अशोक सराफ आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. मूळचे बेळगावचे असलेल्या अशोक सराफ यांचे बालपण मुंबईतच गेले. अभिनयात कारकीर्द घडवण्याच्या स्वप्नखातर त्यांनी त्यांची चांगली बँकेतील नोकरी सोडली आणि पूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यानंतर हळूहळू त्यांचा नावलौकिक वाढला आणि त्यांना चित्रपटांमध्ये भूमिका मिळू लागल्या. (Ashok Saraf)
अनेक चित्रपटांमधून काम करत अशोक सराफ हे कॉमेडीचे बादशाह बनले. अचूक टायमिंगच्या जोरवर त्यांनी विनोदी चित्रपटांना एक वेगळी उंची मिळवून दिली. अशोक सराफ यांनी जरी विविधांगी भूमिका केल्या असल्या तरी प्रेक्षकांना मात्र ते विनोदी भूमिकांमध्येच सार्वधिक आवडले. आपल्या एका वेगळ्या स्टाईलने कॉमेडी करत त्यांनी प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. आज अशोक सराफ हे नाव एक ब्रँड झाले आहे. आजच्या पिढीतील कलाकारांसाठी आणि येणाऱ्या अनेक कलाकारणांसाठी त्यांचा अभिनय म्हणजे एक विद्यापीठ असणार आहे. (Marathi News)
अशोक सराफ यांच्याबद्दल अनेक किस्से लोकांना माहित असतील. त्यांचे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. त्यामुळे मामांच्या आयुष्यातील लहान मोठ्या सर्वच गोष्टी प्रेक्षकांना माहित असतात. मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की, अशोक सराफ हे दोन वेळा मोठ्या जीवघेण्या अपघातातून वाचले आहेत. मामांचा दोनवेळा गंभीर अपघात झाला मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून आज अशोक सराफ आपल्यासोबत आहेत. अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात त्यांच्या या अपघातांबद्दल लिहिले आहे. (Top Stories)
१७ एप्रिल १९८७ रोजी अशोक सराफ यांनी पुण्यातले शूटिंग आटोपले आणि ते कोल्हापूरला दुसऱ्या शूटिंगला जाण्यासाठी निघाले होते. दिवसभर शूटिंगमुळे ते खूप थकले होते आणि त्यामुळे गाडीतच त्यांना झोप लागली होती. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी खेड शिवापूरजवळ आली. त्यांच्या गाडीच्या समोरून एका एसटीच्या मागून अजून एक एसटी जात होती. अशो मामा यांच्या गाडीचा ड्रायव्हर एकच एसटी असल्याचे समजून ओव्हरटेक करायला गेला आणि मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये अशोक सराफ सीटसकट गाडीबाहेर फेकले गेले होते. (Todays Marathi HEadline)
अशोक सराफ यांचा अपघात झाला तेव्हा त्यांना बघण्यासाठी तिथे खूप गर्दी जमली होती. त्यावेळी कल्पना कौशल नावाची एक महिला देखील तिथे होती. तिने अशोक यांना ओळखले. त्यानंतर पुणे गेस्ट हाऊसमध्ये तिने फोन लावला. हा फोन अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी उचलला. अशोक सराफ यांचा अपघात झाला आणि त्यांना उपचार मिळत नाहीयेत अशी माहिती तिने सूर्यकांत यांना दिली. तेव्हा निर्माते अजय सरपोतदार यांनी पोलिसांचे काहीही न ऐकता अशोक सराफ यांना संचेती इस्पितळामध्ये दाखल केलं. अपघातानंतर तीन दिवसांनी अशोक सराफ शुद्धीवर आले आणि घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी त्यांच्या भावाकडून ऐकली. (Marathi Top News)
या अपघातात अशोक सराफ यांच्या गाडीच्या ड्रायव्हरचे निधन झाले. अशोक सराफ यांना तिसऱ्या दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी शुद्ध आली तेव्हा ते आयसीयूमध्ये असल्याचे त्यांना समजले. तीन महिने उपचारानंतर अशोक सराफ या अपघातातून ठणठणीत बरे झाले. कल्पना कौशल हिच्यामुळेच आपण सुखरुप बचवलो तिच्यामुळे मला हा पुनर्जन्म मिळाला अशी आठवण त्यांनी या पुस्तकात सांगितली आहे. (Social News)
==========
हे देखील वाचा : Ashok Saraf : ‘अशोक-रंजना बाहेर या….’ जेव्हा नाशिकला हॉस्पिटल बाहेर चाहत्यांनी घातला गोंधळ
जाणून घ्या एव्हरग्रीन जोडी असणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी
Ashok Saraf : अशोक सराफ कसे झाले इंडस्ट्रीचे ‘अशोक मामा’…जाणून घ्या रंजक किस्सा
==========
अशोक सराफ यांचा दुसरा गंभीर अपघात २०१२ मध्ये झाला होता. यावेळीदेखील एका मोठ्या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. मुंबई-पुणे एक्प्रेसवरील तळेगावचा बोगदा क्रॉस करत असताना त्यांना गाडीचा पाठीमागील टायर फुटला होता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. एका मोठ्या अपघातातून त्यांची सुटका झाली. त्या गाडीमध्ये अशोक सराफ यांच्यासह अभिनेता संतोष जुवेकर, दिग्दर्शक असित रेडीज व संगीतकार सतीश चंद्र होते. (Celebrity News)