गुजरातच्या अहमदाबाद शहरात मोठा विमान अपघात घडला आहे. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटचा टेक ऑफ दरम्यान भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. विमान जिथे कोसळले तो रहिवासी परिसर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना सध्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जात आहे. (Plane Crash)
दरम्यान अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. आकाशात आगीचे आणि धुराचे लोट दिसत आहे. या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या इथे बचावकार्य वेगाने सुरु झाले आहे. कोणताही विमान अपघात घडला की, बचाव कार्यासोबतच विमानातील ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो. एकीकडे जरी बचावकार्य सुरु असले तरी दुसरीकडे मात्र विमान अपघात का झाले याचे कारण देखील शोधले जाते. झालेल्या विमान अपघाताचे कारण शोधण्याचा सर्वात मोठा स्रोत असतो विमानाचा ब्लॅक बॉक्स. (Marathi News)
विमानाच्या उड्डाणापासून ते लॅंड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या ‘ब्लॅक बॉक्स’ मध्ये स्टोअर होत असतो. फ्लाइटसोबत झालेला अपघात जाणून घेण्यासाठी नेहमी ब्लॅक बॉक्सचा वापर केला जातो. हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या प्रवासादरम्यान सर्व उड्डाण हालचाली रेकॉर्ड करतो. हे एक प्रकारचं रेकॉर्डिंग डिव्हाइस आहे. ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण आणि उड्डाण डेटा रेकॉर्ड केला जातो. यालाच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) असेही म्हणतात. (Top Marathi Headline)
माहितीनुसार, ब्लॅक बॉक्स एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. विमान दुर्घटनेनंतर शेपटीला कमी मार लागतो, म्हणून ब्लॅक बॉक्स शेपटीच्या बाजूला बसवण्यात येतो. हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित रहावा यासाठी याला सर्वात मजबूत धातू टायटॅनियमपासून तयार केलं आहे. तसेच आतील बाजूस संरक्षित भिंती अशा पद्धतीने बनवल्या आहेत की, अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो आणि प्रत्यक्षात काय घडले हे समजू शकते. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी ३० दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो. (Todays Marathi Headline )
अपघात झाल्यास ब्लॅक बॉक्समधून सतत आवाज येत असतो, जो शोधपथकातील लोकांना दूरुनच ऐकू येऊ शकतो. समुद्रात २०००० फूट खाली पडल्यानंतरही या बॉक्समधून आवाज आणि लहरी बाहेर पडत राहतात आणि त्या सतत ३० दिवस सुरू राहतात. या डिव्हाइसचे नाव जरी ‘ब्लॅक बॉक्स’ असले तरी तो साधारणता चॉकलेटी-नारंगी रंगाचा असतो, ज्यामुळे तो अपघातस्थळावर सहज शोधता किंवा ओळखता येतो. ब्लॅक बॉक्स हा एक म्हणजे Flight Data Recorder (FDR) – इथं इंजिन, वेग, उंची, फ्लॅप्स, ब्रेकिंग आणि इतर जवळपास 88–1000+ नोंदी घेतल्या जातात आणि दुसरे Cockpit Voice Recorder (CVR) – यामध्ये पायलटांमध्ये, ATC किंवा इतर आवाजांचे अंतिम २ ते २५ तासांचे ऑडिओ रेकॉर्डिंग असते. या दोन महत्वाच्या घटकांनी बनलेला असतो. (Top Marathi News)
===========
हे देखील वाचा : Ahmedabad : अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना लंडनला जाणारे विमान कोसळले
===========
या सगळ्या गोष्टी अपघाताचे किंवा विमान खराबीचे कारण शोधण्यासाठी मदत करतात. एवढेच नाही तर अपघाताच्या वेळी पायलट, क्रु मेमंबर्स यांच्यामध्ये काय बोलणे सुरु असते हे देखील या ब्लॅक बॉक्समधून समजते आणि त्यावरूनच अपघाताचे कारण शोधणे सोपे जाते. या डिव्हाइसचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, हे उपकरण अशा प्रकारे बनवलेले असते, की किती मोठा अपघात असो, कितीही मोठ्या आगीच्या ज्वाळा असो, पाण्याच्या खोली कितीही असली तरी सुद्धा हे डिव्हाइस काम करते आणि त्यातील डेटा दीर्घ काळ सेव्ह रहातो. (Marathi Latest News)