“नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । जाला असे स्थिर ब्रह्मबोधें”
संत नामदेव महाराजांच्या ७२ व्या अभंगातली ही शेवटची ओळ आहे, जी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीची महती सांगते. नामदेव महाराज म्हणतात, सामान्य माणूस सुखाच्या मागे धावतो, ते सुख तात्पुरतं असतं. पण माऊलींचं सुख? ते ब्रह्माच्या म्हणजे ईश्वराच्या खऱ्या जाणिवेतून आलं, जे कधीच नष्ट होत नाही. माऊलींनी या सुखात स्थिर राहून परम आनंद मिळवला आणि त्याच अवस्थेत ते संजीवन समाधीत गेले. (Alandi Mystery)
पंढरपूरच्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी. इथेच संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या २१ व्या वर्षी, इ. स. १२९६ मध्ये संजीवन समाधी घेतली, म्हणजे देह न सोडता, चेतना जिवंत ठेवून ईश्वरात विलीन झाले. भक्तांचा ठाम विश्वास आहे की, ज्ञानेश्वर माऊलींची पॉझिटिव्ह वाटणारी अन्नोन पॉवर आजही आळंदीच्या मंदिरात जाणवते. पण १९७२ मध्ये भक्तांच्या या विश्वासाला चॅलेंज मिळालं. तेव्हा आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्याचा विषय समोर आला. असं म्हणतात, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी ज्ञानेश्वरांनी समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता.पण या समितीची स्थापनाच या घटनेच्या १७ वर्षांनी झाली. मग ज्ञानेश्वरांची समाधी नक्की कोणी उघडली होती ? हे प्रकरण नक्की काय आहे? या सगळ्याबद्दल जाणून घेऊ. (Top Stories)
१९७२ मध्ये भारत एक नव्या वळणावर होता. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा बोलबाला वाढत होता. तरुण पिढी जुन्या रूढी परंपरांकडे लॉजिकच्या चष्म्यातून पाहायला लागली होती. याच वेळी पुण्यातल्या काही बुद्धिवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या मंडळींना वाटलं,“आळंदीला माऊलींची संजीवन समाधी म्हणतात, पण ही फक्त भावनिक अंधश्रद्धा आहे. याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी.” मग यात दोन-तीन परदेशी डॉक्टरही सामील झाले. त्यांनी जाहीर सांगितलं, “गरज पडली तर समाधी उघडू!”(Alandi Mystery)
या बातमीनंतर गावात एकदम गोंधळ उडाला. भक्तांमध्ये राग, दुखः, अस्वस्थता तयार व्हायला लागली. काही रडायला लागले, काही हात जोडून विनंती करायला लागले, तर काहींनी “माऊलींच्या समाधीला हात लावू नका!” असं म्हणू लागले. आळंदीचं वातावरण अक्षरशः तापलं होतं. या सगळ्या गडबडीत एक जण पुढे आले, त्यांचं नाव होतं, ह भ प मामासाहेब दांडेकर. हे फक्त वारकरी नव्हते, तर वारकरी संप्रदायाचा चेहरा होते. लाखो भक्त त्यांना माऊलींचं प्रतिनिधी मानायचे. त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली आणि दिल्लीतल्या एका मोठ्या शास्त्रज्ञाशी, डॉ. आर. एन. शुक्ला यांच्याशी संपर्क साधला. डॉ. शुक्ला हे फक्त सायंटिस्ट नव्हते, तर संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते. त्यांनी ही बातमी ऐकली आणि लगेच सांगितलं, “समाधी उघडायची गरज नाही. आपण वैज्ञानिक पद्धतीने तिथल्या ऊर्जेचा अभ्यास करू. जर खरंच कोणती अन्नोन पॉवर असेल, तर ते यंत्रांवर दिसेल.” हा प्रस्ताव ऐकून मामासाहेबांना बरं वाटलं. त्यांनी भक्तांना शांत केलं आणि तपासणीची तयारी सुरू झाली.(Top Stories)
दुसऱ्या दिवशी पुण्यातून १००-२०० लोकांचा ट्रक आळंदीकडे निघाल्याची बातमी पसरली. सगळा गोंधळ वाढण्यापूर्वीच मामासाहेब आणि शुक्ला साहेब आळंदीत पोहोचले. शुक्ला साहेबांनी सोबत तीन अडवांस्ड मशीन्स आणले. पहिली म्हणजे गिगर मिलर काउंटर, जिचं काम होतं, एक्स-रे, अल्फा, बीटा, गॅमा रे सारख्या अदृश्य ऊर्जा मोजायचं. दुसरी म्हणजे थर्मिस्टर बोलोमीटर जिचं कांम इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायलेट रे मोजायचं आणि तिसरी मशीन म्हणजे फ्रिक्वेन्सी रडार मीटर जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि अन्नोन पॉवर टिपायचं काम करते. ही मशीन्स समाधीपासून सहा फूट लांब ठेवली. शुक्ला यांंनी जस्त, पितळ आणि लोखंडाची तीन झाकणं बनवली होती, जेणेकरून ऊर्जा धातूंमधून जाते का ते तपासता येईल. समाधी उघडायल्या आलेले मंदिरात शिरणार, तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि म्हणाले, “आधी वैज्ञानिक प्रयोग बघा. नाही पटलं, तर मग हवं ते करा.”(Alandi Mystery)
===============
हे देखील वाचा : Jagganath Yatra : अनेक चमत्कारिक रहस्यांनी भरलेले आहे भगवान जग्गनाथांचे धाम
===============
शुक्ला म्हणाले की, “आपण झाकणं बदलून मीटरवर काय दिसतं ते बघू.” दहा-बारा लोकांना गाभाऱ्यात नेलं. मामा आणि शुक्ल दोघेही बाहेर थांबले आणि मग जे झालं, त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही असंच होतं. मीटरला कोणी हात लावला नाही, झाकणं बदलली, पण प्रत्येकवेळी एकच एनर्जी, तेच व्हायब्रेशन, तीच रीडिंग दिसली आणि एक अज्ञात, स्थिर ऊर्जा जाणवली. समाधी उघडायला जे आले होते, त्यांना बरेच प्रश्न पडू लागले आंनी त्यांना कळेचना ही एनर्जी येतेय कुठून? शुक्ला आणि मामासाहेबांनी समजावलं, “ही संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही, ही अन्नोन पॉवर आहे. माऊलींची ऊर्जा आजही इथे आहे, ती तुम्ही मीटरवर बघू शकता!” या प्रयोगानंतर समाधी उघडायचा विचार त्यांनी सोडला. (Top Stories)
अशी चर्चा झाली होती की, ज्ञानेश्वरांची समाधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी ज्ञानेश्वरांनी समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता. पण याचे ठोस पुरावे सापडत नाहीत, कारण ज्ञानेश्वरांची समाधी उघडून पाहण्याची जी घटना घडली ती १९७२ साली घडली होती आणि अनिसची स्थापना १९८९ साली झाली होती. हा प्रयोग पुण्यातल्या स्वतंत्र गटांनी आणि परदेशी डॉक्टरांनी केला. यानंतर आणखी एक चर्चा समोर आली होती, ती म्हणजे, जेव्हा ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. समाधी उघडली की, ज्ञानेश्वराची आरिजिनल प्रत मिळेल, म्हणून सुद्धा समाधी उघडण्याचा प्रयत्न झाला.(Alandi Mystery)
पण आजही भक्त सांगतात आळंदीला गेलात, समाधीपाशी शांत उभे राहिलात, डोळे मिटून आत डोकावलात, तर एक ऊर्जा, पॉजिटिव एनर्जी जाणवते. असं म्हटलं जातं, माऊलींचं सुख, जे ब्रह्मबोधातून मिळालं, ते आजही तिथे आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics