23 मे 2025, इंदोरच्या रघुवंशी कुटुंबाला एक धक्कादायक बातमी मिळाली. त्यांचा मुलगा राजा आणि त्यांची सून सोनम, जे हनिमूनसाठी शिलॉंगला गेले होते, ते अचानक बेपत्ता झाले. फोन बंद, मेसेजला उत्तर नाही, रघुवंशी कुटुंबाला काहीच कळेना. त्यानंतर अचानक 2 जूनला राजाचा मृतदेह मेघालयातल्या खोल दरीत सापडला, पण सोनमचा काही पत्ता लागला नाही. त्याचं रात्री राजाचा भाऊ बिपिन याला स्वप्नात येऊन राजाने सांगितलं की त्याचा खून झाला आहे. पण मग त्याची पत्नी सोनमचं काय? कुटुंबीयांना वाटलं, तिचं अपहरण झालंय. पण शेवटी बिपिनला पडलेलं स्वप्नं खरं ठरलं. 17 दिवसांनंतर असा खुलासा झाला की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. सोनमच राजाच्या हत्येची मास्टरमाइंड निघाली. राजा आणि सोनम रघुवंशी यांची ही स्टोरी, जी हनिमूनच्या रोमँटिक ट्रिपपासून सुरू झाली आणि एका भयानक हत्याकांडात संपली. नेमकं काय घडलं, आणि या प्रकरणात काय काय समोर आलं. हे जाणून घेऊ. (Indore couple case)
राजा आणि सोनमचं लग्न 11 मे 2025 ला इंदोरमध्ये थाटामाटात झालं. दोघंही खूश होते, किंवा असं तरी दिसत होतं. लग्नानंतर काही दिवसांतच हे जोडपं हनिमूनसाठी आसामला निघालं. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन त्यांनी शिलॉंगला जायचं ठरवलं. 22 मेपर्यंत ते कुटुंबीयांच्या संपर्कात होते. रोज फोनवर बोलणं, फोटो शेअर करणं, सगळं अगदी नॉर्मल चाललं होतं. पण 23 मे नंतर अचानक सगळं थांबलं. फोन स्विच ऑफ, मेसेजला रिप्लाय नाही. कुटुंबीयांनी घाबरून मेघालय पोलिसांना तक्रार केली. (Top Stories)
पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन, लोकल गाइड्स यांची चौकशी, सगळं काही तपासलं गेलं. आणि 2 जूनला सोहरा इथल्या एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर जखमांचे डाग होते, आणि हत्येसाठी वापरलेलं हत्यारही जवळच सापडलं. पोलिसांना खात्री झाली की ही हत्या आहे. पण ती का केली गेली होती? आणि सोनम कुठे? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर होते. सोनमंचा शोध घेण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत होता. सोनमच्या कुटुंबीयांना वाटलं, तिचं अपहरण झालंय. मेघालयातून तिला तस्करी करून बांगलादेशमध्ये नेलं गेलं असावं, असा संशय व्यक्त झाला. पण सत्य काही वेगळंच होतं. 9 जून 2025 ला, एक असा खुलासा झाला, ज्याने या संपूर्ण प्रकरणाचा ॲंगलचं बदलला.
पोलिसांच्या तपासातून हळूहळू सगळ्या गोष्टी उघड होत गेल्या. खरं तर, सुरुवातीपासूनच काही गोष्टी संशयास्पद होत्या. राजाच्या आईनं सांगितलं, की ते हनिमून ट्रिपला श्रीलंकेला जाणार होते. मग ते शिलॉंगला का गेले. तर कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एका अनोळखी व्यक्तीनं राजा आणि सोनमला शिलॉंगला जायचा सल्ला दिला. शिलॉंगबद्दल ऐकून सोनमने तिथेच प्लॅन बदलला. आणि तिकीट बुकिंगपासून ते हॉटेलपर्यंत, सगळं सोनमने ठरवलं. तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिला फॉलो करत होता.(Indore couple case)
22 मे ला दुपारी 12:43 वाजता शिलॉंगच्या एका होमस्टे मधलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं. या फुटेजमध्ये राजा आणि सोनम होमस्टेमध्ये चेक-इन करताना दिसतात. राजा गाडीवरून उतरतो, होमस्टेच्या स्टाफशी बोलतो, तर सोनम बाहेरच थांबते. राजा आपल्या सूटकेसमधून काही सामान काढून सोनमला देतो. त्यानंतर दोघंही सामान तिथे ठेवून स्कूटीवरून बाहेर पडतात. पण यात एक गोष्ट संशयास्पद होती – सोनम सतत फोनवर काहीतरी करत होती, लांब जाऊन कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करत होती.(Top Stories)
या फुटेजमध्ये एक लाल रंगाची अल्टो गाडीही दिसली, ज्यात दोन माणसं होती. एक जण फोनवर बोलत होता, तर दुसरा राजा आणि सोनमकडे बघत होता. दुसऱ्या दिवशी, 23 मे ला, लोकल गाइड अल्बर्ट पेड यानं राजा आणि सोनमला तीन अनोळखी लोकांसोबत पाहिलं. त्याने पोलिसांना सांगितलं की, राजा आणि ते तिघेजण हिंदीत बोलत होते, तर सोनम त्यांच्या मागे चालत होती आणि यानंतरच ते बेपत्ता झाले.(Indore couple case)
राजाच्या मृतदेहाजवळ एक पांढरा शर्ट सापडला, जो सोनमने बेपत्ता होण्यापूर्वी घातला होता. तिच्या रेनकोटवर रक्ताचे डागही आढळले. सोनमचा तपास पोलिस घेत होते आणि अशात 8 जून 2025 ला सोनमच्या घरी एक फोन आला… तो स्वत: सोनमने केला होता. 17 दिवसांपासून तिचा काहीच पत्ता नव्हता तिचा कॉल आल्यामुळे घरच्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिने हा फोन उत्तरप्रदेशमधल्या गाझीपुरमधील एका धाब्यावरुन केला होता. तिच्या घरच्यांनी ही माहिती तात्काळ इंदोर पोलिसांना कळवली. इंदोर पोलिसांनी गाजीपूर पोलिसांशी संपर्क साधला, त्यानी तातडीने कारवाई केली. सोनमला गाजीपूरमधल्या त्या ढाब्यावरून ताब्यात घेण्यात आलं. (Top Stories)
===================
हे देखील वाचा : पाकिस्तानला वारंवार कर्ज कसे मिळते? जागतिक संस्थांची मजबुरी काय?
===================
तेव्हाचं तिने कबूल केलं की राजाची हत्या तिनेच घडवून आणली आहे. तिने राजाची हत्या करण्यासाठी मध्यप्रदेशातल्या काही जणांना सुपारी दिली होती. या तिघांपैकी राज कुशवाहा, विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर चौथा संशयित आनंद अजूनही फरार आहे. या तिघांपैकी एकाला उत्तर प्रदेशातून, तर बाकी दोघांना इंदोरमधून अटक करण्यात आली. तिघांनीही हत्येची कबुली दिली आणि सांगितलं की सोनमच त्यांना या प्लानसाठी हायर केलं होतं.(Indore couple case)
सोनमने आपल्या पतीची हत्या का केली, याचं कारण अजून स्पष्ट नाही. पण पोलिसांनी तपासात काही गोष्टी सांगितल्या. सोनमचं अफेअर असल्यामुळे तिने हे घडवून आणली असं सांगितलं जातंय. सोनमचं राज कुशवाहासोबत अफेअर असल्याची माहिती मिळाली आहे. राज कुशवाहा हा सोनमच्या वडिलांच्या प्लायवुड फॅक्ट्रीत काम करायचा. सोनम तिथे जात असे, आणि तिथेच त्यांची ओळख आणि नंतर मैत्री झाली. या मैत्रीचं नातं पुढे अफेअरमध्ये बदललं, असा संशय आहे. पोलिसांचा असा अंदाज आहे की या अफेअरमुळे सोनमने राजाला मार्गातून हटवण्याचा कट रचला असावा. याबाबत पोलिसांचा तपास अजून सुरू आहे. पण सोनमच्या अफेअरची गोष्ट आणि तिच्या कटाची पद्धत पाहता, हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे. या प्रकरणाने सगळ्यांना हादरवून सोडलं. मेघालय पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, आणि लवकरच आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics