दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला जग्गनाथ यात्रा सुरू होते. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना भव्य रथात बसवून गुंडीचा मंदिरात जातात. या रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथ १६ चाकांच्या “नंदीघोष’ रथात, त्यांचे बंधू बलराम १४ चाकांच्या “तलध्वज’व देवी सुभद्रा १२ चाकांच्या “देवदलान’ रथात रीतसर पूजाअर्चा झाल्यानंतर स्वार झाले. रथयात्रा मुख्य मंदिरापासून सुरु होईल २ किलोमीटर स्थित गुंडीचा मंदिरात समाप्त होईल. येथे भगवान जगन्नाथ ७ दिवस विश्राम करतील. आषाढ शुक्ल दशमीला रथयात्रा मुख्य मंदिरात परत पोहोचेल. (Jagannath Rathyatra)
स्कंद पुराणानुसार जो व्यक्ती या रथयात्रेत श्री जगन्नाथजींचे नामस्मरण करत गुंडीचा नगरी पोहोचतो तो पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो. जी व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणात रथयात्रेत सहभागी होतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. फक्त रथयात्रेत सहभागी झाल्याने मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. भगवान जगगनाथ यांना दिवसातून सहा वेळा महाप्रसाद दिला जातो. सात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ, चार प्रकारची मसूर, नऊ प्रकारच्या भाज्या आणि अनेक प्रकारचे मिष्टान्न नैवेद्यात दिले जाते. गोड पदार्थ तयार करण्यासाठी साखरेऐवजी चांगल्या प्रतीचा गूळ वापरला जातो. (Marathi News)
जगन्नाथाची मुख्य यात्रा ही जरी पुरी येथे होत असली, तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाते. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही या यात्रेचे आयोजन केले जाते. भारतात गुजरात, आसाम, जम्मू, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील काही शहरांत या यात्रेचे आयोजन केले जाते. जागतिक पातळीवर बांगलादेश, सॅन फ्रान्सिस्को, लंडन यांसह अनेक देशांमध्ये ही यात्रा काढली जाते. आज आपण या रथयात्रेशी संबंधित अनेक रंजक तथ्ये पाहणार आहोत. (Todays Marathi HEadline)
– भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ नारळाच्या लाकडापासून तयार केले जातात कारण हे लाकूड इतर लाकडांच्या तुलनेत हलके असते.
– पुरी रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांचे तीन वेगवेगळे रथ बनवले जातात. रथयात्रेत बलरामजींचा रथ समोर असतो, नंतर देवी सुभद्राचा रथ मध्यभागी असतो आणि भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचा रथ मागे असतो. हे त्यांच्या रंग आणि उंचीवरून ओळखले जाते. (Marathi Latest News)
– बलरामजींच्या रथाला ‘तलध्वज’ म्हणतात, ज्याचा रंग लाल आणि हिरवा आहे. देवी सुभद्राच्या रथाला ‘दर्पदलन’ किंवा ‘पद्मरथ’ म्हणतात, जो काळा किंवा निळा आणि लाल रंगाचा असतो, तर भगवान जगन्नाथाच्या रथाला ‘नंदीघोष’ किंवा ‘गरुध्वज’ म्हणतात. त्याचा रंग लाल आणि पिवळा असतो. (Marathi Trending News)
– भगवान जगन्नाथ यांच्या रथाच्या घोड्यांचे नाव बलाहक, शंख, श्वेत आणि हरीदाश्व आहे. रथाचे रक्षक पक्षिराज गरुड आहेत.
– भगवान जगन्नाथ यांच्या रथावर हनुमान आणि नृसिंह यांचे प्रतीक चिन्ह तसेस सुदर्शनत स्तंभ असतो.
– रथाचा ध्वज म्हणजे झेंडा त्रिलोक्यवाहिनी नावाने ओळखला जातो. रथ ज्या दोरखंडाने ओढला जातो, तो शंखचूड नावाने ओळखला जातो.
– भगवान जगन्नाथ यांच्या रथाला 16 चाके असतात. उंची 13 मीटर. जवळपास 1100 मीटर कपड्याने रथाला झाकले जाते.
– भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ 45.6 फूट उंच आहे, बलरामजींचा तलध्वज रथ 45 फूट उंच आहे आणि देवी सुभद्राचा दर्पदालन रथ 44.6 फूट उंच आहे.
– सर्व रथ कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडापासून बनवले जातात, ज्याला ‘दारू’ म्हणतात. यासाठी निरोगी आणि शुभ कडुलिंबाचे झाड ओळखले जाते, ज्यासाठी जगन्नाथ मंदिर एक विशेष समिती स्थापन करते. (Top Marathi Headline)
– या रथांच्या निर्मितीमध्ये खिळे, काटे किंवा इतर कोणत्याही धातूचा वापर केला जात नाही. रथांसाठी लाकडाची निवड बसंत पंचमीच्या दिवशी सुरू होते आणि अक्षय्य तृतीयेपासून त्यांची बांधणी सुरू होते.
– 6 हे तिन्ही रथ तयार झाल्यावर ‘छार पाहणरा’ नावाचा विधी करण्यात येतो त्या अंतर्गत पुरीचे राजा गजपती पालकीमध्ये येतात आणि तिन्ही रथांची विधिविधानाने पूजा करतात आणि ‘सोन्याचा केरसुणी’ ने रथ मंडप आणि मार्ग स्वच्छ केलं जातं. (Top Stories)
– आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला रथयात्रा सुरू होते. ढोल, ताशे, रणशिंग आणि शंखांच्या आवाजात भाविक या रथाला ओढतात. असे म्हणतात की जे या रथाला ओढतात ते भाग्यवंत समजले जातात.
– जगन्नाथ देऊळापासून रथयात्रा सुरू होऊन पुरी शहरातून होत हे रथ गुंडीचा देऊळात पोहोचतात. इथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा सात दिवस विश्रांती घेतात. गुंडीच्या देऊळामध्ये भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला ‘आडप- दर्शन’ म्हटलं जातं. (Social Updates)
=========
हे देखील वाचा : June : 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो?
Yoga Day : २१ जूनलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय योग दिवस ?
=========
– गुंडीच्या देऊळाला गुंडीचं बाडी देखील म्हणतात. हे देवांच्या मावशीचे घर आहे. या देऊळाच्या विषयी आख्यायिका आहे की येथेच देव शिल्पी विश्वकर्मानी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवींच्या मूर्ती तयार केल्या.
– आषाढ महिन्यातील दहाव्या दिवशी सर्व रथ परत देऊळाकडे परतीचा प्रवास करतात. रथांच्या परतीच्या या प्रवासाच्या विधीला बहुडा (बहुनाथ) यात्रा असे ही म्हणतात.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics