चीन मधील नागरिकांनी बांगलादेशमध्ये सोयरीक जमवणे टाळावे, असा आदेश थेट बांगलादेशमधील चिनी दूतावासानं जाहीर केला आहे. भारताच्या दोन शेजारी देशांमध्ये या मजेशीर आदेशानं अनेकांच्या भुवया उचांवल्या आहेत. वरवर पाहता मजेशीर असलेल्या या आदेशामागे या दोन्ही देशामधील सामाजिक भीषणता लपवली गेली आहे. चीनमध्ये घटता जन्मदर आणि लोकसंख्येचे वाढते वय, ही एक मोठी समस्या झाली आहे. त्यातच विवाहयोग्य तरुणांना लग्नासाठी मुलीच मिळत नसल्यानं असे चिनी नागरिक बांगलादेशसह इतर देशांमध्ये वधू शोधतात. अशा तरुणांची फसवणूक होण्याची संख्या अलिकडे वाढली आहे. शिवाय बांगलादेशमध्ये आशियायी देशातील तरुणींबरोबर विवाहाचे प्रमाण वाढले आहे. अनेक बांगलादेशी कुटुंब आपल्या घरातील मुलींची विवाहाच्या नावाखाली विक्री करत आहेत. (China)
यातून मानवी तस्करी वाढली आहे. त्यामुळे या मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी बांगलादेश सरकारनं कडक कायदे केले आहेत. या कायद्यांच्या कचाट्यात चिनमधील काही युवक अडकल्याच्या घटना अलिकडच्या काळात घडल्या आहेत. यावरुन ढाका येथील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना बांगलादेशमध्ये सोयरीक करु नका, असा आदेशच दिला आहे. एखाद्या देशातील सामाजिक समस्या किती व्यापक होऊ शकते, याचे उदाहरण नुकतेच, ढाका येथील चिनी दूतावासाच्या आदेशात दिसून आले आहे. अशा सामाजिक समस्येनं ग्रस्त असलेल्या देशात पहिला नंबर येतो, तो चीनचा. चीनमधील घटत्या जन्मदरानं येथे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यात विवाहयोग्य तरुण आणि तरुणींनाही लग्नासाठी योग्य जोडीदार मिळेनासा झाला आहे. अशांसाठी ऑनलाईन विवाहमंडळे ही मदतनीस ठरत आहे. मात्र यात अधिक भरणा आहे, तो बांगलादेशमधील ऑनलाईन विवाह मंडळांचा. बांगलादेशमधील सामाजिक परिस्थितीही झपाट्यानं बिघडत आहे. (International News)
त्यामुळे येथील पालक आपल्या मुलांना देशाबाहेर पाठवण्यासाठी उत्सुक आहेत. ते अशा विवाह मंडळात आपल्या मुलांचे नाव नोंदवतात. यात मुलींची संख्या जास्त आहे. अशा मुलींचे अन्य देशातील मुलांबरोबर लग्न झाले तर तिच्या पालकांना मोठा मोबदला मिळतो. त्यामुळे बांगलादेशमध्ये मोठ्याप्रमाणात ऑनलाईन विवाह मंडळाचा व्यापार सुरु झाला आहे. यात अनेक मंडळे ही बनावट असून त्यातून परदेशी तरुणांकडून पैसे उकळण्यात येतात. नंतर अशा साईट बंद होतात. अशा परिस्थितीत या तरुणांना मोठा आर्थिक फटका बसतो. चिनी तरुणांची संख्या यात अधिक असल्यानं आता बांगलादेशातील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना ऑनलाइन विवाह केंद्रापासून दूर रहा, अशा सूचना देणारे निवेदनच जाहीर केले आहे. यात परदेशी पत्नी खरेदी करु नका, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. यासोबत विवाह जमवणारे एजंट किंवा अन्य व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींपासूनही दूर रहाण्याचे सांगण्यात आले आहे. (China)
यासोबत बांगलादेशमधील डेटिंग अँपची माहितीही देण्यात आली आहे. चीन आणि बांगलादेशातील तरुण-तरुणींमध्ये होणारे हे विवाह ब्लाईंड मॅरेज म्हणून प्रसिद्ध होत आहेत. यातून बांगलादेशी तरुणींची तस्करी चीनध्ये करण्यात येऊ लागली. यामुळे बांगलादेशमधील सामाजिक संस्थांनी यावर आवाज उठवायला सुरुवात केली. यातून सीमापार बेकायदेशीर विवाहांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना तस्करीच्या संशयावरून अटक करण्यात येऊ लागली आहे. बांगलादेशमध्ये, मानवी तस्करीच्या आरोपांसाठी किमान सात वर्षांचा तुरुंगवास, जन्मठेपेची शिक्षा किंवा मृत्युदंड ही देण्याची तरतूद आहे. याशिवाय 500000 टक्का दंड होऊ शकतो. तस्करीला मदत करणाऱ्यांनाही तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि 20000 टक्का दंड होऊ शकतो. अलिकडे अशा प्रकरणात काही चिनी युवक अडकले गेले आहेत. त्यामुळे सतर्क झालेल्या चिनी दूतावासानं निवेदन जाहीर केले आहे. (International News)
=================
हे देखील वाचा : Jawaharlal Nehru Tribal Wife : ‘ती’ आदिवासी नेहरूंची पत्नी होती ?
Indian Fort : किल्ल्यात दडलाय अरबो रुपयांचा खजिना !
=================
चीनमध्ये विवाह समस्या पुढच्या काळात मोठी होणार आहे. चिनी तरुण लग्न करण्यासाठी पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम या देशातील तरुणींना पसंती देत आहेत. कारण चीनमध्ये महिलांपेक्षा सुमारे 3 कोटी पुरुष जास्त आहेत. येथील कुटुंब नियोजन धोरण या असमतोलास कारणीभूत ठरले आहे. ग्रामीण भागात लिंग असमतोल सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे लग्न करण्यात अनेक अडचणी येतात. अशावेळी तरुण सीमापार बेकायदेशीर विवाह मंडळांच्या जाहिरातींना बळी पडतात. गेल्या महिनाभरातच पाकिस्तान आणि बांगलदेशामध्ये चिनी युवकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळेच बांगलादेशातील तरुणींबरोबर विवाह करु नका, अशा कडक शब्दात चिनी दूतावासानं निवेदन जाहीर केले आहे. (China)
सई बने