६ जून हा दिवस भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाचा आणि सुवर्णाक्षरांनी नोंद झालेला दिवस आहे. भारतातील महान राजांपैकी छत्रपती शिवाजी महाराज हे एक होते. छत्रपती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे नव्हे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहे. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराजांच्या केवळ नावांवेच शत्रूला घाम फुटायचे आणि त्यांचं नाव येताच थरथर कापायचे. काय आणि किती कीर्ती वर्णावी माझ्या राजाची….? एका उत्तम राज्यामध्ये जे जे गुण पाहिजे ते सर्वच गुण महाराजांमध्ये होते. आपल्या आईने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, आणि ते स्वप्न सत्यात उतरवले देखील. (Shiv Rajyabhishek)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसच खास होता. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्व होते. महाराजांनी त्यांच्या कामगिरीने आम दिवसाला देखील खास केले. आपण नेहमीच महाराजांच्या आयुष्यातील सर्वच महत्वाचे दिवस साजरे करतो, त्यांच्या पराक्रमचिया ठासून काढत महाराजांना वंदन करतो. असाच एक महाराजांच्या आणि पर्यायाने संपूर्ण मराठा साम्राज्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा एक दिवस म्हणजे ६ जून. या दिवशी संपूर्ण मराठा साम्राज्याने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले आणि एका स्वतंत्र व सार्वभौम हिंदू राज्याची स्थापना केली. (Marathi News)
६ जून १६७४ या तारखेचा मोठा इतिहास सर्वांनाच माहिती असेल. याच दिवशी छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि मराठा साम्राज्याला त्यांचा नवीन स्वतंत्र राजा मिळत नवीन युगाची सुरुवात झाली. आज महाराजांच्या राज्याभिषेकाला तब्बल ३५१ वर्ष पूर्ण झाली तरी देखील आजच्या दिवसाचे महत्व यत्किंचितही कमी झालेले नाही. आजही त्यावेळी जनतेच्या मनात जी भावना असेल तीच आपल्या सर्वांच्या मनात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या राज्याभिषेक दिनाचे विशेष महत्त्व आहे. रायगडावर दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. (Marathi Top News)
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, इ.स. १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला एक अभूतपूर्व दिवस आहे. या दिवशी शिवाजी महाराज विधीपूर्वक छत्रपती झाले आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली गेली. न भूतो न भविष्यती असा एक भव्य दैदिप्यमान सोहळा रायगडाने आणि जनतेने अनुभवला… डोळ्यांचे पारणे फेडणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न सत्यात उतरत असलेले दिवस. ६ जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. ६ जून १६७४ हा सुवर्णक्षण इतिहासाने, उपस्थित असलेल्या लोकांनी, डोंगरदऱ्यांनी, वाऱ्याने, पशुपक्ष्यांनी आणि त्या रायगडाने याची देही याची डोळा अनुभवला. आज आपण शिवराज्याभिषेकाच्या दिनी जाणून घेऊया याच सोहळ्याबद्दल. (Todays Marathi Headline)
=========
हे देखील वाचा : Shiv Rajyabhishek : म्हणून शिवरायांनी दोन राज्याभिषेक केले होते !
=========
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना होती किंबहुना आजही आहे. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘छत्रपती’ हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले.(Shiv rajyabhishek din)
महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरु केला आणि गुलामगिरीत अडकलेल्या महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवले. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला होता. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुरोगामी विचारसरणीचा विद्वान पंडित गागाभट्ट याच्याकडून करण्याचे निश्चित झाले होते. भारतातील सर्वात विद्वान पंडित म्हणून मिरविले गेलेले गागाभट्ट हे स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ऐकून त्यांची भेट घेण्यास आले होते आणि इथून पुढेच महाराजांच्या राज्याभिषेकाची खरी तयारी सुरू झाली. (Top Marathi Headline)
गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्या काळात गागाभट्ट केवळ काशीतीलच नवे तर संपूर्ण भारतातील विद्वान पंडित होते. त्यांनी राजांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी केली. गागाभट्ट यांना राज्याभिषेकाचे संपूर्ण ज्ञान त्यांना होते. गागाभट्ट यांनी शिवराज्याभिषेकासाठी एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला होता. राज्याभिषेक सोहळा नऊ दिवस चालला होता. (Top Stories)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होणार म्हणून महाराजांना बसण्यासाठी सिंहासन आवश्यक होते, म्हणून छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी खास ३२ मन सोन्याचे सिंहासन बनवून घेण्यात आले. राज्याभिषेक करणे हा एक धार्मिक विधीच आहे. राज्याभिषेक करण्यापूर्वी गागाभट्टांनी शिवराज्याभिषेकासाठी “तुला पुरुष दान विधी” व “राज्याभिषेक प्रयोग”हे दोन ग्रंथ तयार करून घेतले. राज्याभिषेक करण्यापूर्वी आवश्यक कार्य म्हणून छत्रपतींची मुंज करण्यात आली. राज्याभिषेक करण्यासाठी महाराजांची सुवर्णतुला देखील करण्यात आली. राज्याभिषेकासाठी महाराजांचे त्यांच्या पत्नींसोबत विधिवत विवाह करण्यात आले. (Social Updates/ News)
सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर अखेर तो ऐतिहासिक क्षण आला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९५ शनिवार दिनांक ६ जून १६७४ रोजी सकाळच्या वेळी महाराज सिंहासनारूढ झाले. राज्याभिषेक वेळी आसमंत मंगल सुरसुमनांनी न्हाऊन निघाला होता, मंत्रोच्चर आणि सुगंधी फुलांचा परिमल दरवळत होता. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. अनेक शतकांनी एक हिंदू राजा झाला. राजा राज गादीवर आल्यानंतर राज्यातील गोरगरीब गरजवंत या सर्वांना दानधर्म दक्षिणा दिली जाते तसेच दानधर्म दक्षिणा छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी देण्यात आली. शिवराज्याभिषेकाचा साठी भारत भर ब्राह्मणांना आमंत्रणे पाठवण्यात आली होती. रायगडावर पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. (Marathi Latest News)
विदेशी व्यापारी, इंग्रज, परकीय शासक, प्रजा असे सारे लोक राजांच्या राज्याभिषेक वेळी उपस्थित होते. गागाभट्ट व इतर ब्राम्हणांना दक्षिणा म्हणून होन देण्यात आल्या. यावेळी सोळा प्रकारचे महादान करण्यात आले. गरजूंना यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे दान देण्यात आले. छत्रपतींच्या राज्य हे आदर्श राज्य होते राज्यातल्या प्रत्येक गरजवंताला मदत केली जात असे. त्यावेळी महाराजांच्या राज्याभिषेकाचा खर्च ५० लाख आला होता. (Top Marathi Trending News)
राज्याभिषेक सोहळ्याआधी महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन व पूजा केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणे शक्य न झाल्याने त्यांनी प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमातेचे दर्शन घेतले. यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण करण्यात आली. या प्रसंगी मुख्य पुरोहित गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली गेली. राज्याभिषेका आधी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला करण्यात आली. तसेच वस्त्र , धान्य, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींनी देखील तुला करण्यात आली. जाणून घेऊया महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील सात दिवसांचा दिनक्रम. (Top Marathi)
३० मे १६७४ : (शनिवार) – शिवाजी महाराजांचे मौजीबंधन झाल्यामुळे शास्त्रानुसार राण्यांशी पुन्हा विवाह होणे आवश्यक होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी समंत्रक विवाह केले. या विवाहामुळे राजा म्हणून शिवाजी महाराज आणि पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी लागणारे हक्क शास्त्रानुसार प्राप्त झाले. वा. सी. बेन्द्रे यांनी सांगितले आहे, “लग्नविधी समंत्रक झाल्याने वैदिक पध्दतीप्रमाणे राज्याभिषेकविधी सपत्नीक करण्यास शास्त्रानुसार मोकळीक झाली. ”
३१ मे १६७४ : (रविवार) – ऐन्द्रीशांतीच्या कार्यास प्रारंभ झाला. अग्नीप्रतिष्ठा, इंद्राणी पूजा, चतुष्कभस्थापन, ऐशानयाग इ. विधी पार पाडण्यात आले. आचार्य आणि ऋत्विज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.
१ जून १६७४ (सोमवार) – ग्रहयज्ञ व नक्षत्रहोम हे विधी झाले.
२ जून १६७४ (मंगळवार) – मंगळवार आणि नवमी राज्याभिषेकाच्या कार्यास निषिध्द असल्यामुळे या दिवशी कोणताही विधी झाला नाही.
३ जून १६७४ (बुधवार) – नक्षत्रयज्ञ झाला.
४ जून १६७४ (गुरूवार) – या दिवशी रात्री निर्ऋतियाग हा यज्ञ पार पडला. मांस, मत्स्य व मंदिरा यांची याप्रसंगी आहुती देण्यात आली. यागानंतर स्नान करून पुण्याहवाचन करण्यात आले.
५ जून १६७४ (शुक्रवार) – हा दिवस राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस होता. या दिवशी ब्राम्हणभोजन आणि ऐन्द्रीशांतीच्या मुख्य कार्यांची समाप्ती करण्यात आली. राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासून पहाटेपर्यंत मंगलविधी सुरू होता. राज्याभिषेक समारंभ शुक्रवार दि. ५ जून रोजी सायंकाळपासून सुरू होऊन तो शनिवार दि. ६ जून १६७४ रोजी सकाळी पूर्ण झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर एक महादेव मुद्रा बनवण्यात आली होती. शिवछत्रपतींची मुद्रा अष्टभूजा असलेली आहे. यात ‘श्री महादेव श्री तुळजाभवानी II शिवनृपरूपेणोर्वीमवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णू:II एषा तदीय मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयतीII’ असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे. या श्लोकाचा मराठी अर्थ ‘’श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णूच होय. त्यांची ही मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणार आहे. तिचा जयजयकार असो.” असा आहे. ही मुद्रा शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकावेळी बनविली होती. मात्र त्यानंतरही महाराजांनी जुनी राजमुद्रा वापरली आहे. (Top Marathi News)
=========
हे देखील वाचा : Ajanta Caves : असा लागला अजिंठा लेण्यांचा शोध !
=========