सध्या सगळीकडेच जोरदार पाऊस कोसळत आहे. जून महिना लागला की, सगळ्यांनाच वेध लागतात ते पावसाळ्याचे. मात्र यंदा पाऊसाने आपल्याला जास्त वाट पाहायला लावली नाही. तो त्याच्या वेळेआधीच आला आहे. पावसाळा म्हणजे सगळ्यांचाच आवडता ऋतू. पावसाळा सुरु झाला की, आपल्याला जरा ऍडजेस्टमेंट करावी लागते, बऱ्यापैकी त्रास देखील होतो मात्र तरीही हा पाऊस हवाहवासा वाटतो. पाऊस येताना जरी सोबत भरपूर आनंद घेऊन येत असला तरी या पावसामुळे अनेक त्रास अनेक समस्या निर्माण होतात. पावसामध्ये अनेक आजार डोके वर काढतात, खाण्यावर बंधनं येतात. (Health)
असाच एक तर म्हणजे भाज्यांचा. हो पावसाळ्यामध्ये नक्की कोणत्या भाज्या खाव्या आणि कोणत्या खाऊ नये हे समजतच नाही. एकतर भरपूर पावसाळामुळे भाज्यांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. पाऊसामुळे भाज्या खराब होण्याचे प्रमाण देखील जास्त असते. अशातच या दिवसात पालेभाज्या, हिरव्या भाज्या देखील खाता येत नाही. आपण अनेकदा घरातील मोठ्यांकडून, जाणकारांकडून देखील पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये हिरव्या भाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बरेच लोकं पालेभाज्या खाणे बंद करतात, मात्र असे का? का पावसाळ्यात हिरव्या भाज्या, पालेभाज्या खाऊ नये? आणि जर खायच्या असतील तर काय काळजी घ्यायची? चला जाणून घेऊया. (Marathi NEws)
पावसाळ्यात थंड वातावरणामुळे आणि डासांच्या त्रासामुळे सर्दी, ताप, फूड पॉयझनिंग, डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका अधिक असतो. शिवाय या ऋतूमध्ये सतत हवामान बदलत असते, अशा या बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. त्यामुळे पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे असे नेहमीच डॉक्टरांकडून, तज्ज्ञांकडून सांगितले जाते. जे डॉक्टर नेहमी आपल्याला पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात तेच पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नका असे सांगतात. यामागे काही कारणं आहेत. (Todays Marathi Headline)
> हिरव्या भाज्या पाणीदार जमिनीत उगवल्या जातात. पावसाळयात आर्द्रता जास्त असल्याने नानाविध प्रकारच्या बॅक्टेरिया, बुरशी, कीटक यांच्या वाढीसाठी हे वातावरण अनुकूल असते. इतर ऋतूमध्ये सूर्यप्रकाश अधिक असल्यामुळे हे बॅक्टेरिया, बुरशी, नष्ट होतात. मात्र पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने हे जिवाणू मरत नाही. त्यात हे बॅक्टेरिया उघड्या डोळ्यांना दिसत नाही. हिरव्या पालेभाज्यांमध्ये हे जिवाणू अधिक असतात. अशातच जर हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने हे बॅक्टरीया शरीरात गेल्यास अनेक आजार होण्याचा धोका निर्माण होतो. (Marathi Latest News)
> पावसाळ्यात प्रामुख्याने पालक, मेथी, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्या खाणे टाळाव्यात. या भाज्यांमध्ये बॅक्टरीया प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आधी असतो. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या खाणे टाळावे. पावसाळ्यात जर या भाज्या खाल्ल्यात तर पचनक्रियेवर आणि पोटावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
> पावसाळ्याच्या दिवसात पालक नक्कीच हिरवा होतो, पण यावेळी पालकाच्या भाजीवर खूप बारीक किडे असतात त्यामुळे या दिवसात पालकाचे सेवन करू नये. (HEalth Tips)
> शिवाय पावसाळ्यामध्ये कच्चे सॅलड देखील खाऊ नये. यामध्ये अनेक बॅक्टेरिया असू शकतात. त्याऐवजी सर्व भाज्या वाफवून खाणे अधिक फायदेशीर ठरते. वाफेवर गरम केल्याने सॅलडमधील बॅक्टेरिया नष्ट होतात.
> यासोबतच जमिनीखाली उगवल्या जाणाऱ्या भाज्या जसे की, बटाटा, रताळे, मुळा, गाजर किंवा सलगम आदी देखील खाणे टाळावे. जमिनीत उगवल्या जाणाऱ्या या भाज्या जिवाणूंमुळे दूषित होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात हा धोका अनेक पटींनी वाढतो कारण पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढते. पावसात बॅक्टेरिया अधिक वाढतात, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. (Top Trending News)
> पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खायच्या असतील तर त्या शिजविताना काही गोष्टी पाळाव्यात. जसे की, भाजी करण्यापूर्वी गरम पाण्यात मीठ किंवा व्हिनेगर घालून भाज्या धुवून घ्या. किंवा भांड्यात चिंचेचा तुकडा आणि मीठ घालून त्या पाण्यात पालेभाज्या थोडावेळ बुडवून ठेवा, नंतर त्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि मग वापर. तसेच भाज्या वाफेवर शिजवून घ्या, असे केल्याने भाज्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया नष्ट होतील.
पावसाळ्यामध्ये काय खावे?
> पावसाळ्यात कमकुवत पचनसंस्था असल्याने व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यासाठी संत्री, लिंबू, अव्होकाडो यासारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खा. यामुळे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल. (Top Stories)
=========
हे देखील वाचा : Health Tips: शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे? तर सेवन करा ‘हे’ पदार्थ
==========
> पावसाच्या ऋतूमध्ये अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि फायबरने समृद्ध असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. या ऋतूमध्ये तुम्ही आहारात कारले आणि पडवळ या भाज्यांचा समावेश करू शकता कारण कारल्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याशिवाय पचनक्रिया सुधारून पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो.
> भाज्यांमध्ये, कारली, तोंडली, पालक, मेथी, आणि फुलकोबी यांसारख्या भाज्या खाव्यात. फळांमध्ये, जांभूळ, लिची, आणि सफरचंद यांसारखी हंगामी फळे खावी. कडधान्ये आणि शेंगांचे सेवन करावे, तसेच आले, लसूण, आणि हळद यांचा आहारात समावेश करावा. दही आणि ताक यांसारखे प्रोबायोटिक पदार्थ खाणे देखील फायदेशीर आहे. (Social Updates)
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics