Bad Dreams : बहुतांशजणांना रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडतात. या स्वप्नांमुळे झोप मोड होते अथवा झोपेतच भीती वाटू लागते. यामुळे झोपही पूर्ण होत नाही. याशिवाय अशा वाईट स्वप्नांमुळे कोणत्याही गोष्टी करण्याचे मनं देखील होत नाही.
वास्तुशास्रात प्रत्येक गोष्टीवर उपाय सांगितला आहे. अशातच वास्तुशास्रानुसार वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. यामुळे वाईट स्वप्न पडण्याची स्थिती दूर होईल आणि आयुष्यातील काही समस्यांचे समाधानही होईल. याबद्दलच जाणून घेऊया अधिक…
हनुमान चालीसा
शास्रानुसार हे म्हटले जाते की, रात्री झोपताना उशीखाली हनुमान चालीसा ठेवून झोपावे. यामुळे वाईट स्वप्न पडल्यानंतर वाटणारी भीती दूर होते. तसेच शांत झोप लागते.
कापूर
उशीखाली कापूर ठेवणे अत्यंत फायदेशीर ठरेल. यामुळे शांत झोप लागेलच पण त्याचसोबत वाईट स्वप्नही पडणार नाहीत. याशिवाय ज्या लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो त्यांच्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरेल.
फूलं कापडात बांधा
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली एका कापडात काही फूलं बांधून ठेवावीत. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होतात. घरात शांतीचे वातावरण निर्माण होते. नातेसंबंध सुधारण्यासह घट्ट होतात.
बडीशेप
वाईट स्वप्न पडत असल्यास रात्री उशीखाली बडीशेप ठेवा. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होतील. याशिवाय मानसिक समस्यांपासून तुम्हाला दूर राहता येईल. (Bad Dreams)
पितळेचा तांब्या
शास्रानुसार, जर तुम्हाला एखादी दुर्घटना घडतेय अशी स्वप्न अथवा एखाद्या दुर्घटनेचा सामना करत असल्यास अशा स्थितीत रात्री झोपताना डाव्या बाजूला पाण्याने भरलेला पितळेचा तांब्या ठेवा. यामुळे या काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाहीत.
(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)