भाज्या किंवा फळ ही नेहमीच ताजी रहावीत म्हणून आपण फ्रिजचा वापर करतो. त्यामुळे आपल्याला दररोज भाज्या-फळ आणण्यासाठी आपल्याला मार्केटला जावे लागत नाही. त्या आपण फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवतो. फ्रीजमध्ये काही गोष्टी दीर्घकाळ टिकून राहू शकतात. परंतु तज्ञांकडून असे ही सांगितले जाते की, काही फळ आणि भाज्या या फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण त्या फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर ते फूड पॉइजिनिंगचे कारण ही बनू शकतात. तर जाणून घेऊयात अशा भाज्यांबद्दल ज्या आपण फ्रिजमध्ये ठेवण्यापासून दूर राहिले पाहिजे.(Vegetables never store in fridge)
-काकडी
काकडीचा खासकरुन भाज्यांमध्ये समावेश केला जातो. कॉलेज ऑफ एग्रीकल्चर अॅन्ड एनवायर्नमेंटल सायंन्सनुसार जर काकडी ही १० डिग्री सेल्सियसच्या खाली तीन दिवसापेक्षा ठेवल्यास त्या सडतात. त्यामुळे काकडी फ्रिजमध्ये ठेवण्यापासून दूर रहा. फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा त्या उन्हापासून दूर आणि साधारण जागा ठेवा. या व्यतिरिक्त काकडी ही अवोकाडो, टॉमेटो आणि टरबूज सारख्या फळांपासून सुद्धा दूर ठेवा. असे करण्यामागील उद्देश असा की, ही फळ पिकल्यानंतर ते एथिलिन गॅस सोडतात. अशातच काकडी त्यांच्या संपर्कात आल्यास पिवळी होऊ शकते.
-टोमॅटो
तज्ञांनुसार, टॉमेटो नेहमीच खोलीतील तापमानानुसार स्टोर करावे. फ्रिजमध्ये टॉमेटो ठेवल्यानंतर त्याचा स्वाद आणि सुगंध प्रभावित होतो. त्यामुळे टॉमेटो हे थंड आणि सूर्याच्या किरणांपासून दूर ठेवा. खिडकीतून येणाऱ्या गरम किरणांमुळे टॉमेटो हे वेगाने पिकतात. फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेले टॉमेटो हे बाहेर ठेवल्यापेक्षा अधिक काळ टिकतात.
हे देखील वाचा- फक्त चवच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ‘असा’ चहा, तुम्हाला त्याबद्दल माहितीये का?
![Vegetables never store in fridge](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/07/freez2.jpg)
-कांदे
एनओच्या नुसार, कांदे हे थंड, अंधारात आणि हवा खेळती राहते त्या ठिकाणी ठेवावे. तसेच तापमान किंवा आर्द्रता अधिक असेल तर कांद्यांना कोंब येऊन ते सडू लागतात. जर कांदे थंड खोलीतील तापमानात ठेवल्यास ते दोन महिन्यांपर्यंत टिकू शकतात.(Vegetables never store in fridge)
-बटाटे
कच्चे बटाटे हे एका खुल्या जागेत ठेवणे हे नेहमीच उत्तम. परंतु फ्रिजमध्ये ते ठेवू नयेत. कारण कच्च्या बटाट्यात स्टार्चयुक्त कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेड बदलतो आणि खाणं शिजवल्यानंतर बटाट्याचा स्वाद गोड होतो. त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवण्यापासून दूर रहा. भाजी तयार केल्यानंतर तुम्ही ती फ्रिजमध्ये नक्की ठेवू शकता.
-लहसूण
लहसूण ही कधीच फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण ती लगेच ओलावा शोषून घेते. त्यामुळे कांद्याप्रमाणेच लहसूण ही शुष्क ठिकाणी ठेवा. कारण त्यांना हवेच्या संपर्कात ठेवण्याची गरज असते. आणखी महत्वाचे म्हणजे लहसूण कधीच पिशवीत भरुन ठेवू नका.