पंढरीची वारी जयाचिये कुळी | त्याची पायधुळी लागो मज || जेष्ठ महिना सुरु झाला की, संपूर्ण महाराष्ट्राला आणि विठ्ठलाच्या भक्तांना वेध लागतात ते वारीचे. विठुरायाच्या भेटीसाठी आसूसूलेल्या वारकऱ्यांना तर कधी एकदा विठुरायाच्या भेटीसाठी निघतोय असे झालेले असते. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची एक मोठी आणि महत्वाची ओळख ठरली आहे. शेकडो मेल पायी चालत वारकरी आपल्या विठुरायाचे दर्शन घेतात आणि तृप्त होतात. अशी ही वारी म्हणजे काय तर निव्वळ समाधान, अनुभूती, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक आनंद. असे म्हणतात की आयुष्यात एकदा तरी प्रत्येकानेच या वारीचा अनुभव घ्यायला पाहिजे. मात्र नक्की वारी म्हणजे काय? काय आहे या वारीचे महत्व? (Pandharpur Wari)
“पाऊले चालती पंढरीची वाट” संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेली पंढरपूरची वारी आपल्या राहत्या ठिकाणापासून पंढरपूरपर्यंत पायी चालत जायचे आणि विठू रायाचे दर्शन घ्यायचे. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होऊन विठ्ठल माउलींच्या नामाचा गजर करत त्यांच्या भक्तीत लीन होताना दिसतात. वर्षभरात चैत्र वारी, कार्तिकी वारी, आषाढी वारी, माघी वारी अशा चार वाऱ्या होतात. वारकरी या चारही वाऱ्यांना पायी पंढरपूरला जातात किंवा कोणत्याही एका वारीला जातात. मात्र, आषाढी आणि कार्तिकी वारीला विशेष महत्त्व असते. दर आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची पंरपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. (Marathi NEws)
विठ्ठलभक्त किंवा वारकरी पंढरपूरला येतात आणि त्याला पंढरपूरची वारी म्हणतात. या वारीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता केवळ देवाच्या भेटीच्या इच्छेने हे वारकरी चालत मार्गक्रमण करत असतात. या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी अधीर झालेले असतात. हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी घेत विठुरायाचे नाव घेत, अभंग गात, भक्तिगीते गात, नाचत आणि वाजत पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. (Latest Marathi News)
या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. पंढरपूरला पोहोचल्यावर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते. (Top Marathi Headline)
वारीची सुरुवात कोणी आणि कधी केली याबद्दल सांगितले जाते की, संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी वारीची सुरुवात केली. असे संदर्भ मिळतात. पूर्वी वाहने नसल्याने सर्वजण चालत चालत पंढरपूरला जायचे. विठ्ठलपंत कुलकर्णी हे न चुकता आषाढी वारी करत असे. यातून त्यांच्या विठ्ठलभक्तीची प्रचिती येते. ज्ञानेश्वर महाजांनी आपल्या वडिलांची विठ्ठलावरील प्रेम आणि आस्था पाहिली आणि त्यांची वारीची परंपरा सुरु ठेवली. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली. ज्ञानेश्वर महाजांच्या समाधीनंतर ही वारीची प्रथा संत तुकाराम महाराजांनी चालू ठेवली. ते सुद्धा पंढरपूरची वारी करत होते. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी १६८५ साली श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली होती. (Social Media Updates)
वारी व्यवस्थापन
प्रत्येक ठिकाणावरून निघणाऱ्या वारीचे वेळापत्रक आधीच प्रकाशित केले जाते आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. या वेळापत्रकामध्ये संपूर्ण तपशीलवार माहिती दिली जाते. वारी निघण्याचे ठिकाण आणि विश्रांतीचे ठिकाण, जेवण, विश्रांती आणि रात्रीचा मुक्काम आदी सर्वच बारीक सारीक गोष्टींबद्दल देखील सांगितले जाते. दररोज सकाळी लवकर पहाटे संतांच्या पादुका पूजा केल्यानंतर, पालखी सकाळी ६ वाजता पुढील टप्प्यासाठी निघते. (Top Stories)
=============
हे ही वाचा : Kolhapuri Chappal: राज्या-महाराजांच्या पायाची शोभा वाढवणाऱ्या कोल्हापुरी चप्पलेचा जाज्वल्य इतिहास
============
सर्व वारकऱ्यांना सावध करण्यासाठी तीन वेळा तुतारी वाजवली जाते. ४ ते ५ किमी नंतर, ते नाश्त्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतात. आजच्या काळात तर वारीच्या मार्गात अनेक समाजसेवी संस्था, अनेक लोकं, धर्मादाय संस्था आदी अनेक लोकं वारकऱ्यांना विविध गरजेच्या गोष्टींचे वाटप करतात. वारीचा मुक्काम जिथे असेल तिथेच महिला स्वयंपाक करतात आणि सर्व एकत्र जेवतात. अभंग, गाणी गात नाचत रात्र जागवली जाते. पुन्हा सकाळी सर्व वारकरी नव्या उत्साहाने आणि आनंदाने चालण्यास सज्ज होतात. (Marathi Trending News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics