अखेर ३ जूनचा दिवस उजाडला आणि तब्बल १८ वर्षांपासून ज्या ट्रॉफीची वाट पाहिली ती हातात मिळाली. नुकताच आयपीएलच्या १८ व्या पर्वाचा शेवट झाला. अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी हरवत पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद पटकावले. या दिवसाची मागील अनेक वर्षांपासून आरसीबीचा फॅन वाट बघत होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयामुळे ना केवळ बंगळुरू तर मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली, चेन्नई जिथे जिथे या टीमचे फॅन्स आहे तिथे सर्वच ठिकाणी मोठा जल्लोष झाला, फटाके फुटले. जिथे संपूर्ण देश आरसीबीचा विजय साजरा करत होता, तिथेच एका घटनेने आरसीबीच्याच काय तर संपूर्ण देशाच्या आंनदावर विरजण पडले. फॅन्स हा आनंद फार काळ टिकला नाही. (RCB)
आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या काही तासांनंतरच एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मात्र स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आहे. ३०००० लोकांची क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये तब्बल ३ लाख लोकं आले आणि पोलिसांचा एकच गोंधळ उडाला. गर्दीपुढे पोलीस देखील हतबल झाले आणि आनंदोत्सव क्षणात दुःखात बदलला. (Marathi NEws)
झाले असे की, आरसीबीचा विजय झाल्यानंतर त्यांचा विजय साजरा करण्यासाठी आरसीबीची टीम बंगलोरमध्ये पोहचली. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सर्व खेळाडूंचा सत्कार समारंभ होणार होता. यासाठी आरसीबीच्या वेबसाइटवरून पासेस मिळणार होते. बुधवारी याबद्दलची घोषणा झाली. मोठ्या संख्येने लोकांनी वेबसाइटला भेट देण्यास सुरुवात केली आणि साइट क्रॅश झाली. पास मिळालेल्यांसोबत, पास नसलेले लोक देखील स्टेडियममध्ये पोहोचले. यामुळे गर्दीचा अंदाज येत नव्हता. सरकारने सांगितले की ५ हजार सुरक्षा कर्मचारी होते, परंतु गर्दी खूप मोठी होती. त्यामुळे विजय मिरवणूक होऊ शकली नाही. माहितीनुसार, यातील बहुतेक पोलिस ३६ तास ड्युटीवर होते. (Marathi Latest News)
मिळालेल्या माहितीनुसार स्टेडियम बाहेर जमलेल्या लोकांनी गेट नंबर १२, १३ आणि १० हे गेट तोडून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लाठीमार केला. नाल्यावर ठेवलेला स्लॅब कोसळला. हलक्या पावसात चेंगराचेंगरी झाली. दुपारी साडेतीन वाजता गर्दी वाढली आणि सर्व दरवाजे बंद झाले. त्यामुळे पास असलेल्यांनाही आत जाता आले नाही. गोंधळ सुरू झाला. गेट क्रमांक १० वर परिस्थिती खूपच खराब होती. पोलिसांनी महिला आणि मुलांना मागे ढकलले, काही महिला बेशुद्ध पडल्या. (Todays Marathi HEadline)
कर्नाटक विधानसभेत आरसीबी टीमचा सत्कार सुरु झाला, संपूर्ण टीमसह कर्नाटक सरकारचे प्रमुख नेते उपस्थित होते, विधानसभेच्या आवारातही फॅन्सची मोठी गर्दी होती. स्टेडियम बाहेरील गर्दीचा संयम सुटला आणि त्यांनी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराचा दरवाजा तोडून, भिंतींवरुन, झाडांवरुन, कारवर चढून आत जाण्याचा प्रयत्न सुरु केला. अशातच चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ११ निर्दोष लोकांचा जीव गेला. (Social Updates)
या संपूर्ण दुर्घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “जेव्हा आरसीबी संघ विधानसभेत पोहोचला तेव्हा विधानसभेबाहेर एक लाख लोक जमले होते. विधानसभेत जल्लोष सुरू होता, पण चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. स्टेडियमबाहेर ३ लाख लोक जमले होते. आम्हाला एवढ्या मोठ्या गर्दीची अपेक्षा नव्हती. आम्ही यासाठी तयार नव्हतो. या दुर्घटनेने विजयाचा आनंद नाहीसा झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदतीची आम्ही घोषणा करत आहोत.” (Top Marathi HEadline)
या दुर्घटनेचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होता आहे. नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या घटनेनंतर आरसीबीने देखील त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक निवदेन जरी करत आपली बाजू मांडली आहे. आरसीबीकडून घडलेल्या या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांसाठी मनापासून संवेदना व्यक्त केल्या. (Top Stories)
आरसीबीने त्यांच्या निवेदनामध्ये लिहिले, “आज दुपारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आगमनावेळी बंगळुरु शहरातील सार्वजनिक ठिकाणी दुःखद घटना घडली. ही बातमी माध्यमांमधून आम्हाला समजली, यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. प्रत्येकाची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबीला खूप खेद आहे. आम्ही मृत कुटुंबांच्या दु:खात मनापासून सहभागी आहोत आणि त्याप्रती संवेदना व्यक्त करतो. (Latest Marathi Headline )
========
हे देखील वाचा : Trump And Musk : एकमेकांना शिव्या, शाप देऊ लागले !
========
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच आम्ही लगेच आमचा नियोजित कार्यक्रम बदलला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि सल्ल्याचे पूर्णपणे पालन करत आहोत. कोणत्याही टीमसाठी त्यांचे फॅन्स हे त्यांच्यासाठी सर्वस्व असतात. आरसीबीच्या चाहत्यांनी १७ वर्ष टीका सहन केली. मात्र आरसीबीची साथ सोडली नाही. चाहते आरसीबीसोबत एकनिष्ठ राहिले. “कृपया सुरक्षित रहा”” असे आवाहन देखील या निवेदनातून करण्यात आले आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Political News)