पुढच्या काही तासातच नव वर्ष सुरु होत आहे. 2022 ला निरोप देत जग 2023 मध्ये प्रवेश करणार आहे. हे नव वर्ष कसं असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. नव्या वर्षाबाबत कोणी काहीही सांगितलं तरी येणारं नव वर्ष हे नक्कीच आरोग्यदायी ठरणार आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे 2023 हे बाजरी या धान्याला समर्पित असं वर्ष आहे. मुख्य म्हणजे यासाठी आपल्या देशानं, भारतानं पुढाकार घेतला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघापुढे प्रस्ताव ठेवला होता. संयुक्त राष्ट्रसंघानं हा प्रस्ताव मान्य करत 2023 ला बाजरी वर्ष (millet year) असेल अशी घोषणा केली आहे. भारतात आणि अफ्रिकेमध्ये प्रामुख्यानं बाजरीचं उत्पादन घेतलं जातं. असे असले तरी भारतामध्ये बाजरी या धान्याचा आहारात फार वापर होत नव्हता. मात्र अलिकडे बाजरीवर संशोधन (millet year) झाल्यावर बाजरीही सर्व आजारावर रामबाण उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच बाजरीचा आहारात जास्तीत जास्त समावेश करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आता संयुक्त राष्ट्रानंच येणारं वर्ष हे बाजरी वर्ष (millet year) म्हणून घोषित केलं आहे. अर्थात जेवढा जास्त बाजरीचा समावेश आहारात होईल, त्याचा फायदाही आरोग्यास होणार आहे. त्यामुळे येणा-या वर्षाबाबत काहीही भविष्यवाणी झाली तरी येणा-या वर्षातील आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. बाजरी या धान्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. बाजरीत उष्णतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीरात वाढणा-या अतिरिक्त कॉलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात रहाते. बहुउपयोगी बाजरीचे उप्तादन वाढवण्यासाठी गेली काही वर्ष भारतात प्रयत्न करण्यात येत आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभर बाजरीचे उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी भारताचा पुढाकार आहे. यासाठी यासाठी भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे प्रस्ताव दिला होता. भारताच्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दिला. त्यानंतर नेशन्स जनरल असेंब्ली (UNGA) ने 2023 हे बाजरी वर्ष (millet year)म्हणून घोषित केले आहे. भारतातही बाजरी वर्षानिमित्त विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यात उप्तादन, विक्री आणि बाजरीपासून तयार होणा-या अनेक पदार्थांचा समावेश आहे. 2023 हे वर्ष बाजरीच्या उप्तादन वाढीसाठी हातभार लावणारं वर्ष (millet year) बनवण्यासाठी भारत सरकारनं एक कोअर समितीही स्थापन केली आहे. यामध्ये बाजरीवर संशोधन करणारे प्राध्यापक, शेतीतज्ञ, पोषण आहार तज्ञ, आचारी आदींचा समावेश आहे.
भारतीय बाजरी संशोधन संस्था आहे, त्याअंतर्गत हा सर्व कार्यक्रम होणार आहे. यासाठी बाजरीपासून तयार होणा-या विशेष रेसिपीही तयार केल्या जाणार आहेत. हे पुस्तक सर्व राज्यातील मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि मंत्री यांना पाठवण्यात येणार आहे. शिवाय सर्व राज्यातील कृषिमंत्रालयालाही बाजरीच्या उप्तापदन वाढीसाठी राज्यात विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय अंगणवाडीतील माता समित्यांच्या माध्यमातून मातांमध्ये बाजरीच्या आहारातील सेवनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड द्वारे बाजरी पासून तयार होणा-या पाककृतींवर संशोधन करण्यात येणार आहे. तसेच बाजरीपासून तयार होणा-या पदार्थांबाबत स्टार्टअप करायचे असेल तरीही त्यांना विशेष सूट देण्यात येणार आहे. भारतात कर्नाटक आणि उत्तरप्रदेश सरकारने बाजरी उप्तादनासाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकार 2023 मध्ये बाजरीचे क्षेत्र वाढवणार आहे. 11 लाख हेक्टरवरून 25 लाख हेक्टरवर बाजरीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरून तयारी सुरू झाली आहे.(millet year)
=========
हे देखील वाचा : जानेवारी नव्हे तर मार्च महिन्यापासून नवं वर्षाची व्हायची सुरुवात, रोमन कॅलेंडरचा असा आहे इतिहास
========
सध्या भारत हा जगातील सर्वात मोठा बाजरी उत्पादक देश आहे. बाजरी आणि ज्वारी ही भारतातील प्रमुख पिके आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही प्रमुख बाजरी उत्पादक राज्ये आहेत. क्षेत्रानुसार, राजस्थानमध्ये 43.48 लाख हेक्टर, उत्तर प्रदेशात 9.04 लाख हेक्टर, महाराष्ट्रात 6.88 लाख हेक्टरवर बाजरीची लागवड केली जाते. तर, उत्तर प्रदेशचे उत्पादन 2156 किलो प्रति हेक्टर आहे. आता संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केल्यावर बाजरीच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत जनजागृती वाढवण्यात येत आहे.
सई बने