Home » Ekadshi : भूत, पिशाच्यांपासून मुक्ती देणारी माघ महिन्यातील पवित्र ‘जया एकादशी’

Ekadshi : भूत, पिशाच्यांपासून मुक्ती देणारी माघ महिन्यातील पवित्र ‘जया एकादशी’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ekadshi
Share

हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाची आणि खास असलेली तिथी म्हणजे ‘एकादशी’. एकादशी तिथी भगवान विष्णु यांना समर्पित आहे. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला आणि तिथीला पवित्र मानले गेले आहे. प्रत्येक महिन्यात दोन अशा वर्षातून २४ एकादशी तिथी येतात. प्रत्येक एकादशीला स्वतःचे एक महत्त्व असते. लवकरच माघ महिन्यातील एकादशी येत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘जया एकादशी’ असे म्हटले जाते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित असून, असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि सर्व पापांचा नाश होतो. या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. (Ekadshi)

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात २८ जानेवारी रोजी दुपारी ०४.३४ वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती २९ जानेवारी रोजी पहाटे ०१.५६ वाजता होईल. हिंदू धर्मात ‘उदयातिथी’ महत्त्वाची मानली जाते. २९ जानेवारी रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्याने, जया एकादशीचे व्रत गुरुवार, २९ जानेवारी २०२६ रोजी पाळले जाणार आहे. विशेष म्हणजे, गुरुवार हा भगवान विष्णूंचाच वार असल्याने या दिवशी एकादशी येणे अत्यंत शुभ मानले जात आहे. जया एकादशीच्या दिवशी इंद्र, रवी, भद्रवास आणि शिववास योगांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. जया एकादशीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ०७.११ ते ०८.३२ पर्यंत असेल. यानंतर सकाळी ११.१४ ते दुपारी ०१.५५ पर्यंतचा काळ पूजेसाठी खूप शुभ राहील. (Todays Marathi HEadline)

धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते ती ब्रह्महत्याच्या महापापातून मुक्त होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होते. जया एकादशी व्रत केल्याने पाप नाहीसे होतात, पापांपासून मुक्ती मिळते, मन आणि शरीर एकाग्र होते. पद्म पुराणात भगवान श्री कृष्णाचे शब्द सांगितले आहेत ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे व्रत पाळतो त्याला वेदनादायक पिशाच जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही. राजा हरिश्चंद्रानेही जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या. (Marathi News)

Ekadshi

एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यावर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर तिथे गंगेचे पाणी शिंपडावे. नंतर चौरस किंवा पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून नारायणाची मूर्ती ठेवावी. भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडवा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फलाहार करू शकता. पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करुन जागरण करावे. दुसर्‍या दिवशी म्हणजेच द्वादशीला स्नान करून, दान करावे आणि मग अन्न ग्रहण करावे. उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा करु नये आणि मनात वैर वा क्रोध भाव आणू नये. (Top Marathi HEadline)

ज्यांना हे व्रत करायचे आहे, त्यांनी दशमीच्या तारखेपासून उपवासाच्या नियमांचे पालन सुरू केले पाहिजे. नियमांनुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. कांदा आणि लसूण घालून बनवलेले तामसिक अन्न घेऊ नये. तसेच, डाळ, चणे आणि बेसन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. मध खाणे देखील टाळावे. व्रत पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. (Latest Marathi News)

जया एकादशी कथा
पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एके काळी स्वर्गातील नंदन वनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला स्वर्गातील सर्व देवी-देवता, ऋषी-मुनी उपस्थित होते. कार्यक्रमात गंधर्व व गंधर्व कन्या नृत्य व गायन करत होत्या. पौराणिक मान्यतेनुसार गंधर्वांच्या गटातील एक नृत्यांगना पुष्यवती हिची दृष्टी माल्यवाना यांच्यावर पडली आणि ती त्यांच्या सौंदर्याने मोहित झाली. मंत्रमुग्ध झाल्यानंतर पुष्यवती नृत्यात विचलित होऊ लागली आणि माल्यवानही विसंगत गाऊ लागला. (Top Trending Headline)

=========

Vasant Panchami: विद्येची देवता असलेल्या देवी सरस्वतीची उत्पत्ती झाली कशी?

Rathsaptami : रथसप्तमीला सूर्य देवाची पूजा कशी करावी?

=========

माल्यवानचे हे विसंगत गाणे ऐकून सर्व देवी-देवता संतप्त झाले. तेव्हा स्वर्गीय राजा देवराज इंद्र क्रोधित झाले आणि त्यांनी माल्यवान आणि पुष्यवती यांना स्वर्गातून हाकलून दिले. त्यानंतर त्यांनी दोन्ही गंधर्वांना शाप दिला. इंद्रदेवाच्या शापामुळे दोन्ही पिशाच योनीत जीवन जगू लागले. धार्मिक मान्यतेनुसार शतकानुशतके मल्यवान आणि पुष्यवती यांनी माघ महिन्याच्या एकादशीला काहीही खाल्ले नाही. त्यानंतर त्यांनी रात्री जागरण करून श्रीहरीचे स्मरण केले. त्या दोघांची भक्ती आणि निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी दोन्ही गंधर्वांना भूतरूपातून मुक्त केले. त्यानंतर सर्व संकटांपासून निवारण आणि मुक्तीसाठी जया एकादशीचे व्रत केले जाते. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.