)
१९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. त्यांनतर ६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा थाटामाटात राज्याभिषेक झाला. 32 मण सोन्याच्या भव्य सिंहासनावर बसून शिवराय स्वराज्याचे आणि हिंदूंचे राजा झाले. (Top Marathi Headline)
३२ मण म्हणजे किती?
आजच्या काळात वजन मोजण्यासाठी ग्रॅम आणि किलोग्रॅमचा वापर होतो, परंतु शिवाजी महाराजांच्या काळात वजन मोजण्यासाठी ‘मण’ आणि ‘शेर’ ही मापके वापरली जायची. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या मते, १ मण म्हणजे १६ शेर, १ शेर म्हणजे २४ तोळे आणि १ तोळा म्हणजे ११.७५ ग्रॅम.
– १ शेर = २४ तोळे × ११.७५ ग्रॅम = २८२ ग्रॅम
– १ मण = १६ शेर × २८२ ग्रॅम = ४,५१२ ग्रॅम (अंदाजे ४.५ किलो)
– ३२ मण = ४,५१२ ग्रॅम × ३२ = १,४४,३८४ ग्रॅम (अंदाजे १४४ किलो)
म्हणजेच, 32 मण सोन्याचे सिंहासन म्हणजे सुमारे १४४ किलोग्रॅम सोन्याचे होते. काही इतिहासकारांच्या मते, १ मण म्हणजे ४० किलो असाही उल्लेख आढळतो. या हिशोबाने ३२ मण म्हणजे १,२८० किलो सोने होते. परंतु, इतिहासातील नोंदींनुसार १४४ किलो हा आकडा विश्वासार्ह मानला जातो. (Top Trending Marathi News)
सिंहासनाचे पुढे काय झाले?
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज छत्रपती झाले. त्यावेळी हे सिंहासन होते परंतु, संभाजी महाराजांच्या निधनानंतर सुरु झालेल्या पेशव्यांच्या काळात या सिंहासनाविषयी फारशा नोंदी आढळत नाहीत. संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाचा सरदार इतिकादखानानं म्हणजेच झुल्फिकार खानानं रायगड किल्ल्याला वेढा दिला. या वेढ्यामध्ये त्याने महाराणी येसूबाई आणि शाहू राजे यांना कैद केले. हा किल्ला मुघलांच्या ताब्यात देताना झुल्फिखार खानाला तीन पेटारे भरुन सोनं मिळाल्याची माहिती आहे. मात्र यात कुठेही हे सिंहासन मिळाल्याची नोंद नाही. (Top Marathi NEws)
औरंगजेब जेव्हा कोणताही किल्ला जिंकायचा तेव्हा त्याच्या दप्तरी किल्ल्यातून मिळालेल्या सगळ्या मुद्देमालाची नोंद ठेवत असतं. स्वारीतून जिंकलेला सगळ्या वस्तू औरंगजेबाच्या खजिन्यात जमा होत असतं. रायगडावरुन सिंहासन ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद औरंगजेबाच्या दप्तरी दिसत नाही. १८१८ साली जेव्हा इंग्रजांनी रायगडावर ताबा मिळवला, तेव्हाही या ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर त्यांनी कब्जा केल्याचा कोणताही पुरावा किंवा नोंद इतिहासात सापडत नाही. (Top Stories)
=========
हे देखील वाचा : Shiv Rajyabhishek : शिवराज्याभिषेक सोहळ्याची माहिती
Shiv Rajyabhishek : म्हणून शिवरायांनी दोन राज्याभिषेक केले होते !
=========
या सिंहासनाबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जातात. काहींच्या मते झुल्फिकारच्या ताब्यात रायगड जाण्याआधीच महाराणी येसूबाई यांनी हे सिंहासन गुप्त ठिकाणी लपवले आहे. कारण हे सिंहासन अतिशय जड असल्याने ते सहजासहजी किल्ल्यावरून खाली नेता येणारे नव्हते. यासाठी ते रायगडावरच कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. तर काहींच्या मते गंगासागर तलावात ठेवल्याचा दावा करतात. पण अभ्यासकांना हा दावा तेवढासा पटत नाही. तर अजून काही अभ्यासकांच्या मते झुल्फिकाराने ते सिंहासन पाहिले आणि ते दिल्लीलाला नेणे शक्य नसल्याने त्याने ते तोडले आणि त्याचे हिरे, माणिक, पाचू सर्व बाजूला करून उरलेले सोने वितळवून त्या सोन्याचे गोळे तयार करून घेतले. मात्र यापैकी त्या सिंहासनाची नक्की काय झाले याबाबत काहीच नोंद आपल्याला इतिहासात सापडत नाही. (Latest Marathi Headline)