अक्षय्य तृतीया हिंदू लोकांचा अतिशय महत्वाचा सण. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. आता हा सण संपूर्ण भारतामध्ये जरी साजरा होत असला तरी या सणाचे नाव आणि सण साजरी करण्याची पद्धत फार वेगवेगळी आहे. या दिवसाला आपल्या धार्मिक पुराणांमध्ये मोठे महत्व आहे. या दिवशी अनेक महत्वाच्या आणि मोठ्या गोष्टी घडल्या असल्याची नोंद पुराणांमध्ये सापडते. (Akshaya Tritiya)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा आणि देवी अन्नपूर्णेचा जन्म झाला अशी धार्मिक श्रद्धा आहे. आजच्या दिवशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली होती, शिवाय महर्षी वेद व्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कृष्णाचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते, तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. याच दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. आणि तिला वस्त्रहरणातून वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली. (Marathi Top Stories)
अशा या अतिशय महत्वाच्या दिवसाला साडे तीन मुहूर्तांमध्ये देखील स्थान आहे. त्यामुळे या दिवशी लोकं लहान मोठी अशी खरेदी करताना दिसतात. असे म्हटले जाते की, या दिवशी केलेली खरेदी अक्षय्य टिकते. म्हणूनच महिला वर्ग या दिवशी थोडे का असेना पण सोने खरेदी करतात. मात्र आजच्या काळात सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे. त्यामुळे सामान्य माणसाला थोडे सोने खरेदी करणे देखील शक्य नसल्याचे चित्र आहे. मग या शुभ दिवशी सोने नाही तर काय खरेदी केली पाहिजे? चला जाणून घेऊया. (Marathi Top News)
जर तुम्हाला अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी चांदी, प्लॅटिनम, कोरल, पन्ना, पुष्कराज किंवा तांबे किंवा पितळेची भांडी, कौडीचे कवच, बार्ली, पिवळी मोहरी, दक्षिणावती शंख, श्रीयंत्र किंवा धणे यासारख्या इतर शुभ वस्तू खरेदी करू शकता. याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तीला दान करणे देखील खूपच शुभ आणि फायदेशीर मानले गेले आहे. (Marathi Trending News)
=======
हे देखील वाचा : Sugarcane Juice : उन्हाळ्यात वरदान असलेल्या उसाच्या रसाचे फायदे
Sweating Hands : सतत तळव्यांना घाम का येतो?
=======
अक्षय तृतीयेला कुमकुम दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी भुकेल्या किंवा गरीब व्यक्तीला धान्य दान करणे देखील लाभदायक समजले जाते. हिंदू धर्मात पूजा करताना सुपारीचा वापर केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुपारी दान केल्याने सुख आणि सौभाग्य लाभते अशी मान्यता आहे. सोबतच अक्षय्य तृतीयेला नारळ दान केल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होते, असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दान केल्यास त्याचे अधिक लाभ होतात. (Social News)