अहमदाबाद विमान अपघातातून अजून लोकं सावरत नाही तोवर अजून एक मोठा अपघात झाला आहे. उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ३ जणांचा समावेश आहे. राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल अशी या मृतांची नावे असून, हे सर्वजण यवतमाळ जिल्ह्यातील वणीतील रहिवाशी आहेत. सुदैवाने राजकुमार जयस्वाल यांचा मुलगा विवान हा त्याच्या आजोबांसोबत पांढरकवडा येथे थांबलेला असल्यामुळे तो बचावला. (Kedarnath)
केदारनाथ येथील गौरीकुंड परिसराजवळ हा भीषण अपघात झाला. दुःखद बाब म्हणजे, या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व ७ जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे कदाचित हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अपघातानंतर एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली. (Marathi News)
हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर तिथे धूर दिसू लागला. हे तिथे गवत कापण्याचे काम करणाऱ्या महिलांनी पाहिले आणि लगेच स्थानिक प्रशासनाला या अपघाताची माहिती दिली. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री असलेल्या पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातांवर दुःख व्यक्त केले आहे. आर्यन एव्हिएशनचे हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा पुरवत होते. यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ गाठतात. हा अपघात अंदाजे पहाटे ५:३० च्या सुमारास घडला असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. (Todays Marathi HEadline)
केदारनाथ खोऱ्यात दाट धुके आणि जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर भरकटले. यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि ते गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघाताबद्दल उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी सांगितले की, “खराब हवामान हे या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.” (Top Stories)
दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी असलेले राजकुमार जैस्वाल, श्रद्धा आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी हे कुटुंब १२ जून रोजी केदारनाथच्या दर्शनासाठी निघाले होते. दर्शनासाठी त्यांनी हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय निवडला होता. मात्र, ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची यात्रा ठरली. राजकुमार जयस्वाल यांचा मुलगा विवान हा त्या दिवशी आपल्या आजोबांसोबत पांढरकवडा येथे थांबलेला असल्यामुळे बचावला. या कुटुंबाच्या निधनाने वणी गावात शोककळा पसरली आहे. (Latest Marathi NEws)
केदारनाथ मार्गावर हेलिकॉप्टर कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये क्रॅश झाले आहेत. यापूर्वीही चारधाम यात्रेदरम्यान अनेक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहेत, तसेच काही हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंगही करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच एका हेलिकॉप्टरला रस्त्याच्या मधोमध क्रॅश लँडिंग करावी लागली होती. चारधाम यात्रा सुरू झाल्यानंतर लगेचच एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. (Marathi Trending News)
हेलिकॉप्टर क्रॅश होण्याच्या या घटना पाहता केदारनाथ मार्गावरील हेलिकॉप्टरच्या फेऱ्या प्रशासनाकडून कमी करण्यात आल्या आहेत. रोजच्या हेलिकॉप्टरच्या ६० फेऱ्या कमी करण्यात आल्या असून, दररोज सरासरी २०० ते २५० फेऱ्या हेलिकॉप्टरद्वारे होतात. केदारनाथमध्ये होणाऱ्या या सततच्या अपघातांमुळे डीजीसीएने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केदारनाथ मार्गावर डीजीसीएने नियम अधिक कडक केले असून, आता आलेल्या नवीन आदेशानुसार, गुप्तकाशीहून एका तासात केवळ दोनच हेलिकॉप्टर उड्डाण करू शकतील आणि ८ तासांमध्ये एकूण 16 हेलिकॉप्टर उड्डाण करू शकणार आहे. (Social Updates)
========
हे देखील वाचा : Canada : प्रोजेक्ट पेलिकनमुळे खलिस्तानवाद्यांना हादरा !
Monsoon : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट
========
हेलिकॉप्टरच्या फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांची आता गैरसोय होणार हे नक्की. मात्र हीच गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून आता योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणांवर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. केदारनाथमध्ये यापूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे, त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (Top Marathi Headline)