Home » Puri : जगन्नाथ मंदिरातील तिसऱ्या पायरीचे रहस्य

Puri : जगन्नाथ मंदिरातील तिसऱ्या पायरीचे रहस्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Puri
Share

उद्यापासून अर्थात २७ जून पासून पुरीमध्ये भगवान जग्गनाथ यांच्या रथयात्रेच्या शुभारंभ होत आहे. या काळात संपूर्ण पुरी शहराला आनंदाचे उत्साहाचे उधाण आलेले पाहायला मिळते. या रथयात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. जगन्नाथ धामला पृथ्वीचे वैकुंठ म्हटले जाते, भगवान श्री हरी येथे राहतात, म्हणून येथे फक्त दर्शन घेतल्याने भाविकांची समस्या सुटते. हिंदू धर्मात रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. (Jagganath Puri)

भगवान श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या जगन्नाथांच्या रथयात्रेत सहभागी होण्याचे पुण्य शंभर यज्ञांच्या बरोबरीचे मानले जाते. म्हणूनच या रथयात्रेमधे सहभागी होण्यासाठी भाविक देशविदेशातून पुरीमध्ये येतात. पुरी शहरात जगन्नाथ रथयात्रा उत्सवादरम्यान श्रद्धेचा जो भव्य उत्सव पाहायला मिळतो. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा रथोत्सव याची देही याची डोळा बघणे म्हणजे पुण्यकर्मच जणू. मुख्य म्हणजे या रथयात्रेत भाविकांना थेट मूर्तींपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळते. याच रथयात्रेच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला जग्गनाथ मंदिरातील दोन आगळ्या वेगळ्या परंपरांबद्दल सांगणार आहोत. (Marathi News)

जग्गनाथ मंदिर हे भारतातील अतिशय महत्वाच्या मंदिरांपैकी एक आणि चार धामपैकी एक धाम मानले जाते. या मंदिरातील जगन्नाथ अर्थात श्रीकृष्ण, बलभद्र अर्थात बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची रथयात्रा खूप प्रसिद्ध आहे. जग्गनाथ मंदिर हे जेवढे भगवान श्रीकृष्णासाठी, रथयात्रेसाठी प्रसिद्ध आहे, तेवढेच ते या मंदिरातील रहस्यांचा देखील ओळखले जाते. जग्गनाथ मंदिराशी संबंधित अनेक रहस्ये आजही अनुत्तरित आहे. हे रहस्ये विज्ञानाला देखील उलगडता आलेले नाहीत. यापैकी तुम्हाला मंदिराच्या २२ पायऱ्यांचे रहस्य माहित आहे का आणि तिसऱ्या पायरीवर पाय ठेवणे का निषिद्ध मानले जाते. चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Puri

धार्मिक मान्यतेनुसार, जगन्नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना २२ पायऱ्या आहेत आणि तिसऱ्या पायरीला यमशिला म्हणतात. यावर यमराज विराजमान आहेत अशी मान्यता आहे. जो व्यक्ती या पायरीवर पाय ठेवतो त्याला यमलोकात जावे लागते, असे म्हटले जाते. मान्यता आहे की, मंदिराचे दर्शन घेऊन परतताना, चुकूनही या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवू नये. मान्यता आहे की, असे जर कोणी केले तर त्या व्यक्तीचे सर्व पुण्य शून्यावर येते आणि ती व्यक्ती मृत होऊन यमलोकाला प्राप्त होते. त्यामुळे या पायरीवर कोणीही चुकून पाय ठेऊ नये म्हणून या मंदिराच्या तिसऱ्या पायरीला काळा रंग देण्यात आला आहे. (Marathi Latest News)

या मागे एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते, एकदा यमराज भगवान जगन्नाथांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, ‘हे प्रभू, या मंदिरात तुमचे दर्शन घेतल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात आणि कोणीही यमलोकात येत नाही.’ अशा परिस्थितीत, मनुष्य आपल्या पापांपासून मुक्त होण्यासाठी जगन्नाथ पुरीमध्ये पोहोचतो आणि दर्शन होताच त्याचे पाप सहज नष्ट होतात. यमराजाचे ऐकून भगवान जगन्नाथ म्हणाले की, तुम्ही या मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर स्थान घ्या. माझे दर्शन घेतल्यानंतर जो कोणी या पायरीवर पाऊल ठेवेल, त्याचे पुण्य नष्ट होईल आणि तो यमलोकात पोहोचेल. (Top Stories)

=================

हे ही वाचा : 

Odisha : म्हणून भगवान जगन्नाथांचे डोळे मोठे आहेत !

Jagannath Rath Yatra : भगवान जगन्नाथ यांच्या रथातील सर्वाधिक किंमतीचा हिस्सा – ‘चक्र’

=================

परंतु या पायरीवर पाय न ठेवण्याचा नियम आहे. तुम्ही जेव्हा दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला त्या पायरीवर पाय ठेवावे लागतात, परंतु भगवान जग्गनाथ यांच्या दर्शनानंतर परत येताना या पायरीवर पाय अजिबात ठेवायचे नसतात. या पायरीला ओळखायचे कसे? तर ही एकमेव पायरी काळ्या रंगाची असून, बाकी पायऱ्यांचा रंग वेगळा आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.